शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

अमरनाथ यात्रा सलग दुसऱ्या दिवशी स्थगित, ५० हजार भाविक अडकले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2023 10:41 IST

मार्ग पावसामुळे खचला : पूल गेले वाहून, पावसाचा जोर कायम, शुक्रवारी पंचतर्णी आणि शेषनाग या ठिकाणावरून जवळपास आठ हजार भाविक गुफेच्या दिशेने रवाना झाले होते

शिवराज बिचेवार

थेट अमरनाथ यात्रेतून :  पाऊस, बर्फवृष्टी आणि खराब हवामानामुळे अमरनाथ यात्र सलग दुसऱ्या दिवशी स्थगित करण्यात आली. अमरनाथ गुफेकडून बालटालकडे येणारा परतीचा मार्ग पावसामुळे पूर्णपणे खचला आहे. ठिकठिकाणी या मार्गावरील पूलही वाहून गेले आहेत. विविध तळांवर सुमारे ५० हजार भाविक अडकले आहेत. त्यापैकी चार हजारांवर भाविक पंचतर्णी येथे अडकले आहेत. याठिकाणी आयटीबीपीने उभारलेल्या तंबूतही पाणी शिरले आहे, तर वीजपुरवठा बंद असल्याने कुटुंबीयांचा या भाविकांशी संपर्क होत नाही. 

शुक्रवारी पंचतर्णी आणि शेषनाग या ठिकाणावरून जवळपास आठ हजार भाविक गुफेच्या दिशेने रवाना झाले होते. त्यातील जवळपास एक हजार भाविक सुखरूप बालटाल येथे पोहोचले, तर चार ते पाच हजार भाविक हे पंचतर्णी येथेच अडकले आहेत. पावसामुळे यात्रा तीन दिवसांसाठी स्थगित करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आल्याने पंचतर्णी येथे भाविक तंबूत शून्य अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानात कुडकुडत दिवस काढत आहेत.  तंबूमध्ये थांबण्यासाठी एका भाविकाकडून ६५० रुपये घेण्यात येत होते. परंतु, आता बालटालकडे परत येण्यासाठी मार्गच नसल्यामुळे तंबू व्यावसायिकांनी प्रत्येकी एक हजार रुपये उकळले. हजारो भाविक श्रीनगरध्येच थांबले असून, तेथील हॉटेल व्यावसायिकांनीही आपले दर वाढविले आहेत. 

उपर देख के भागना है अमरनाथ दर्शनानंतर भर पावसात भाविक बालटालच्या दिशेने येत असताना दरड कोसळण्यास सुरुवात झाली. त्यामुळे भाविकांना परत गुफेकडे जाणेही शक्य नव्हते. त्यामुळे अनेकांनी अशा परिस्थितीतच बालटाल गाठण्याचा धाडसी निर्णय घेतला. यावेळी आयटीबीपी आणि एनडीआरएसच्या जवानांनी या भाविकांची मदत केली. खाली उतरताना हे जवान रुकना नही, उपर देखके भागना है... अशा सूचना देत होते. 

रामबनजवळ रस्ता गेला वाहूनशुक्रवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे  जम्मू ते श्रीनगर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १ वरील  रामबन येथील रस्ता वाहून गेला. त्यामुळे जम्मूवरून अमरनाथकडे येणाऱ्या भाविकांना त्याच ठिकाणी थांबविण्यात आले होते. 

लंगरवर आला ताण, उरला फक्त वरण-भातबालटाल बेस कॅम्प परिसरात दरवर्षी अनेक राज्यांचे जेवणाचे लंगर लागतात. प्रत्येक लंगरमध्ये जेवणाचे ३० ते ३५ पदार्थ, मिठाई, ज्युस, सुकामेवा, फळे भाविकांना दिली जातात. परंतु, गेल्या दोन दिवसांत यात्रा बंद असल्यामुळे बालटाल येथे मुक्कामी थांबलेल्या भाविकांची संख्या अचानक वाढली आहे. त्याचा ताण या ठिकाणी चालणाऱ्या लंगरवर आला आहे. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी भाविकांना डाळ-भात खाऊनच पोट भरावे लागले.

हवामान सुधारण्याची प्रतीक्षाअमरनाथ यात्रा सलग दुसऱ्या दिवशी स्थगित झाल्यामुळे जवळपास ५० हजार भाविक विविध तळांवर अडकले आहेत. बालटाल येथेच जवळपास १९ हजार भाविक अडकले आहेत. हवामान सुधारण्याची भाविकांना प्रतीक्षा आहे. 

आतापर्यंत ९ जणांचा मृत्यूअमरनाथ यात्रेदरम्यान यावर्षी आतापर्यंत ९ भाविकांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी ६ जणांचा मृत्यू गेल्या दाेन दिवसांमध्ये झाला आहे.

टॅग्स :Amarnath Yatraअमरनाथ यात्रा