शहरं
Join us  
Trending Stories
1
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
2
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
3
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
4
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
5
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
6
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
7
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
8
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
9
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
10
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
11
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
12
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
13
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
14
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
15
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
16
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
17
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
18
Lionel Messi: सॉल्ट लेक स्टेडियम तोडफोडप्रकरणी आयोजकाला अटक, प्रेक्षकांनाही तिकिटाचे पैसे परत मिळणार!
19
WhatsApp कॉलवर बोलताय? तुमचं लोकेशन होऊ शकतं ट्रॅक; सुरक्षिततेसाठी ऑन करा 'ही' सेटिंग
20
शोएब मलिकचं तिसरं लग्नही मोडण्याच्या मार्गावर? सना जावेदसोबतच्या नात्यात दुरावा 
Daily Top 2Weekly Top 5

अमरनाथ यात्रा संपन्न, 2.60 लाख भाविकांनी घेतले दर्शन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2017 12:13 IST

काश्मीरमध्ये 29 जूनपासून प्रारंभ झालेली अमरनाथ यात्रा सोमवारी ( 7 ऑगस्ट ) संपन्न झाली आहे. राखी पौर्णिमेच्या (श्रावण पौर्णिमा) दिवशी जवळपास 150 भाविकांनी पवित्र गुफाचे दर्शन घेतले. आतापर्यंत 40 दिवसांत जवपास 2 लाख 60 हजार भाविकांनी हिमलिंगाचे दर्शन घेतले आहे.

श्रीनगर, दि. 8 - काश्मीरमध्ये 29 जूनपासून प्रारंभ झालेली अमरनाथ यात्रा सोमवारी ( 7 ऑगस्ट ) संपन्न झाली आहे. राखी पौर्णिमेच्या (श्रावण पौर्णिमा) दिवशी जवळपास 150 भाविकांनी पवित्र गुफाचे दर्शन घेतले. आतापर्यंत 40 दिवसांत जवपास 2 लाख 60 हजार भाविकांनी हिमलिंगाचे दर्शन घेतले आहे. तर 2016 वर्षात 2 लाख 20 हजार भाविक अमरनाथ यात्रेसाठी जम्मू काश्मीरमध्ये दाखल झाले होते.  दरम्यान, या वर्षी अमरनाथ यात्रेदरम्यान 60 भाविकांचा मृत्यू झाला आहे. 

अमरनाथ यात्रा 29 जून रोजी दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम मार्ग आणि गांदरबल जिल्ह्यातील बालटाल मार्गाहून सुरू झाली होती.  बहुतांश भाविकांनी 45 किलोमीटर लांब असलेल्या पारंपरिक पहलगाम चंदनवाडी मार्गाऐवजी 16 किलोमीटर असलेल्या बालटाल मार्गाहून ही यात्रा पूर्ण केली. सुप्रीम कोर्टानं दिलेल्या आदेशानुसार अधिका-यांकडून यात्रेवर नियंत्रण ठेवण्यासाठी संपूर्ण सावधगिरी बाळगण्यात आली. या यात्रेत नोंदणीकृत भाविकांशिवाय अन्य कुणालाही सहभागी होऊ देण्यात आले नाही.

प्रशासनाकडून विशेष काळजीभाविकांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर अनेक पदरी सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली होती. यात्रेकरू आणि वाहनांच्या शोधासाठी सॅटेलाईट ट्रॅकिंग सिस्टीम तैनात करण्यात आली होती. यात्रा मार्गावर ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, जॅमर्स, बुलेटप्रुफ बंकर्स, श्‍वान पथके आदी यंत्रणाही तैनात करण्यात आले होते. यात्रेकरूंच्या जथ्यालाही सीआरपीएफ जवानांच्या तुकडीचे संरक्षण दिले गेले होते.

अमरनाथ यात्रेकरुंवर दहशतवादी हल्लादरम्यान 10 जुलै रोजी दहशतवाद्यांनी अमरनाथ यात्रेला निघालेल्या यात्रेकरूंच्या बसवर अनंतनाग जिल्ह्यात अंदाधुंद गोळीबार केल्याने त्यात 7 भाविक मरण पावले आणि तीन पोलिसांसह ३२ जखमी झाले होते. मृतांमध्ये पाच महिला यात्रेकरूंचा समावेश होता. 

कसा झाला हल्ला ?मिळालेल्या माहितीनुसार 10 जुलै रोजी ज्या बसने हे यात्रेकरू निघाले होते, ती मुख्य यात्रेचा भाग नव्हती आणि अमरनाथ देवस्थान बोर्डाकडे त्या बसची नोंदही नव्हती. त्यामुळे त्या बसला केंद्रीय राखीव पोलीस दलाची सुरक्षा पुरवण्यात आली नव्हती. बस अनंतनाग जिल्ह्यातून जात असताना रात्री 8 वाजून 20 मिनिटांनी दहशतवाद्यांनी तिच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. त्या गोळीबारात सहा जण जागीच तर एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला होता