शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

अमरनाथ यात्रा सलग दुसऱ्या दिवशी स्थगित, ५० हजार भाविक अडकले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2023 10:41 IST

मार्ग पावसामुळे खचला : पूल गेले वाहून, पावसाचा जोर कायम, शुक्रवारी पंचतर्णी आणि शेषनाग या ठिकाणावरून जवळपास आठ हजार भाविक गुफेच्या दिशेने रवाना झाले होते

शिवराज बिचेवार

थेट अमरनाथ यात्रेतून :  पाऊस, बर्फवृष्टी आणि खराब हवामानामुळे अमरनाथ यात्र सलग दुसऱ्या दिवशी स्थगित करण्यात आली. अमरनाथ गुफेकडून बालटालकडे येणारा परतीचा मार्ग पावसामुळे पूर्णपणे खचला आहे. ठिकठिकाणी या मार्गावरील पूलही वाहून गेले आहेत. विविध तळांवर सुमारे ५० हजार भाविक अडकले आहेत. त्यापैकी चार हजारांवर भाविक पंचतर्णी येथे अडकले आहेत. याठिकाणी आयटीबीपीने उभारलेल्या तंबूतही पाणी शिरले आहे, तर वीजपुरवठा बंद असल्याने कुटुंबीयांचा या भाविकांशी संपर्क होत नाही. 

शुक्रवारी पंचतर्णी आणि शेषनाग या ठिकाणावरून जवळपास आठ हजार भाविक गुफेच्या दिशेने रवाना झाले होते. त्यातील जवळपास एक हजार भाविक सुखरूप बालटाल येथे पोहोचले, तर चार ते पाच हजार भाविक हे पंचतर्णी येथेच अडकले आहेत. पावसामुळे यात्रा तीन दिवसांसाठी स्थगित करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आल्याने पंचतर्णी येथे भाविक तंबूत शून्य अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानात कुडकुडत दिवस काढत आहेत.  तंबूमध्ये थांबण्यासाठी एका भाविकाकडून ६५० रुपये घेण्यात येत होते. परंतु, आता बालटालकडे परत येण्यासाठी मार्गच नसल्यामुळे तंबू व्यावसायिकांनी प्रत्येकी एक हजार रुपये उकळले. हजारो भाविक श्रीनगरध्येच थांबले असून, तेथील हॉटेल व्यावसायिकांनीही आपले दर वाढविले आहेत. 

उपर देख के भागना है अमरनाथ दर्शनानंतर भर पावसात भाविक बालटालच्या दिशेने येत असताना दरड कोसळण्यास सुरुवात झाली. त्यामुळे भाविकांना परत गुफेकडे जाणेही शक्य नव्हते. त्यामुळे अनेकांनी अशा परिस्थितीतच बालटाल गाठण्याचा धाडसी निर्णय घेतला. यावेळी आयटीबीपी आणि एनडीआरएसच्या जवानांनी या भाविकांची मदत केली. खाली उतरताना हे जवान रुकना नही, उपर देखके भागना है... अशा सूचना देत होते. 

रामबनजवळ रस्ता गेला वाहूनशुक्रवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे  जम्मू ते श्रीनगर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १ वरील  रामबन येथील रस्ता वाहून गेला. त्यामुळे जम्मूवरून अमरनाथकडे येणाऱ्या भाविकांना त्याच ठिकाणी थांबविण्यात आले होते. 

लंगरवर आला ताण, उरला फक्त वरण-भातबालटाल बेस कॅम्प परिसरात दरवर्षी अनेक राज्यांचे जेवणाचे लंगर लागतात. प्रत्येक लंगरमध्ये जेवणाचे ३० ते ३५ पदार्थ, मिठाई, ज्युस, सुकामेवा, फळे भाविकांना दिली जातात. परंतु, गेल्या दोन दिवसांत यात्रा बंद असल्यामुळे बालटाल येथे मुक्कामी थांबलेल्या भाविकांची संख्या अचानक वाढली आहे. त्याचा ताण या ठिकाणी चालणाऱ्या लंगरवर आला आहे. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी भाविकांना डाळ-भात खाऊनच पोट भरावे लागले.

हवामान सुधारण्याची प्रतीक्षाअमरनाथ यात्रा सलग दुसऱ्या दिवशी स्थगित झाल्यामुळे जवळपास ५० हजार भाविक विविध तळांवर अडकले आहेत. बालटाल येथेच जवळपास १९ हजार भाविक अडकले आहेत. हवामान सुधारण्याची भाविकांना प्रतीक्षा आहे. 

आतापर्यंत ९ जणांचा मृत्यूअमरनाथ यात्रेदरम्यान यावर्षी आतापर्यंत ९ भाविकांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी ६ जणांचा मृत्यू गेल्या दाेन दिवसांमध्ये झाला आहे.

टॅग्स :Amarnath Yatraअमरनाथ यात्रा