शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

कोणत्याही परिस्थितीत CAA मागे घेणार नाही; अमित शाह कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 15:13 IST

देशाचे तुकडे होण्यासाठी काँग्रेसच जबाबदार असल्याचा आरोप करत पंतप्रधान मोदींनी अनेक वर्षांपासून पीडित असलेल्या दुसऱ्या देशातील निर्वासितांच्या जीवनात नवीन आध्याय सुरू केल्याचे शाह यांनी म्हटले. 

नवी दिल्ली - नागरिकता संशोधन कायद्याच्या (CAA) समर्थनात मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लखनौ येथे घेतलेल्या सभेत आपण हा कायदा कदापी मागे घेणार नसल्याचे खडसावून सांगितले. 'भारता माता की जय'चा जयघोष करत शाह यांनी देशात सीसीए कायद्यावरून होणाऱ्या हिंसेला विरोधी पक्ष जबाबदारी असल्याचे सांगितले. 

अमित शाह म्हणाले की, नागरिकता कायद्यामुळे मुस्लिमांचे नागरिकत्व रद्द होईल असे गैरसमज पसरवले जात आहेत. ममता दीदी, राहुल बाबा, अखिलेश यादव तुम्ही चर्चा करण्यासाठी सार्वजनिक ठिकाण शोधून ठेवा. आमचा स्वतंत्र देव चर्चा करण्यासाठी तयार असल्याचे शाह यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले. 

सीसीएमधील एकही कलम एखाद्या मुस्लीम, अल्पसंख्यांकाची नागरिकता घेत असेल तर मला कळवावे, असे आवाहन शाह यांनी केले आहे. यावेळी शाह यांनी जेएनयूच्या मुद्दावर आपले मत मांडले. दोन वर्षांपूर्वी जेएनयूमध्ये देशविरोधी नारेबाजी करण्यात आली.  भारताचे हजार तुकडे करण्याची इच्छा ठेवणाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी  कारागृहात टाकले. मात्र राहुल गांधी यावर म्हणतात की, विद्यार्थ्यांना बोलण्याचे स्वातंत्र आहे.

मी विरोधकांना खडसावून सांगू इच्छितो की, कोणत्याही परिस्थितीत CAA कायदा मागे घेतला जाणार नसल्याचे शाह यांनी सांगितले. यावेळी त्यांनी देशाचे तुकडे होण्यासाठी काँग्रेसच जबाबदार असल्याचा आरोप करत पंतप्रधान मोदींनी अनेक वर्षांपासून पीडित असलेल्या दुसऱ्या देशातील निर्वासितांच्या जीवनात नवीन आध्याय सुरू केल्याचे शाह यांनी म्हटले.