शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात मोठी घडामोड! सर्व मंत्र्यांचे राजीनामे, राज्यात नेमकं काय घडतंय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 18:05 IST

Andhra Pradesh Ministers to Resign: आंध्र प्रदेशातील जगन मोहन रेड्डी सरकारमधील 4 मंत्र्यांव्यतिरीक्त इतर सर्व मंत्री आपल्या पदाचे राजीनामे देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

अमरावती: आंध्र प्रदेशातील जगन मोहन रेड्डी(Andhra Pradesh CM Jagan Mohan Reddy) सरकार सध्या एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आले आहे. राज्य सरकारमधील सर्व मंत्री आपल्या पदांचा राजीनामा देणार असल्याची बातमी समोर आली आहे. आज(गुरुवारी) मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्यातच हा सामूहिक राजीनाम्याचा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे कुठल्याही क्षणी आंध्र प्रदेशचे सर्व मंत्री आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात.

4 मंत्री पदावर कायम राहणारमिळालेल्या माहितीनुसार, केवळ 4 मंत्री आपल्या पदांवर कायम राहू शकतील. या सामूहिक राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री आपल्या मंत्रिमंडळाची पुनर्रचना करणार असल्याची माहिती आहे. ही पुनर्रचना 9 किंवा 11 एप्रिल रोजी होऊ शकते. नव्या मंत्रिपरिषदेत सर्व 26 जिल्ह्यांतील एकाला मंत्री केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुख्यमंत्री राज्यपालांची भेट घेणारसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी बुधवारी 6 एप्रिल रोजी राज्यपाल विश्वभूषण हरिचंदन यांची भेट घेतली होती. त्यात त्यांनी त्यांच्या आगामी योजनेची माहिती दिली आहे. त्यांच्या नवीन मंत्रिमंडळाच्या सदस्यांची अंतिम यादी घेऊन ते गुरुवारी पुन्हा राज्यपालांची भेट घेणार आहेत. 

2024 च्या निवडणुकीची तयारी जगनमोहन रेड्डी 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या संदर्भात ही कसरत करत असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी 4 एप्रिल रोजी राज्यात 13 नवीन जिल्ह्यांची निर्मिती केली आहे. तसेच, त्याच दिवशी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांचीही तिथे नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर आता आंध्र प्रदेशातील जिल्ह्यांची संख्या 26 झाली आहे.

 

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशResignationराजीनामाministerमंत्री