शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकरांना संस्कृतला राष्ट्रभाषा करायचे होते; संस्कृत केवळ ब्राह्मणांची नाही, विज्ञान आणि एकतेची भाषा: मुरली मनोहर जोशी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2017 15:54 IST

संस्कृत भाषेसंदर्भात समाजामध्ये अनेक गैरसमज आहेत. मात्र भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संस्कृत ही राष्ट्रभाषा व्हावी हा प्रस्ताव संविधान निर्मिती सभेच्या बैठकीत ठेवला होता. मात्र तत्कालिन राजकारणात संस्कृत भाषेचा पराभव झाला. संस्कृतचे वैज्ञानिक महत्त्व लक्षात घेता तिला तळागाळापर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे व त्यासाठी शिक्षणात ही भाषा अनिवार्य करायला हवी, असे मत ...

संस्कृत भाषेसंदर्भात समाजामध्ये अनेक गैरसमज आहेत. मात्र भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संस्कृत ही राष्ट्रभाषा व्हावी हा प्रस्ताव संविधान निर्मिती सभेच्या बैठकीत ठेवला होता. मात्र तत्कालिन राजकारणात संस्कृत भाषेचा पराभव झाला. संस्कृतचे वैज्ञानिक महत्त्व लक्षात घेता तिला तळागाळापर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे व त्यासाठी शिक्षणात ही भाषा अनिवार्य करायला हवी, असे मत माजी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ.मुरलीमनोहर जोशी यांनी व्यक्त केले. प्रज्ञाभारती डॉ. श्रीधर भास्कर वर्णेकर जन्मशताब्दी महोत्सव समिती व अभ्यंकर नगर नागरिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मानवंदना’ कार्यक्रमादरम्यान मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते.लक्ष्मीनगर येथील सायंटिफि सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी, समितीचे कार्याध्यक्ष राम खांडवे, अभ्यंकर नगर नागरिक मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर शेन्द्रे, सचिव रवींद्र कासखेडीकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ.आंबेडकरांनी मांडलेल्या प्रस्तावाला मुस्लिम सदस्यांनीदेखील अनुमोदन दिले होते. संस्कृत ब्राम्हणांची भाषा आहे, असे तेव्हा कुणीच म्हटले नव्हते. उलट ती एकतेची भाषा आहे असे अनुमोदन देणाºयांनी म्हटले होते. संस्कृतमध्ये सर्वच विज्ञानांचा समावेश असून केवळ पूजा अर्चनेची ती भाषा नाही. अनेक पाश्चिमात्य संशोधकांनीदेखील संस्कृतचे दाखले दिले आहेत, असे डॉ.जोशी यावेळी म्हणाले. 

संस्कृत भाषा अनिवार्य हवीसंस्कृत भाषेचा प्रचार-प्रसार व्हावा यासाठी रालोआच्या कार्यकाळात आम्ही विविध प्रयत्न केले होते. ‘सीबीएसई’शी संबंधित एका प्रकरणात तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी ‘संस्कृतला शिक्षणात अनिवार्य का करत नाही’ असा प्रश्नच केला होता. संस्कृत भाषेला अनिवार्य करणे ही काळाची आवश्यकता आहे. जोपर्यंत ही बाब क्रियान्वित होत नाही, तोपर्यंत देश वसाहतवादाच्या जोखडातून बाहेर निघणार नाही, असे डॉ.जोशी यांनी प्रतिपादन केले.

संघातील गीते दूरदर्शनवर ?दरम्यान, यावेळी गडकरी यांनी संघातील विविध गीतांवर भाष्य केले. संघातील गाण्यांचे लेखक कोण ते कळत नाही. मात्र याच्या भावार्थात सकारात्मक संदेश असतो. सामाजिक व राष्ट्रीय प्रेरणा देणारी ही गीतं दूरदर्शनच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचावे यासाठी प्रयत्न व्हावेत अशी विनंती केंद्रीय सूचना व प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांना केली आहे अशी माहिती नितीन गडकरी यांनी यावेळी दिली.