शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

छत्तीसगडमधील नक्षली हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमित शाहांची आसाममधील निवडणूक रॅली रद्द!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2021 16:22 IST

amit shah cancels election campaign rally in assam : दिल्लीमध्ये अमित शाह हे छत्तीसगडमध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत परिस्थितीविषयी चर्चा करतील.

ठळक मुद्देअमित शाह यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याशी या घटनेविषयी चर्चा केली असून त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

नवी दिल्ली : छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त विजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या सीमा भागात शनिवारी सुरक्षा दलातील आणि नक्षलवाद्यांच्या चकमकीदरम्यान २२ जवान शहीद झाले. तर काही अद्याप जवान बेपत्ता असल्याची माहिती आहे. यातच आसाममध्ये विधानसभा निवडणूक प्रचार सभेसाठी दाखल झालेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या नक्षली हल्ल्याबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्याचबरोबर, त्यांनी आज राज्यात होणाऱ्या निवडणुकांचा सभा सुद्धा रद्द केल्या आहेत. तसेच, आजच दुपारी ते दिल्लीला परतत आहेत. दिल्लीमध्ये ते छत्तीसगडमध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत परिस्थितीविषयी चर्चा करतील. (amit shah cancels election campaign rally in assam in wake of chhattisgarh sukma naxal attack)

अमित शाह यांनी रविवारी आसाममधील आपल्या निवडणूक प्रचार कार्यक्रम रद्द केला असून सुकमा येथील नक्षलवादी हल्ल्याबद्दल ते गंभीर आहेत, अशी माहिती भाजपा नेते जितेंद्र सिंह यांनी दिली आहे. ते आज दिल्लीला परतत आहेत. आसाममध्ये प्रस्तावित अमित शाह यांच्या 3 पैकी केवळ 1 रॅलीचे आयोजन केले आहे, असेही जितेंद्र सिंह यांनी सांगितले. दरम्यान, याआधी रविवारी सकाळी गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट केले आहे. 

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांशी लढा देताना शहीद झालेल्या आमच्या बहादूर सुरक्षा जवानांच्या बलिदानास मी सलाम करतो. त्याचा पराक्रम देश कधीही विसरणार नाही, असे अमित शाह यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे. आम्ही शांतता आणि प्रगतीच्या या शत्रूंविरूद्ध आपला लढा सुरू ठेवू. जखमी जवान लवकरच बरे होतील, यासाठी माझ्या त्यांना शुभेच्छा, असेही अमित शाह यांनी म्हटले आहे. तसेच, अमित शाह यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याशी या घटनेविषयी चर्चा केली असून त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत २२ जवान शहीद!छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त विजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या सीमा भागात शनिवारी सुरक्षा दलातील आणि नक्षलवाद्यांच्या चकमकीदरम्यान २२ जवान शहीद झाले. सुरक्षा दलावर नक्षलवादी संघटना पीपल्स लिबरेशन ग्रुप आर्मी प्लाटून वनच्या युनिटनं केला होता. सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत १५ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. परंतु सुरक्षा दलाचे जवान ज्यावेळी आत शिरत होते त्याचवेळी नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. तीन प्रकारे त्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला केला. सुरूवातीला बुले, त्यानंतर अन्य हत्यारं आणि रॉकेट लाँचरने २००-३०० नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला केल्याचे सांगण्यात आले. 

(नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत २२ जवान शहीद; रॉकेट लाँचर, LMG नं केला होता हल्ला)

 

टॅग्स :Amit Shahअमित शहाnaxaliteनक्षलवादीAssam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१