शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

Amritsar Train Accident : अमृतसरमध्ये रावणदहनासाठी जमलेल्यांना भरधाव ट्रेनने उडवले, 50 हून अधिक जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2018 10:58 IST

पंजाबमधील अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान मोठा अपघात घडला आहे. येथे रावण दहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्या लोकांना रेल्वेने धडक दिल्याने झालेल्या अपघातात अनेकांचा मृत्यू झाला आहे.

अमृतसर - पंजाबमधील अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान मोठा अपघात घडला आहे. येथे रावण दहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्या लोकांना रेल्वेने धडक दिल्याने झालेल्या अपघातात 50 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार येथे आयोजित रावणदहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. त्यावेळी अनेकजण कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभे होते. कार्यक्रम सुरू असतानाच अचानक भरधाव ट्रेन आल्याने बेसावध असलेले लोक ट्रेनखाली चिरडले गेले.   दरम्यान, अपघातात 200 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. 

अमृतसरजवळील जौडा रेल्वेफाटक परिसरातील चौरा बाझार येथे रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होते. त्या कार्यक्रमासाठी हजारो जण उपस्थित होते. रावण दहन झाले  उपस्थितांपैकी अनेक जण ट्रॅकवर उभे होते. त्याचवेळी तेथे भरधाव वेगात आलेली ट्रेन ट्रॅकवर उभ्या असलेल्यांना उडवत निघून गेली. अपघातानंतर घटनास्थळावर मृतदेहांचा खच पडला होता. रावण दहनाचा कार्यक्रम व्यवस्थित दिसावा म्हणून उपस्थित लोक उंचवट्याच्या ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर उभे होते. त्यापैकी अनेक जण या कार्यक्रमाचे चित्रिकरण करत होते. त्याचदरम्यान अचानक ट्रेन आल्याने बेसावध असलेले अनेकजण ट्रेनखाली आले. 

दरम्यान, अपघातात 50 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच या अपघातप्रकरणी सर्व कायदेशीर कारवाई होईल, असे पोलिसांनी सांगितले. रेल्वे मंत्रालयाकडूनही मदत आणि बचाव पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले आहे. तसेच  रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा घटनास्थळाला भेट देण्यासाठी रवाना झाले आहेत. 

या अपघातासाठी स्थानिक प्रशासन आणि दसरा कमिटी जबाबदार आहे, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. तसेच नवज्योत सिंह सिद्धू यांच्या पत्नी कार्यक्रमाला उपस्थित होत्या. मात्र अपघाताचे वृत्त कळताच त्यांनी या ठिकाणाहून काढला पाय घेतल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला. 

 

दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. तसेच पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांसाठी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

 

टॅग्स :Amritsar Train Accidentअमृतसर ट्रेन दुर्घटनाPunjabपंजाबIndian Railwayभारतीय रेल्वे