शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
3
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
4
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
5
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
6
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
7
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
8
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
9
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
10
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
11
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
12
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
13
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
14
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
15
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
16
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
17
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
18
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
19
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
20
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     

कमाई दिली, पत्नीच्या नावाने जमीन घेतली; नवऱ्याने अपघातात पाय गमावताच 'ती' सोडून गेली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 16:18 IST

अपघातात व्यक्तीचे दोन्ही पाय निकामी झाले. जेव्हा तो अपंग झाला तेव्हा त्याच्या पत्नी आणि मुलांनी त्याला आपल्यासोबत ठेवण्यास नकार दिला. 

राजस्थानमधील भरतपूरमध्ये ट्रक चालकाच्या पत्नीने त्याला चालता येत नसल्याने सोडून दिलं आहे. अपघातात ट्रक चालकाचे दोन्ही पाय कापले गेले, त्यामुळे त्याला चालता येत नाही. हे प्रकरण डीगजवळील पाडला गावाशी संबंधित आहे. अपघातात व्यक्तीचे दोन्ही पाय निकामी झाले. जेव्हा तो अपंग झाला तेव्हा त्याच्या पत्नी आणि मुलांनी त्याला आपल्यासोबत ठेवण्यास नकार दिला. 

मिळालेल्या माहितीनुसार, भरतपूर जिल्ह्यातील डीगजवळील पाडला गावात राहणारा उन्नस काही वर्षांपूर्वी ट्रकचालक होता. तो देशातील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माल घेऊन जात असे. तो जे काही कमावायचा ते सर्व पत्नीला द्यायचा. जमीन विकत घेताना त्याने पत्नीच्या नावावर ती खरेदी केली होती. पण 4 वर्षांपूर्वी एक अपघात झाला, ज्यात उन्नसचे दोन्ही पाय कापले गेले. उपचार काही वर्षे चालले 

अशा परिस्थितीत पत्नीनेही उन्नसला सोबत ठेवण्यास नकार दिला. उन्नस आता सर्वत्र न्याय मागत आहे. कधी-कधी तो पोलीस अधिकाऱ्यांकडे जातो आणि आपली व्यथा मांडतो. रडत रडत त्याने आपली व्यथा मीडियाला सांगितली. त्याने सांगितले की, 25 वर्षांपूर्वी त्याने कोटाकला गावात जाहिदाशी लग्न केलं होतं. तिला आधीच एक मुलगी होती. 

2017 मध्ये त्याचे पाय कापण्यात आले. पाय कापल्यानंतर पत्नीने सोबत राहण्यास नकार दिला. त्याला धक्के मारून घराबाहेर काढण्यात आलं. 10 दिवसांपूर्वी याप्रकरणी नौगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचे उन्नसने सांगितले. मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. आता मुलंही साथ देत नाहीत. अपघातानंतर 14 लाख रुपये क्लेम म्हणून मिळाले होते. पत्नीने ते पैसेही हडप केले. जमीन भावाच्या मदतीने विकली. अशा परिस्थितीत उन्नस पोलीस प्रशासनाकडे न्याय मागत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.