शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

Amit Shah, Article 370: "रक्ताचे पाट वाहतील म्हणणारे लोक साधा छोटासा दगडही मारू शकले नाहीत"; ३७० कलमाबाबतच्या निर्णयावर अमित शाह यांचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 20:32 IST

सर्जिकल स्ट्राईकच्या मुद्द्यावरही केलं भाष्य

Amit Shah, Article 370: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ ऑगस्ट २०१९ रोजी काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केले. केंद्र सरकार आपल्या भूमिकेवर ठाम होती. अनेकांनी त्यावेळी या कलमाबाबतच्या निर्णयाचा विरोध केला. आंदोलने करून प्रश्नाला हिंसक वळण देण्याचा प्रयत्नदेखील करण्यात आला. पण ज्या लोकांनी मोठ्या मोठ्या गप्पा रंगवल्या, ते लोक केंद्र सरकारच्या ठाम भूमिकेमुळे नंतर काहीच करून शकले नाहीत, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी विरोधकांवर निशाणा साधला. ३७० कलम रद्द केल्यास रक्ताचे पाट वाहतील (खून की नदी बहेंगे) अशा शब्दांत लोकांची माथी भडकवण्याचा प्रयत्न करणारे नंतर साधा छोटा दगड मारण्याचंही धाडस करू शकले नाहीत", असेही ते म्हणाले. दिल्लीत 'आइडिया ऑफ इंडिया फ्रॉम स्वराज टू न्यू इंडिया' या परिसंवादात ते बोलत होते.

"पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने ५ ऑगस्ट २०१९ ला अतिशय सहजपणे ३७० कलम रद्द केले. त्यावेळी अनेक जण धमक्या देऊन लोकांची माथी भडकवत होते. कलम रद्द झाल्यास रक्ताच्या नद्या वाहतील असं म्हणणारे लोक सरकारने केलेल्या धोरणांपुढे साधा एक छोटासा दगडही मारू शकले नाहीत", अशा शब्दांत अमित शाह यांनी थेट विरोधकांवर टीका केली.

सुरक्षा धोरण आणि सर्जिकल स्ट्राईक...

अमित शाह यांनी सर्जिकल स्ट्राईकच्या मुद्द्यावर बोलताना देशांतर्गत सुरक्षा धोरणावर भाष्य केले. "नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होण्याआधी भारताकडे ठोस सुरक्षा धोरण (defence policy) नव्हते. जरी एखादे धोरण असेल तरीही त्यात परराष्ट्र धोरणाचीच छबी दिसत असायची. आधी दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या संघटना आपल्या देशात दहशतवादी पाठवायचे आणि हल्ले घडवून आणायचे. उरी आणि पुलवामा असे हल्लेही आपल्या देशात घडले. पण त्यानंतर दहशतवाद्यांना भारताने सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आणि देशाचे सुरक्षा धोरण किती मजबूत आहे याची प्रचिती जगाला आली", असेही शाह यांनी नमूद केले.

टॅग्स :Amit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदीJammu Kashmirजम्मू-काश्मीर