शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

आईच्या आठवणीत ८ वर्षाच्या मुलीनं लिहिलं भावूक पत्र वाचून वडील ढसाढसा रडले, अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 17:42 IST

श्यामभवी ही राजस्थानच्या दौसा येथे आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टर अर्चना शर्मा यांची मुलगी आहे

दौसा – राजस्थानात चर्चेत असणाऱ्या डॉ. अर्चना शर्मा आत्महत्या(Dr Archana Sharma Suicide) प्रकरणानंतर आता त्यांच्या मुलीचं भावूक पत्र सोशल मीडियात व्हायरल होत आहे. चौथीत शिकणाऱ्या श्यामभवीने तिच्या आईच्या आठवणीत एक पत्र लिहिलं आहे. हे पत्र वाचणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येईल. हे पत्र श्यामभवीने तिच्या वडिलांना वाचून दाखवले तेव्हा वडील डॉ. सुनीत धाय मोकलून रडू लागले. डॉ. अर्चना शर्मा यांची मुलगी मागील ३ दिवसांपासून जयपूरमध्ये आहे. त्याठिकाणाहून तिने हे पत्र आईच्या आठवणीत लिहिलं आहे.

श्यामभवीने तिच्या पत्रात म्हटलंय की, आई तू सर्वात बेस्ट आहेस. जर जगात सर्वात बेस्ट महिलांना निवडलं गेले तर तुझ्यासारखं कुणी चांगलं असू शकत नाही. कारण माझ्या आईला बेस्ट मम्मी अवॉर्ड मिळाला आहे. पण मी रडणार नाही. कारण सर्वांना वाटेल मला तुझी आठवण येतेय. जर मी रडले तर सर्व रडायला सुरुवात करतील. परंतु मी माझ्या आईला क्यूट नावही ठेवले आहे. आतापर्यंत मी तिला प्रेमाने वेगवेगळ्या नावाने हाक मारत होती असं तिने लिहिलं आहे.

श्यामभवी ही राजस्थानच्या दौसा येथे आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टर अर्चना शर्मा यांची मुलगी आहे. काही दिवसांपूर्वी अर्चना यांनी जीव दिला होता. एका गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर दोष ठेवण्यात आला. जेलमध्ये जावं लागेल या भीतीने डॉ. अर्चनाने मानसिक तणावाखाली येत गळफास घेतला. आता त्यांची ८ वर्षाची मुलीनं आईच्या आठवणीत लिहिलेले पत्र समोर आले आहे. हे पत्र तिने तिच्या मित्रांनाही पाठवले. जेव्हा श्यामभवीने लिहिलेले पत्र तिच्या वडिलांनी पाहिले तेव्हा ते ढसाढसा रडले. हे पत्र श्यामभवीच्या मावशीने त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले आहे.

काय आहे प्रकरण?

दौसातील आनंद हॉस्पिटलमध्ये गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी डॉक्टरांविरोधात आक्रोश व्यक्त केला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला. डॉ. अर्चना शर्मा यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली होती. त्यात म्हटलं होतं की, मी कुठलीही चूक केली नाही. कुणालाही मारलं नाही. माझा मृत्यू कदाचित मी निर्दोष असल्याचं सिद्ध करेल. मी पती आणि मुलांवर खूप प्रेम करते. कृपया, माझ्या मृत्यूनंतर त्यांना कुणीही त्रास देऊ नका. पीपीएच कॉम्पलिकेशन होते. त्यासाठी डॉक्टरांना दोष देणे बंद करा. डॉक्टरांना त्रास देऊ नका. माझ्या मुलांना आईची कमतरता भासू देऊ नका असंही मृत्युपूर्वी डॉक्टर अर्चनानं म्हटलं होते.