शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

Farm laws Repeal: “कृषी कायदे रद्दची घोषणा ही PM मोदींची अप्रतिम मुत्सद्देगिरी”; अमित शाहांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 18:53 IST

Farm laws Repeal: कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा करून पंतप्रधान मोदींनी अप्रतिम मुत्सद्देगिरी दाखवली आहे, या शब्दांत अमित शाह यांनी कौतुक केले आहे.

नवी दिल्ली: वादग्रस्त केंद्रीय कृषी कायद्याविरोधात गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मोठे यश आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) तीनही कृषी कायदे रद्द (Farm laws Repeal) करण्याचा निर्णय जाहीर केला. यानंतर विरोधक आणि शेतकरी आंदोलकांसह अनेकांनी या निर्णयाचे स्वागत करत केंद्रातील मोदी सरकारवर निशाणाही साधला आहे. यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अप्रतिम मुत्सद्देगिरी दाखवली आहे, या शब्दांत अमित शाह यांनी कौतुक केले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करत केंद्रीय कृषी कायदे रद्द करत असल्याचे जाहीर केले. परंतु, शेतकरी आंदोलन यापुढेही सुरूच राहील. लगेच ते मागे घेणार नाही, अशी भूमिका शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी मांडली. तर, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी टीका विरोधकांनी केली. यानंतर भाजप नेत्यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. अमित शाह यांनी ट्विटर करत पंतप्रधान मोदींच्या निर्णयाचे समर्थन केले. 

पंतप्रधान मोदींची अप्रतिम मुत्सद्देगिरी

केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेची विशेष गोष्ट म्हणजे त्यांनी यासाठी ‘गुरुपूरब’ हा खास दिवस निवडला. त्याच्यासाठी प्रत्येक भारतीयाच्या कल्याणाशिवाय दुसरा कोणताही विचार नाही, हेही यातून दिसून येते. त्यांनी अप्रतिम मुत्सद्देगिरी दाखवली आहे, असे ट्विट अमित शाह यांनी म्हटले आहे. 

शेतकऱ्यांबद्दल संवेदनशीलता व वचनबद्धता दर्शवते

केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली घोषणा देशाचे अन्नदाते, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी त्यांची असलेली संवेदनशीलता आणि वचनबद्धता दर्शवते. गुरू नानक देवजींच्या प्रकाश पर्वाच्या निमित्ताने हे पाऊल सर्वांना सोबत घेऊन देशाला पुढे नेण्याचा पंतप्रधान मोदींचा संकल्प अधोरेखित करते, असे ट्विट केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी करत या निर्णयाला पाठिंबा दर्शवला

भारतीय जनता पक्ष सर्वांच्या मतांचा आदर करतो

पंतप्रधान मोदींचे आभार मानतो आणि त्यांनी उचललेल्या या पावलाचे स्वागत करतो. असे कायदे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यात अत्यावश्यक भूमिका बजावू शकतात. पण शेतकऱ्यांचा एक मोठा गट या कायद्यांच्या विरोधात आहे. त्यांच्या भावनांचा आदर करत हे कायदे परत घेण्यात आले आहेत, अशी प्रतिक्रिया उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली.  

टॅग्स :Amit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदीFarmers Protestशेतकरी आंदोलन