शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

कमाई दिली, पत्नीच्या नावाने जमीन घेतली; नवऱ्याने अपघातात पाय गमावताच 'ती' सोडून गेली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 16:18 IST

अपघातात व्यक्तीचे दोन्ही पाय निकामी झाले. जेव्हा तो अपंग झाला तेव्हा त्याच्या पत्नी आणि मुलांनी त्याला आपल्यासोबत ठेवण्यास नकार दिला. 

राजस्थानमधील भरतपूरमध्ये ट्रक चालकाच्या पत्नीने त्याला चालता येत नसल्याने सोडून दिलं आहे. अपघातात ट्रक चालकाचे दोन्ही पाय कापले गेले, त्यामुळे त्याला चालता येत नाही. हे प्रकरण डीगजवळील पाडला गावाशी संबंधित आहे. अपघातात व्यक्तीचे दोन्ही पाय निकामी झाले. जेव्हा तो अपंग झाला तेव्हा त्याच्या पत्नी आणि मुलांनी त्याला आपल्यासोबत ठेवण्यास नकार दिला. 

मिळालेल्या माहितीनुसार, भरतपूर जिल्ह्यातील डीगजवळील पाडला गावात राहणारा उन्नस काही वर्षांपूर्वी ट्रकचालक होता. तो देशातील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माल घेऊन जात असे. तो जे काही कमावायचा ते सर्व पत्नीला द्यायचा. जमीन विकत घेताना त्याने पत्नीच्या नावावर ती खरेदी केली होती. पण 4 वर्षांपूर्वी एक अपघात झाला, ज्यात उन्नसचे दोन्ही पाय कापले गेले. उपचार काही वर्षे चालले 

अशा परिस्थितीत पत्नीनेही उन्नसला सोबत ठेवण्यास नकार दिला. उन्नस आता सर्वत्र न्याय मागत आहे. कधी-कधी तो पोलीस अधिकाऱ्यांकडे जातो आणि आपली व्यथा मांडतो. रडत रडत त्याने आपली व्यथा मीडियाला सांगितली. त्याने सांगितले की, 25 वर्षांपूर्वी त्याने कोटाकला गावात जाहिदाशी लग्न केलं होतं. तिला आधीच एक मुलगी होती. 

2017 मध्ये त्याचे पाय कापण्यात आले. पाय कापल्यानंतर पत्नीने सोबत राहण्यास नकार दिला. त्याला धक्के मारून घराबाहेर काढण्यात आलं. 10 दिवसांपूर्वी याप्रकरणी नौगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचे उन्नसने सांगितले. मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. आता मुलंही साथ देत नाहीत. अपघातानंतर 14 लाख रुपये क्लेम म्हणून मिळाले होते. पत्नीने ते पैसेही हडप केले. जमीन भावाच्या मदतीने विकली. अशा परिस्थितीत उन्नस पोलीस प्रशासनाकडे न्याय मागत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.