शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

Amritsar Train Accident : अमृतसरमध्ये रावणदहनासाठी जमलेल्यांना भरधाव ट्रेनने उडवले, 50 हून अधिक जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2018 10:58 IST

पंजाबमधील अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान मोठा अपघात घडला आहे. येथे रावण दहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्या लोकांना रेल्वेने धडक दिल्याने झालेल्या अपघातात अनेकांचा मृत्यू झाला आहे.

अमृतसर - पंजाबमधील अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान मोठा अपघात घडला आहे. येथे रावण दहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्या लोकांना रेल्वेने धडक दिल्याने झालेल्या अपघातात 50 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार येथे आयोजित रावणदहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. त्यावेळी अनेकजण कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळांवर उभे होते. कार्यक्रम सुरू असतानाच अचानक भरधाव ट्रेन आल्याने बेसावध असलेले लोक ट्रेनखाली चिरडले गेले.   दरम्यान, अपघातात 200 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. 

अमृतसरजवळील जौडा रेल्वेफाटक परिसरातील चौरा बाझार येथे रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होते. त्या कार्यक्रमासाठी हजारो जण उपस्थित होते. रावण दहन झाले  उपस्थितांपैकी अनेक जण ट्रॅकवर उभे होते. त्याचवेळी तेथे भरधाव वेगात आलेली ट्रेन ट्रॅकवर उभ्या असलेल्यांना उडवत निघून गेली. अपघातानंतर घटनास्थळावर मृतदेहांचा खच पडला होता. रावण दहनाचा कार्यक्रम व्यवस्थित दिसावा म्हणून उपस्थित लोक उंचवट्याच्या ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर उभे होते. त्यापैकी अनेक जण या कार्यक्रमाचे चित्रिकरण करत होते. त्याचदरम्यान अचानक ट्रेन आल्याने बेसावध असलेले अनेकजण ट्रेनखाली आले. 

दरम्यान, अपघातात 50 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच या अपघातप्रकरणी सर्व कायदेशीर कारवाई होईल, असे पोलिसांनी सांगितले. रेल्वे मंत्रालयाकडूनही मदत आणि बचाव पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले आहे. तसेच  रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा घटनास्थळाला भेट देण्यासाठी रवाना झाले आहेत. 

या अपघातासाठी स्थानिक प्रशासन आणि दसरा कमिटी जबाबदार आहे, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. तसेच नवज्योत सिंह सिद्धू यांच्या पत्नी कार्यक्रमाला उपस्थित होत्या. मात्र अपघाताचे वृत्त कळताच त्यांनी या ठिकाणाहून काढला पाय घेतल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला. 

 

दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. तसेच पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांसाठी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

 

टॅग्स :Amritsar Train Accidentअमृतसर ट्रेन दुर्घटनाPunjabपंजाबIndian Railwayभारतीय रेल्वे