शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

अमित शहांचे पुत्र ठोकणार १०० कोटींचा दावा , कंपनीची उलाढाल १६ हजार पटीने वाढल्याचा ‘द वायर’ वेबसाइटचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 03:26 IST

भाजपा अध्यक्ष अमित शहा यांचे चिरंजीव जय यांच्या मालकीच्या कंपनीची उलाढाल तब्बल १६,००० पटींनी वाढल्याच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष आणि भाजपा आमनेसामने उभे ठाकले आहेत.

नवी दिल्ली : भाजपा अध्यक्ष अमित शहा यांचे चिरंजीव जय यांच्या मालकीच्या कंपनीची उलाढाल तब्बल १६,००० पटींनी वाढल्याच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष आणि भाजपा आमनेसामने उभे ठाकले आहेत.शहा यांचे चिरंजीव जय यांनी या प्रकरणाचा भंडाफोड करणारी वेबसाइट ‘द वायर’ विरुद्ध १०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ‘अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप करून भाजपा अध्यक्ष अमित शहा यांची प्रतिमा मलिन करण्याचे षड्यंत्र रचण्यात आले आहे,’ असा आरोप जय यांचा बचाव करण्यासाठी समोर आलेले केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केला आहे. ‘द वायर’ आणि तिच्या रिपोर्टविरुद्ध १०० कोटींचा फौजदारी मानहानीचा दावा ठोकण्याचा इशाराही गोयल यांनी दिला.गोयल पुढे म्हणाले, जय हे कायद्याचे पालन करणारे व्यावसायिक आहेत. त्यांच्या कंपनीत सर्व व्यवहारांचा हिशेब कायद्यानुसार केला जातो. त्यांना बँकेकडून कर्ज मिळाले नाही. त्यामुळे त्यांना ‘अनसेक्युअर्ड’ कर्ज घ्यावे लागले. जे कर्ज घेतले ते त्यांनी सव्याज टीडीएस वजा करून फेडलेले आहे.दरम्यान, जय अमित शहा यांनीही एक निवेदन प्रसिद्ध करून आपली बाजू मांडली आहे. ही बातमी छापणाºया वेबसाइटचा लेखक, संपादक आणि मालक यांच्याविरुद्ध आपण १०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकणार असल्याचे जय यांनी जाहीर केले आहे.१६ कोटी रुपयांचे असुरक्षित कर्जजयच्या कंपनीच्या‘टर्नओव्हर’मधील वाढीचे कारण १५ कोटी ७८ लाख रुपयांचे असुरक्षित कर्ज आहे. राजेश खंडवाल यांच्या ‘फायनेन्शिअर सर्व्हिसेस फर्म’ने हे उपलब्ध करून दिले आहे. खंडवाल हे भाजपाचे खासदार व रिलायन्स इंडस्ट्रीजचे अधिकारी परिमल नथवानी यांचे व्याही आहेत.५१ कोटी रुपयांचे विदेशी उत्पन्न दाखविले२०१३-१४ मध्ये जयच्या कंपनीकडे कुठलीही अचल संपत्ती नव्हती आणि ‘स्टॉक’देखील नव्हता. कंपनीला त्या वर्षी ५ हजार ७९६ रुपयांचा आयकर परतावा मिळाला होता. संकेतस्थळ ‘द वायर’नुसार, त्यानंतर कंपनीच्या एकूण संपत्तीची किंमत २ लाख रुपये झाली. त्यासोबतच कंपनीने व्यापारासाठी एकूण २ कोटी ६५ लाख रुपयांचे देयक अदा केले. याअगोदरच्या वर्षात हा आकडा अवघा ५ हजार ६१८ रुपये इतका होता. मागील वर्षी शून्य असलेले विदेशी उत्पन्न कंपनीने यंदा ५१ कोटी रुपये इतके दाखविले आहे.पंतप्रधान सीबीआय चौकशी करतील काय-सिब्बलभारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांचे चिरंजीव जय यांच्यावरील आरोपांची गंभीर दखल घेऊन काँग्रेस, डावे पक्ष व आप यांनी प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी हा भांडवलशाहीचा प्रकार असल्याचे म्हटले आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करतील काय, असा प्रश्न विचारला आहे.सिब्बल यांनी रविवारी पत्रकार परिषदेत बोलताना मोदी यांना घेरले. पंतप्रधानांचे या भांडवलशाहीबद्दल काय म्हणणे आहे. ते या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करतील काय? अंमलबजावणी संचालनालयाला दोषी व्यक्तींना अटक करण्याचे आदेश देतील काय? असे प्रश्न सिब्बल यांनी विचारले.२०१४ मध्ये भाजपा सत्तेवर आल्यानंतर जय यांच्या टेम्पल इंटरप्रायजेस कंपनीतील आर्थिक उलाढालीत मोठी वाढ झाल्याचा दावा द वायर वेबसाईटवरील बातमीत करण्यात आला आहे. कंपनीच्या संपत्तीमध्ये २०१५-२०१६ या वर्षात १६ हजार टक्के वाढ झाली तर, त्यापूर्वीच्या वर्षी कंपनीला सुमारे ८० कोटी रुपयांचा नफा झाला होता. कंपनी निबंधकाच्या आकडेवारीच्या आधारे हा दावा करण्यात आला आहे. त्यावरून विरोधी पक्षांनी भाजपाला कोंडीत पकडले आहे.या प्रकरणाची न्यायालयाच्या देखरेखीखाली विशेष एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपा नेते डी. राजा यांनी केली आहे.आम आदमी पार्टीनेही भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. फौजदारी चौकशी व्हायलाच पाहिजे, असे या पक्षाने म्हटले आहे.

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपा