शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
4
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
5
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
7
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
8
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
9
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
10
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
11
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

शरणार्थ्यांना CAA अंतर्गत केव्हापासून मिळणार नागरिकत्व? अमित शाह यांनी केलं मोठं वक्तव्य

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: February 11, 2021 20:23 IST

शाह म्हणाले, ''आम्ही CAA घेऊन आलो, मधेच कोरोना आला. ममता दीदी म्हणत आहेत, की हे खोटे आश्वासन आहे. आम्ही जे म्हणतो ते करतो. (Citizen Amendment Act)

नवी दिल्ली - कोरोना लसिकरण कार्यक्रम (Corona vaccination) संपल्यानंतर, सीएए (CAA) अंतर्गत शरणार्थ्यांना नागरिकता द्यायला सुरुवात केली जाईल, असे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी आज स्पष्ट केले. ''सीएएच्या मुद्यावर विरोधक अल्पसंख्यकांची दिशाभूल करत आहेत. भारतीय अल्पसंख्यकांच्या नागरिकत्वावर याचा काहीही परिणाम होणार नाही,'' असे शाह यांनी म्हटले आहे. ते मतुआ समुदाय बहुल असलेल्या ठाकुरनगर भागात एका सभेला संबोधित करत होते. (Amit Shah says we will start granting citizenship to refugees under CAA after Corona vaccination ends)

शाह म्हणाले, ''आम्ही CAA घेऊन आलो, मधेच कोरोना आला. ममता दीदी (Mamata Banerjee) म्हणत आहेत, की हे खोटे आश्वासन आहे. आम्ही जे म्हणतो ते करतो. लसिकरणाचा कार्यक्रम संपताच आणि कोरोनापासून मुक्ती मिळताच, भाजप आपल्या सर्वांना नागरिकत्व देण्याचे काम करेल.''

निवडणूक संपता-संपता ममता दीदीही म्हणतील 'जय श्रीराम', बंगलामध्ये दिसला अमित शाहंचा रुद्रावतार

आता ममता बॅनर्जी सीएएला लागू करण्याला विरोध करण्याच्या स्थितीत नसतील. कारण विधानसभा निवडणुकीनंतर त्या मुंख्यमंत्री नसतील. मोदी सरकारने 2018 मध्येच नवा नागरिकता कायदा आणण्याचे आश्वासन दिले होते आणि 2019 मध्ये भाजप सत्तेवर येताच, हे आश्वासन पूर्ण करण्यात आले, असेही शाह म्हणाले.

...तेव्हा ममता दीदीही म्हणतील 'जय श्रीराम'यापूर्वी अमित शाह यांनी कूचबिहार येथील जाहीर सभेत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर निशाणा साधला. केंद्रीय गृह मंत्री अमित शाह म्हणाले, बंगालमध्ये ममता बॅनर्जी या गुंडांच्या बळावर निवडणूक जिंकतात. बंगलामध्ये जय श्री राम म्हणायचे नाही, तर पाकिस्तानात म्हणणार का? निवडणूक संपता-संपता ममता बॅनर्जी देखील जय श्रीराम म्हणायला लागतील. ममता बॅनर्जी केवळ एका समाजाची मते घेण्यासाठीच असे करतात. यावेळी ते म्हणाले हिंदुस्तानात प्रत्येक धर्माचा आदर होईल. 

समाजात दुही पाडण्यासाठी रथयात्रेचा भाजपकडून वापर; मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा आरोप

टॅग्स :Amit Shahअमित शहाMamata Banerjeeममता बॅनर्जीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकBJPभाजपाwest bengalपश्चिम बंगाल