शहरं
Join us  
Trending Stories
1
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
8
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
9
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
10
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
11
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
12
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
13
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
15
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
16
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
17
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
18
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
19
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
20
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता

पहाटेच्या अजानमुळे कुलगुरूंची होते झोपमोड, थेट जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून केली 'ही' मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 12:29 IST

Vice Chancellor Prof Sangeeta Srivastava : कुलगुरू प्रा. संगीता श्रीवास्तव यांनी अजानमुळे झोपेत अडथळा निर्माण होतो अशी तक्रार केली आहे.

नवी दिल्ली - अलाहाबाद केंद्रीय विद्यापीठाच्या  (Allahabad Central University) कुलगुरू प्रा. संगीता श्रीवास्तव (Vice Chancellor Prof Sangeeta Srivastava) यांनी अजानमुळे झोपेत अडथळा निर्माण होतो अशी तक्रार केली आहे. त्यांनी याबाबत थेट जिल्हाधिकारी भानू चंद्र गोस्वामी यांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये श्रीवास्तव यांनी नियमानुसार कारवाई करण्याची मागणी केली आहे. गायक सोनू निगम (Singer Sonu Nigam) यांनी देखील काही वर्षांपूर्वी मशिदीमध्ये पहाटे होणाऱ्या अजानमुळे झोप मोड होते अशी तक्रार केली होती. यानंतर वाद निर्माण झाला होता. 

कुलगुरू प्रा. संगीता श्रीवास्तव यांनी या पत्रामध्ये "रोज सकाळी साधारण साडे पाच वाजता अजान होते. लाऊड स्पीकरवरुन होणाऱ्या अजानमुळे झोपमोड होते. त्यानंतर अनेक प्रयत्न करुनही झोप येत नाही. त्यामुळे दिवसभर डोकेदुखीचा त्रास होतो. याचा परिणाम रोजच्या कामकाजावरही होत आहे" असं म्हटलं आहे. तसेच "जिथं माझे नाक सुरु होते, तिथं तुमचे स्वातंत्र्य संपते" ही जुनी म्हण देखील सांगण्यात आली आहे. आपण कोणताही संप्रदाय किंवा जातीच्या विरोधात नाही. तुम्ही अजान लाऊड स्पीकरशिवाय देखील करू शकता. त्यामुळे दुसऱ्यांची दिनचर्या प्रभावित होणार नाही" असंही म्हटलं आहे.

"आगामी ईदपूर्वी सहरीची घोषणा पहाटे 4 पूर्वी होईल. त्यामुळे त्यांच्या आणि इतरांच्या त्रासामध्ये भर पडेल. भारतीय राज्यघटनेत सर्व पंथनिरपेक्ष आणि शांततापूर्ण सौहार्दाची संकल्पना मांडण्यात आली आहे" याचा उल्लेख देखील या पत्रात करण्यात आला आहे. त्याचबरोबर अलाहाबाद हायकोर्टाच्या जुन्या आदेशाचा दाखलाही यामध्ये श्रीवास्तव यांनी दिला आहे. श्रीवास्तव यांनी या पत्राची प्रत कमिशनर, आयजी आणि डीआयजी यांनाही पाठवली आहे. 

श्रीवास्तव यांच्याकडून काही दिवसांपूर्वी पत्र मिळाल्याची माहिती डीआयजी सर्वश्रेष्ठ त्रिपाठी यांनी दिला आहे. तसेच त्यांनी या विषयावर अधिकाऱ्यांना चौकशी करुन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर जिल्हाधिकारी भानू चंद्र गोस्वामी यांनी देखील या विषयावर नियमानुसार कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. कुलगुरूंनी लिहिलेल्या पत्रामुळे नवा वाद निर्माण होऊ शकतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :MosqueमशिदIndiaभारत