शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
3
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
4
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
5
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
6
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
7
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
8
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
9
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
10
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
11
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
12
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
13
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
14
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
15
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
16
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
17
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
18
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
19
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
20
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम

अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 14:02 IST

Anant Ambani Vantara: सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती जे. चेलमेश्वर यांच्या अध्यक्षतेखालील एसआयटीने वनताराला क्लीनचिट दिली आहे.

Anant Ambani Vantara: सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती जे. चेलमेश्वर यांच्या अध्यक्षतेखालील एसआयटीने गुजरातमधील जामनगर येथील रिलायन्स फाउंडेशनच्या वनतारा वाइल्डलाइफ फॅसिलिटीला क्लीनचिट दिली आहे. वनतारामध्ये हत्तींची कथित बेकायदेशीर खरेदी-विक्री आणि बेकायदेशीररीत्या कैदेत ठेवल्याचा आरोप करण्यात आला होता. अनंत अंबानी यांच्या या कोट्यवधींच्या प्रकल्पाविरोधात नुकतीच एक जनहित याचिका (PIL) दाखल करण्यात आली होती. 

न्यायमूर्ती पंकज मिथल आणि न्यायमूर्ती पी.बी. वराळे यांच्या खंडपीठाने अहवाल नोंदवला आणि प्राधिकाऱ्यांनी वंतारा येथे नियमांचे पालन आणि नियामक उपायांबाबत समाधान व्यक्त केल्याचे सांगितले. वंतारासंदर्भातील चौकशी करणाऱ्या एसआयटीने शुक्रवारी सीलबंद लिफाफ्यात अहवाल सुपूर्त केला होता. सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने त्याचे अवलोकन केले.

तपासाचे आदेश

सुप्रीम कोर्टाने एसआयटीला भारत आणि परदेशातून प्राण्यांची, विशेषतः हत्तींची आयात, वन्यजीव (संरक्षण) अधिनियमाचे पालन, प्राणीसंग्रहालयांसाठीचे नियम, संकटग्रस्त प्रजातींच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराशी संबंधित कायदे, आयात-निर्यात कायदे आणि जिवंत प्राण्यांच्या आयात-निर्यातीसंदर्भातील इतर वैधानिक बाबींची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

याशिवाय, प्राण्यांचे पालन-पोषण, पशुवैद्यकीय सेवा, प्राणी कल्याणाच्या निकषांचे पालन, मृत्यूदर व त्याची कारणे, हवामानाच्या अटी, औद्योगिक क्षेत्राजवळील ठिकाणामुळे निर्माण होणारे आरोप, खाजगी संकलन, प्रजनन, संरक्षण कार्यक्रम आणि जैवविविधतेच्या साधनांच्या वापराबाबतच्या तक्रारींचीही तपासणी करण्याचे आदेश एसआयटीला देण्यात आले होते. 

नेमके प्रकरण काय?

सुप्रीम कोर्टात माध्यमे व सोशल मीडियामध्ये आलेल्या बातम्या, तसेच स्वयंसेवी संस्था आणि वन्यजीव संस्थांच्या विविध तक्रारींच्या आधारे वनताराविरोधात अनियमिततेचे आरोप करणाऱ्या दोन जनहित याचिकांवर सुनावणी झाली. याप्रकरणी माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय एसआयटी गठित केली होती. व्यापक आरोप लक्षात घेता, खासगी प्रतिवादी किंवा इतर कोणत्याही पक्षाकडून उत्तर मागवणे उपयोगाचे ठरणार नाही, असे न्यायालयाने म्हटले होते.

न्यायालयाने असेही म्हटले होते की, अशा निराधार आरोपांवर आधारित याचिका कायदेशीर दृष्ट्या ग्राह्य धरता येत नाही, ती वेळेत फेटाळली पाहिजे. आदेशात स्पष्ट केले गेले की, या याचिकांमध्ये करण्यात आलेल्या आरोपांवर न्यायालय कोणतेही मत व्यक्त करत नाही, ना वंतारा किंवा कोणत्याही प्राधिकरणाच्या कार्यपद्धतीवर शंका निर्माण करतो.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयanant ambaniअनंत अंबानीGujaratगुजरातVantaraवनतारा