शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

संशयाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न- मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2024 10:25 IST

मतदानाच्या आकडेवारीवरुन लोकांची दिशाभूल, आम्ही सर्व सांगणार

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: मतदानाच्या आकडेवारीच्या मुद्द्यावरुन संशयाचे वातावरण निर्माण केले जात आहे. आम्ही याबाबत सर्वांना एक दिवशी सविस्तर सांगू. लाेकांची कशी दिशाभूल केली जाते, याचा खुलासा करु, असे देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी सांगितले.

राजीव कुमार यांनी सहकुटुंब दिल्लीत मतदानाचे कर्तव्य पार पाडले. केंद्र निहाय मतदानाची आकडेवारी तसेच फाॅर्म १७ची माहिती जाहीर करण्याचे निवडणूक आयाेगाला निर्देश देण्याची मागणी करणारी याचिका सर्वाेच्च न्यायालयाने फेटाळली आहे. यासंदर्भात राजीव कुमार प्रथमच बाेलले आहेत. ते म्हणाले, न्यायालयाने सत्य स्वीकारले आहे. परंतु,  संशयाचे वातावरण निर्माण करण्यात येत आहे. याबाबत काय खेळ खेळला जात आहे, संशय का निर्माण केला जात आहे? लाेकांची कशी दिशाभूल केली, हे आम्ही सांगू, असे ते म्हणाले.

जम्मू-काश्मिरात लवकरच विधानसभा निवडणूक

जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणुकाची प्रक्रिया आम्ही लवकरच सुरू करणार आहोत, असे राजीवकुमार यांनी सांगितले. ते म्हणाले, की जम्मू-काश्मीरमध्ये लोकसभा निवडणुकांत उत्तम प्रमाणात झालेले मतदान पाहून आनंद झाला आहे. महिलांनी मोठ्या संख्येने मतदान केले आहे. मतदारांनी दाखविलेल्या उत्साह, विश्वासामुळे लोकशाहीची पाळेमुळे आणखी घट्ट रुजण्यास मदत झाली आहे. जनतेला लोकनियुक्त सरकारची आवश्यकता असते. जम्मू-काश्मीरच्या जनतेला ते मिळविण्यास पात्र आहेत. तेथे विधानसभा निवडणुका घेण्यासाठी आम्ही लवकर प्रक्रिया सुरू करणार आहोत, असे राजीवकुमार म्हणाले.

३७० कलम रद्द झाल्यानंतर होणार पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकांची प्रक्रिया सुमारे एक महिनाभर चालते. त्या केंद्रशासित प्रदेशातील मतदारसंघांची पुनर्रचना करण्यात आली असून त्यामुळे विधानसभेच्या जागांची संख्या ८३ वरून ९० पर्यंत पोहोचली आहे. ३० सप्टेंबरच्या आत जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका घ्या, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिला आहे.

किती जणांनी मतदान केले? मतदारसंघनिहाय आकडे प्रसिद्ध

पहिल्या पाच टप्प्यांत झालेल्या मतदानाची मतदारसंघनिहाय मतदानाची आकडेवारी शनिवारी निवडणूक आयोगाने जारी केली. तसेच मतदान झाल्यावर त्यात कोणताही बदल अशक्य असल्याचे सांगत निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही आयोगाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने एका एनजीओची मतदान केंद्रनिहाय मतदानाची टक्केवारी जाहीर करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली हाेती. त्यानंतर आयोगाने पहिल्या पाच टप्प्यातील मतदारसंघनिहाय आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार मतदारसंघातील मतदारांची संख्या आणि किती मतदारांनी मतदान केले, ही माहिती प्रसिद्ध केली. आतापर्यंत आयोगाकडून केवळ मतदानाची टक्केवारी जाहीर केली जात होती.

सर्वाधिक मतदान कुठे ?

  • धुबरी, आसाम    ९२.०८ 
  • ओंगाेल, आंध्र प्रदेश    ८७.०६ 
  • चित्तूर, आंध्र प्रदेश    ८५.७७ 
  • नरसरावपेठ, आंध्र प्रदेश    ८५.६५ 
  • बापटला, आंध्र प्रदेश    ८५.४८ 
  • सर्वात कमी मतदान कुठे?
  • श्रीनगर, जम्मू-काश्मीर    ३८.४९ 
  • नवाडा, बिहार    ४३.१७ 
  • हैदराबाद, तेलंगणा    ४८.४८ 
  • अल्मोडा, उत्तराखंड    ४८.७४ 
  • सिकंदराबाद, तेलंगणा    ४९.०४ 

(आकडे टक्क्यांमध्ये)लाेकांच्या मनात संशय कसा निर्माण हाेताे? कधी ईव्हीएम नीट काम करीत नाही, कदाचित मतदार याद्या चुकीच्या आहेत किंवा मतदानाच्या आकडेवारीत हेराफेरी झाली आहे. सर्वाेच्च न्यायालयाने तर उत्तर दिले आहे. मात्र, आम्हीही आमचे उत्तर देऊ आणि निश्चितच देऊ. -राजीवकुमार, मुख्य निवडणूक आयुक्त

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगVotingमतदान