शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कम्युनिस्टांच्या स्वभावामध्येच हिंसेचे राजकारण, भाजपाचे अध्यक्ष अमित शहांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 00:39 IST

‘हिंसेचे राजकारण’ कम्युनिस्टांच्या स्वभावातच आहे, असा आरोप भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी केला.

नवी दिल्ली : ‘हिंसेचे राजकारण’ कम्युनिस्टांच्या स्वभावातच आहे, असा आरोप भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी केला. केरळमध्ये होत असलेल्या राजकीय हत्यांच्या प्रश्नावर शहा यांनी माकपच्या येथील कार्यालयावर मोर्चा नेला होता. त्या वेळी ते बोलत होते.केरळमध्ये डाव्या पक्षांच्या अत्याचारांच्या विरोधात शाह यांनी ‘जनरक्षा यात्रा’ मोहीम हाती घेतली आहे. शाह म्हणाले की, केरळमध्ये भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांना डाव्या पक्षाचे कार्यकर्ते ठार मारत आहेत व दहशत निर्माण करीत आहेत. शहा यांनी कॅनॉट प्लेसमधून गोल मार्केट भागातील माकपच्या मुख्यालयावर मोर्चा नेला. या वेळी दिल्ली भाजपाचे अध्यक्ष मनोज तिवारी, केंद्रीय मंत्री अल्फोन्स कन्नानथानाम आणि भाजपाचे दिल्लीतील खासदार उपस्थित होते. शहा म्हणाले, कितीही दहशत निर्माण केली, तरी डाव्यांची सत्ता असलेल्या केरळमध्ये कमळ फुलायचे कोणीही थांबवू शकत नाही. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या स्वत:च्या जिल्ह्यात भाजपा आणि संघाच्या जास्तीतजास्त कार्यकर्त्यांच्या अत्यंत क्रूररीत्या हत्या झाल्या आहेत, असा आरोप शहा यांनी केला. हत्यांचा संपूर्ण दोष विजयन यांचाच असल्याचे ते म्हणाले. हिंसेचे राजकारण हा कम्युनिस्टांचा स्वभाव आहे. केरळ, पश्चिम बंगाल, त्रिपुरा राज्यात प्रदीर्घ काळापासून कम्युनिस्ट सत्तेवर असून, जास्तीतजास्त राजकीय हिंसाचार हा या राज्यांत झाला आहे, हा काही योगायोग नाही. हे लोक जेथे कुठे सत्तेवर असतात, तेथील राजकीय संस्कृती हिंसाचारात रूपांतरित होते, असे ते म्हणाले. जनरक्षा यात्रा शहा यांनी केरळमधील कन्नूर जिल्ह्यात ३ आॅक्टोबर रोजी सुरू केली. तिची सांगता १७ आॅक्टोबर रोजी थिरुवनंतपूरममध्ये होईल.माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी लगेचच घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपाची ही यात्रा ‘फ्लॉप शो’ असल्याचा दावा केला.

टॅग्स :Amit Shahअमित शाह