शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
4
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
6
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
7
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
8
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
9
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
10
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
11
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
12
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
13
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
14
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
15
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
16
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
17
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
18
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
19
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!

7 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अंजूचं लोकेशन सापडलं; प्रियकरासाठी गाठलेलं पाकिस्तान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 14:26 IST

अंजूचे शेवटचे लोकेशन 30 नोव्हेंबर रोजी दिल्ली होतं.

पतीशी खोटं बोलून चार महिन्यांपूर्वी पाकिस्तानात गेलेली राजस्थानमधील अंजू 29 नोव्हेंबरला पुन्हा भारतात परतली. विवाहित असूनही तिने तिथला प्रियकर नसरुल्लाहसोबत निकाह केला आणि आपलं नाव बदलून फातिमा ठेवलं. ती वाघा बॉर्डरवर परतल्यावर सुरक्षा यंत्रणांनी तिची सखोल चौकशी केली. यानंतर ती कुठे गेली हे कोणालाच माहीत नाही. अंजूचे शेवटचे लोकेशन 30 नोव्हेंबर रोजी दिल्ली होतं. मात्र 7 दिवसांनी अंजू भिवडी, अलवर येथे असल्याचं उघड झालं.

बुधवारी पोलिसांनी अंजूची चौकशी केली. तिचे जबाब नोंदवण्यात आले. अंजूचा पती अरविंद याने भिवडी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. याशिवाय अरविंदने अंजूचा पाकिस्तानी पती नसरुल्लाह याच्याविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे. 30 नोव्हेंबरपासून अंजू कुठे होती हे कोणालाच माहीत नाही. मात्र आता तो भिवडीमध्ये असून त्याने पोलिसांकडे जबाबही नोंदवला आहे.

अंजूने पंजाबमधील गुप्तचर यंत्रणांना सांगितले होते की, ती केवळ अरविंदपासून घटस्फोट घेण्यासाठी भारतात आली आहे. याशिवाय ती मुलांनाही मिस करत होती. मात्र, अंजूचा पती अरविंद, वडील गयाप्रसाद थॉमस किंवा मुलं तिच्याशी बोलू इच्छित नाहीत. कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, आता त्यांचा अंजूशी काहीही संबंध नाही.

अरविंद म्हणाला की अंजू तिच्या इच्छेनुसार कुठे जाते याने तिला काही फरक पडत नाही. त्याचवेळी ग्वाल्हेरमध्ये राहणार्‍या अंजूच्या वडिलांनीही सांगितले की, त्यांची मुलगी पाकिस्तानला गेली होती तेव्हाच त्यांच्यासाठी मेली होती. अंजूला भेटायचं नाही असंही मुलं सांगतात.

21 जुलै रोजी गेली पाकिस्तानात 

अंजू 21 जुलै रोजी पाकिस्तानला गेली होती. तिने पती अरविंदला सांगितले होते की, ती फिरण्यासाठी जयपूरला जात आहे. पण त्यानंतर अंजू पाकिस्तानात पोहोचल्याचं समोर आले. हा प्रकार अरविंदला कळताच त्याने अंजूला फोन केला. खोटे बोलण्याचे कारण विचारले. आधी अंजू सांगत राहिली की ती इथे फक्त भेटायला आली आहे आणि दोन चार दिवसात परत येईल. पण असं झालं नाही. प्रसारमाध्यमांद्वारे हे प्रकरण भारतभर पसरले. यानंतर अंजूने नसरुल्लाहसोबत निकाह केल्याचं समोर आलं. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान