शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
7
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
8
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
9
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
10
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
11
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
12
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
13
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
15
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
16
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
17
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
18
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
19
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
20
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान

कोणत्याही परिस्थितीत CAA मागे घेणार नाही; अमित शाह कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 15:13 IST

देशाचे तुकडे होण्यासाठी काँग्रेसच जबाबदार असल्याचा आरोप करत पंतप्रधान मोदींनी अनेक वर्षांपासून पीडित असलेल्या दुसऱ्या देशातील निर्वासितांच्या जीवनात नवीन आध्याय सुरू केल्याचे शाह यांनी म्हटले. 

नवी दिल्ली - नागरिकता संशोधन कायद्याच्या (CAA) समर्थनात मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लखनौ येथे घेतलेल्या सभेत आपण हा कायदा कदापी मागे घेणार नसल्याचे खडसावून सांगितले. 'भारता माता की जय'चा जयघोष करत शाह यांनी देशात सीसीए कायद्यावरून होणाऱ्या हिंसेला विरोधी पक्ष जबाबदारी असल्याचे सांगितले. 

अमित शाह म्हणाले की, नागरिकता कायद्यामुळे मुस्लिमांचे नागरिकत्व रद्द होईल असे गैरसमज पसरवले जात आहेत. ममता दीदी, राहुल बाबा, अखिलेश यादव तुम्ही चर्चा करण्यासाठी सार्वजनिक ठिकाण शोधून ठेवा. आमचा स्वतंत्र देव चर्चा करण्यासाठी तयार असल्याचे शाह यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले. 

सीसीएमधील एकही कलम एखाद्या मुस्लीम, अल्पसंख्यांकाची नागरिकता घेत असेल तर मला कळवावे, असे आवाहन शाह यांनी केले आहे. यावेळी शाह यांनी जेएनयूच्या मुद्दावर आपले मत मांडले. दोन वर्षांपूर्वी जेएनयूमध्ये देशविरोधी नारेबाजी करण्यात आली.  भारताचे हजार तुकडे करण्याची इच्छा ठेवणाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी  कारागृहात टाकले. मात्र राहुल गांधी यावर म्हणतात की, विद्यार्थ्यांना बोलण्याचे स्वातंत्र आहे.

मी विरोधकांना खडसावून सांगू इच्छितो की, कोणत्याही परिस्थितीत CAA कायदा मागे घेतला जाणार नसल्याचे शाह यांनी सांगितले. यावेळी त्यांनी देशाचे तुकडे होण्यासाठी काँग्रेसच जबाबदार असल्याचा आरोप करत पंतप्रधान मोदींनी अनेक वर्षांपासून पीडित असलेल्या दुसऱ्या देशातील निर्वासितांच्या जीवनात नवीन आध्याय सुरू केल्याचे शाह यांनी म्हटले.