शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

आंध्र प्रदेशातील अनकापल्लीमध्ये केमिकल कंपनीत स्फोट, ४ ठार, २० जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2024 17:57 IST

आंध्र प्रदेशातील अनकापल्ली येथील अच्युतापुरम सेझ येथील एसेन्सिया कंपनीत रिॲक्टर स्फोटात ४ जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत.

आंध्र प्रदेशातील अनकापल्ली येथील अच्युतापुरम सेझ येथील एसेन्सिया कंपनीत रिॲक्टर स्फोटात ४ जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत. जखमींना अनकापल्ली एनटीआर हॉस्पिटल आणि स्थानिक खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आज दुपारी ही घटना घडली.सध्या पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले असून मदत आणि बचावकार्य सुरू आहे.

वॉन्टेड झाकिर नाईकला भारतात आणलं जाणार? मलेशियन पंतप्रधानांच्या एका आश्वासनानं वाढली भारताची आस

बुधवारी कारखान्याच्या रिॲक्टरमध्ये अचानक झालेल्या स्फोटात अनेक जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वृत्तसंस्था एएनआयने अनकापल्ली एसपी दीपिका यांच्या हवाल्याने सांगितले की, अच्युतापुरम सेझमधील कंपनीत रिॲक्टर स्फोटाच्या घटनेत १५ ते २० जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जुलै महिन्यात आंध्र प्रदेशातील एनटीआर जिल्ह्यात एका सिमेंट कारखान्यात स्फोट झाला होता, त्यात १६ कामगार जखमी झाले होते. जखमी कर्मचाऱ्यांमध्ये स्थानिक कर्मचाऱ्यांशिवाय उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि बिहारमधील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. बॉयलरच्या स्फोटामुळे ही दुर्घटना घडल्याचे वृत्त आहे.

२०२३ मध्ये, आंध्र प्रदेशातील अनकापल्ली जिल्ह्यातील अच्युतापुरम येथे असलेल्या फार्मा कंपनीमध्ये झालेल्या स्फोटात सात जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. राज्य सरकारने एका निवेदनात म्हटले होते की, स्फोटाच्या वेळी प्लांटमध्ये ३५ लोक होते आणि त्यापैकी बहुतेक सुरक्षितपणे वाचले. फार्मा कंपनीच्या 'सॉलव्हेंट रिकव्हरी प्लांट'मध्ये सॉल्व्हेंट भरत असताना स्फोट झाला.