शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह; प्रेझेंटेशनवरून शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 13:50 IST

या देशात संपूर्ण निवडणूक प्रणालीची चोरी करण्यात येत आहे असा गंभीर आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला.

नवी दिल्ली - काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणुकीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मतचोरीचा मोठा आरोप केला. भाजपा आणि निवडणूक आयोगाने हातमिळवणी करत मतांची चोरी केली असं त्यांनी म्हटलं. राहुल गांधी यांनी प्रेझेंटेशन घेऊन याबाबतचे पुरावे लोकांसमोर मांडले. या पत्रकार परिषदेनंतर इंडिया आघाडीच्या बैठकीतही राहुल गांधी यांनी यावर पुराव्यासह प्रेझेंटेशन दिले. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी राहुल गांधींना सल्ला दिला आहे.

राहुल गांधी यांनी जे प्रेझेंटेशन सादर केले, ते देशभरात प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्यात दाखवले पाहिजे असा सल्ला शरद पवारांनी दिला. याबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राहुल गांधी यांनी सविस्तरपणे आम्हाला प्रेझेंटेशन दाखवले. त्यावर खूप चांगली चर्चा बैठकीत झाली. शरद पवारांनी प्रत्येक राज्यात हे प्रेझेंटेशन द्यायला हवे. जिल्ह्यात, तालुक्यात हे व्हावे असा सल्ला दिला. देशात जे कुणी सशक्त लोकशाहीवर विश्वास ठेवतात त्यांनाही हे प्रेझेंटेशन द्यावे. जे खरे आणि खोटे ते लोकांसमोर येईल. निवडणूक आयोग जर स्वायत्त संस्था असेल तर त्यांनी यावर उत्तर द्यायला हवे. ही सर्व माहिती आयोगाच्या वेबसाईटवरून घेतली आहे असं त्यांनी म्हटलं. 

काय म्हणाले राहुल गांधी?

देशाच्या कर्नाटक राज्यातील एकाच विधानसभा मतदारसंघामध्ये एक लाख खोटे मतदार आहेत हे आम्ही आता जनतेसमोर सबळ पुराव्यानिशी मांडले आहे. तरीही निवडणूक आयोग म्हणतो की स्वच्छ व पारदर्शक पद्धतीने निवडणुका घेतल्या जात आहेत. या देशात संपूर्ण निवडणूक प्रणालीची चोरी करण्यात येत आहे असा गंभीर आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी केला. पत्रकार परिषदेत त्यांनी ढीगभर पुरावे स्क्रीनवर दाखविले. मतांची चोरी करण्याचे प्रकार काही राज्यांतच नव्हे तर संपूर्ण देशभरात होत आहेत. निवडणूक प्रणालीशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज व मतदार याद्या या सदर गैरप्रकारांचा सबळ पुरावा असून तो नष्ट करण्याचा निवडणूक आयोग प्रयत्न करत आहे. सत्ताधारी भाजप व निवडणूक आयोग दोघे मिळून ही फसवणूक करत आहेत. याप्रकरणात न्याययंत्रणेचा हस्तक्षेप आवश्यक आहे असं त्यांनी सांगितले. 

निवडणूक आयोगाने दिले २ पर्याय

दरम्यान, देशभरात निवडणूक प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली असून हा लोकशाहीवर हल्ला आहे. भाजप व निवडणूक आयोग बनावट मतदार तयार करत आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांवर निवडणूक आयोगानेही आता प्रत्युत्तर दिलं आहे. प्रतिज्ञापत्रावर सही करा किंवा देशाची माफी मागा असे दोन पर्याय निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना दिले आहेत. एक शपथपत्र पाठवून ते जे काही बोलत आहेत ते बरोबर आहे हे सिद्ध करण्यासाठी त्यावर स्वाक्षरी करण्यास सांगितले होते. जर ते चुकीचे आढळले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असंही निवडणूक आयोगाने म्हटलं. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसSupriya Suleसुप्रिया सुळेElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग