शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

Amit Shah: “काश्मीरमध्ये मोठे बदल, ५ ऑगस्ट २०१९ ही तारीख सुवर्णाक्षरांनी लिहिली जाईल”: अमित शाह 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2021 08:50 IST

Amit Shah: अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा हा पहिलाच जम्मू-काश्मीर दौरा आहे.

ठळक मुद्दे५ ऑगस्ट २०१९ ही तारीख सुवर्णाक्षरांनी लिहिली जाईलदगडफेकीच्या घटनांमध्ये मोठी घट झाली आहेकाश्मीर खोऱ्यात भ्रष्टाचार आणि दहशतवाद यांचा अंत

श्रीनगर: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) सध्या जम्मू-काश्मीर (Jammu And Kashmir) दौऱ्यावर आहेत. तीन दिवसीय दौऱ्यादरम्यान अमित शाह यांनी श्रीनगर येथे एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी बोलताना अमित शाह यांनी अनुच्छेद ३७० (Article 370) रद्द करण्याचे पुन्हा एकदा समर्थन केले आहे. गेल्या अडीच वर्षात काश्मीरमधील हिंसा कमी झाली आहे. दगडफेकीच्या घटनांमध्ये मोठी घट झाली आहे. काश्मीरमध्ये मोठे बदल होत असून, ०५ ऑगस्ट २०१९ ही तारीख सुवर्णाक्षरांनी लिहिली जाईल, असे प्रतिपादन अमित शाह यांनी यावेळी बोलताना केले. 

जम्मू-काश्मीर तसेच काश्मीर खोऱ्यात भ्रष्टाचार आणि दहशतवाद यांचा अंत झाला आहे. तसेच काश्मीरमधील युवा वर्ग आता विकास, रोजगार, शिक्षण, अभ्यास याचा विचार करू लागला आहे. हा खूप मोठा बदल आहे. काश्मीरमधील हा बदल कायम राहील. तसेच काश्मीरचा विकास कोणीही थांबवू शकत नाही, अशी ग्वाही अमित शाह यांनी यावेळी बोलताना दिली. 

५ ऑगस्ट २०१९ ही तारीख सुवर्णाक्षरांनी लिहिली जाईल

जम्मू-काश्मीरमधील ७० टक्के लोकसंख्या ही ३५ वर्षांपेक्षा कमी वयोगटातील आहे. या वयोगटातील लोकांचा आत्मविश्वास वाढवून त्यांना विकासाची जोडल्यास काश्मीरमध्ये पुन्हा एकदा शांतता निश्चितपणे नांदू शकेल. पूर्ण प्रदेशातील ४५०० तरुण क्लब रजिस्टर्ड असून, ४२२९ गावांतील तरुणांच्या कल्याणासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे सांगत जम्मू-काश्मीरच्या इतिहासात ५ ऑगस्ट २०१९ ही तारीख सुवर्णाक्षरांनी लिहिली जाईल. आता युवा वर्गावर मोठी जबाबदारी असल्याचे अमित शाह यांनी यावेळी म्हटले आहे. 

दरम्यान, अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा हा पहिलाच जम्मू-काश्मीर दौरा आहे. संपूर्ण जम्मू काश्मीरात सुरक्षा यंत्रणांना सतर्क ठेवण्यात आले आहे. सुरक्षा दलाच्या परवानगीशिवाय याठिकाणी काहीही करणे कठीण आहे. श्रीनगरच्या १५ अतिसंवेदनशील भागात ड्रोनच्या माध्यमातून हवाई देखरेख ठेवण्यात आली आहे. अमित शाह यांचा जम्मू काश्मीर दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरAmit Shahअमित शाह