शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

रुग्णसंख्या वाढली, तरी स्थिती नियंत्रणात; तबलिगींच्या संपर्कातून ६४७ जणांना बाधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2020 06:36 IST

दाट वस्त्यांतून मात्र कोरोनाचा मोठा उद्रेक नाही

- हरीश गुप्ता नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या (कोविड-१९) रुग्णांची वाढत चाललेली संख्या व फैलावाला मोठे निमित्त ठरलेले तबलिगी जमातचे संमेलन, असे असतानाही स्थिती अत्यंत वाईट वळण घेणार नाही, अशी केंद्राची अपेक्षा आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार मंत्र्यांच्या गटाची महत्त्वाची बैठक शुक्रवारी सायंकाळी याच विषयावर झाली. या मंत्रीगटात गृहमंत्री अमित शहा व इतर ११ मंत्र्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, दिल्ली, केरळ आणि इतर कोणत्याही राज्यातील अतिशय घनदाट वसाहतींत कोविड-१९ चा मोठ्या प्रमाणावर उद्रेक न झाल्याबद्दल मंत्रीगटाने समाधान व्यक्त केले.

तबलिगी जमातच्या सर्व नऊ हजार अनुयायांना शोधून त्यांना अलग केले आहे. त्यांच्या संसर्गातून ६४७ जणांना बाधा झाली आहे. यांचा कोणाकोणाशी संपर्क आला (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग) ते शोधण्याचे कामही जवळपास पूर्ण झाले आहे. याशिवाय मुंबई व देशात इतरत्र असलेल्या मोठ्या झोपडपट्ट्यांच्या ठिकाणांसह २२ हॉट स्पॉट्स आहेत. तरीही कोविड-१९ चा फार मोठ्या प्रमाणावर फैलाव झाल्याचे अहवाल नाहीत.

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४९० वर

राज्यात शुक्रवारी ६७ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यातील ४३ रुग्ण मुंबईतील असून १० रुग्ण मुंबई परिसरातील आहेत. बळींची एकूण संख्या २६ वर गेली आहे. बाधित रुग्णांमध्ये पुणे येथील ९ तर अहमदनगर जिल्ह्यातील ३ रुग्णांचा समावेश आहे.याशिवाय वाशिम आणि रत्नागिरी येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झालेली आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४९० झाली आहे. राज्यात शुक्रवारी एकूण ५९५ जण विविध रुग्णालयांत भरती झाले आहेत.

आजपर्यंत पाठविलेल्या १२,८५८ नमुन्यांपैकी ११,९६८ जणांचे नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ५० बाधितांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ३८,३९८ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ३०७२ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

११ हजार ९२ कोटींचा राज्यांना केंद्राकडून निधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांना आपत्कालीन स्थिती निवारणासाठी ११ हजार ९२ कोटी निधीचा पहिला हफ्ता दिला आहे.सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने पंतप्रधानांनी नुकतीच चर्चा केली होती. या वेळी पंतप्रधानांनी सर्व राज्यांना हा निधी देण्याचे मान्य केले होते. या निधीचा वापर राज्यांमध्ये क्वारंटाइन सुविधांची उभारणी, रुग्णांची चाचणी, तपासणीसाठी जादा प्रयोगशाळांची उभारणी, आरोग्यसेवकांची उपकरणांची खरेदी, थर्मल स्कॅनर्सची खरेदी, व्हेंटिलेटर्स आदी महत्त्वाच्या कामांसाठी केला जाणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत