शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

Amritsar Train Accident : अमृतसरमध्ये रावणदहनासाठी जमलेल्यांना भरधाव ट्रेनने उडवले, 50 हून अधिक जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2018 10:58 IST

पंजाबमधील अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान मोठा अपघात घडला आहे. येथे रावण दहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्या लोकांना रेल्वेने धडक दिल्याने झालेल्या अपघातात अनेकांचा मृत्यू झाला आहे.

अमृतसर - पंजाबमधील अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान मोठा अपघात घडला आहे. येथे रावण दहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्या लोकांना रेल्वेने धडक दिल्याने झालेल्या अपघातात 50 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार येथे आयोजित रावणदहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. त्यावेळी अनेकजण कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभे होते. कार्यक्रम सुरू असतानाच अचानक भरधाव ट्रेन आल्याने बेसावध असलेले लोक ट्रेनखाली चिरडले गेले.   दरम्यान, अपघातात 200 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. 

अमृतसरजवळील जौडा रेल्वेफाटक परिसरातील चौरा बाझार येथे रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होते. त्या कार्यक्रमासाठी हजारो जण उपस्थित होते. रावण दहन झाले  उपस्थितांपैकी अनेक जण ट्रॅकवर उभे होते. त्याचवेळी तेथे भरधाव वेगात आलेली ट्रेन ट्रॅकवर उभ्या असलेल्यांना उडवत निघून गेली. अपघातानंतर घटनास्थळावर मृतदेहांचा खच पडला होता. रावण दहनाचा कार्यक्रम व्यवस्थित दिसावा म्हणून उपस्थित लोक उंचवट्याच्या ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर उभे होते. त्यापैकी अनेक जण या कार्यक्रमाचे चित्रिकरण करत होते. त्याचदरम्यान अचानक ट्रेन आल्याने बेसावध असलेले अनेकजण ट्रेनखाली आले. 

दरम्यान, अपघातात 50 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच या अपघातप्रकरणी सर्व कायदेशीर कारवाई होईल, असे पोलिसांनी सांगितले. रेल्वे मंत्रालयाकडूनही मदत आणि बचाव पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले आहे. तसेच  रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा घटनास्थळाला भेट देण्यासाठी रवाना झाले आहेत. 

या अपघातासाठी स्थानिक प्रशासन आणि दसरा कमिटी जबाबदार आहे, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. तसेच नवज्योत सिंह सिद्धू यांच्या पत्नी कार्यक्रमाला उपस्थित होत्या. मात्र अपघाताचे वृत्त कळताच त्यांनी या ठिकाणाहून काढला पाय घेतल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला. 

 

दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. तसेच पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांसाठी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

 

टॅग्स :Amritsar Train Accidentअमृतसर ट्रेन दुर्घटनाPunjabपंजाबIndian Railwayभारतीय रेल्वे