शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

अमरनाथ यात्रा संपन्न, 2.60 लाख भाविकांनी घेतले दर्शन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2017 12:13 IST

काश्मीरमध्ये 29 जूनपासून प्रारंभ झालेली अमरनाथ यात्रा सोमवारी ( 7 ऑगस्ट ) संपन्न झाली आहे. राखी पौर्णिमेच्या (श्रावण पौर्णिमा) दिवशी जवळपास 150 भाविकांनी पवित्र गुफाचे दर्शन घेतले. आतापर्यंत 40 दिवसांत जवपास 2 लाख 60 हजार भाविकांनी हिमलिंगाचे दर्शन घेतले आहे.

श्रीनगर, दि. 8 - काश्मीरमध्ये 29 जूनपासून प्रारंभ झालेली अमरनाथ यात्रा सोमवारी ( 7 ऑगस्ट ) संपन्न झाली आहे. राखी पौर्णिमेच्या (श्रावण पौर्णिमा) दिवशी जवळपास 150 भाविकांनी पवित्र गुफाचे दर्शन घेतले. आतापर्यंत 40 दिवसांत जवपास 2 लाख 60 हजार भाविकांनी हिमलिंगाचे दर्शन घेतले आहे. तर 2016 वर्षात 2 लाख 20 हजार भाविक अमरनाथ यात्रेसाठी जम्मू काश्मीरमध्ये दाखल झाले होते.  दरम्यान, या वर्षी अमरनाथ यात्रेदरम्यान 60 भाविकांचा मृत्यू झाला आहे. 

अमरनाथ यात्रा 29 जून रोजी दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम मार्ग आणि गांदरबल जिल्ह्यातील बालटाल मार्गाहून सुरू झाली होती.  बहुतांश भाविकांनी 45 किलोमीटर लांब असलेल्या पारंपरिक पहलगाम चंदनवाडी मार्गाऐवजी 16 किलोमीटर असलेल्या बालटाल मार्गाहून ही यात्रा पूर्ण केली. सुप्रीम कोर्टानं दिलेल्या आदेशानुसार अधिका-यांकडून यात्रेवर नियंत्रण ठेवण्यासाठी संपूर्ण सावधगिरी बाळगण्यात आली. या यात्रेत नोंदणीकृत भाविकांशिवाय अन्य कुणालाही सहभागी होऊ देण्यात आले नाही.

प्रशासनाकडून विशेष काळजीभाविकांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर अनेक पदरी सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली होती. यात्रेकरू आणि वाहनांच्या शोधासाठी सॅटेलाईट ट्रॅकिंग सिस्टीम तैनात करण्यात आली होती. यात्रा मार्गावर ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, जॅमर्स, बुलेटप्रुफ बंकर्स, श्‍वान पथके आदी यंत्रणाही तैनात करण्यात आले होते. यात्रेकरूंच्या जथ्यालाही सीआरपीएफ जवानांच्या तुकडीचे संरक्षण दिले गेले होते.

अमरनाथ यात्रेकरुंवर दहशतवादी हल्लादरम्यान 10 जुलै रोजी दहशतवाद्यांनी अमरनाथ यात्रेला निघालेल्या यात्रेकरूंच्या बसवर अनंतनाग जिल्ह्यात अंदाधुंद गोळीबार केल्याने त्यात 7 भाविक मरण पावले आणि तीन पोलिसांसह ३२ जखमी झाले होते. मृतांमध्ये पाच महिला यात्रेकरूंचा समावेश होता. 

कसा झाला हल्ला ?मिळालेल्या माहितीनुसार 10 जुलै रोजी ज्या बसने हे यात्रेकरू निघाले होते, ती मुख्य यात्रेचा भाग नव्हती आणि अमरनाथ देवस्थान बोर्डाकडे त्या बसची नोंदही नव्हती. त्यामुळे त्या बसला केंद्रीय राखीव पोलीस दलाची सुरक्षा पुरवण्यात आली नव्हती. बस अनंतनाग जिल्ह्यातून जात असताना रात्री 8 वाजून 20 मिनिटांनी दहशतवाद्यांनी तिच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. त्या गोळीबारात सहा जण जागीच तर एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला होता