शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
4
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
5
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
6
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
7
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
8
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
9
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
10
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
11
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
12
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
13
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
14
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
15
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
16
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
17
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
18
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
19
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
20
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  

परिस्थिती हाता बाहेर, हात जोडून सांगत आहोत, लॉकडाउन लावा...; योगी सरकारला HC नं फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 18:02 IST

उत्तर प्रदेशात गेल्या 24 तासांत 29 हजार 824 नवे कोरोना बाधित सापडले आहेत. ऑक्सिजनचा तुटवडा, बेडची कमतरता आणि आवश्यक औषधींचा आभाव, यांमुळे गेल्या काही दिवसांत अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. (Uttar pradesh)

लखनौ - उत्तर प्रदेशातील कोरोना परिस्थितीवरून अलाहाबाद उच्च न्यायालयाने (Allahabad high court) योगी आदित्यनाथ (yogi adityanath) सरकारला फटकारले आहे. यावेळी, यूपी पंचायत निवडणुकीत कोरोना गाइडलाइनचे पालन का गेले गेले नाही? असा सवालही न्यायालयाने केला आहे. याच बरोबर, न्यायालयाने योगी सरकारला 'हात जोडून', राज्यातील मोठ्या शहरांत 14 दिवसांचा संपूर्ण लॉकडाउन लावण्यात यावा, असा सल्लाही पुन्हा एकदा दिला आहे. यापूर्वीही उच्च न्यायालयाने राज्यातील पाच मोठ्या शहरांत संपूर्ण लॉकडाउन लावण्याचा आदेश दिला होता. मात्र, तो मानण्यास सरकारने नकार दिला होता. (UP Allahabad high court judge said with folded hands to yogi adityanath government to impose lockdown)

CoronaVirus: कोरोनाचे 617 व्हेरिएंट्स आपलं काहीच बिघडवू शकणार नाही; तज्ज्ञ सांगतात, ...म्हणून लशीसाठी रजिस्ट्रेशन आवश्यक

24 तासांत 29 हजार 824 नवे कोरोना बाधित -उत्तर प्रदेशात गेल्या 24 तासांत 29 हजार 824 नवे कोरोना बाधित सापडले आहेत. ऑक्सिजनचा तुटवडा, बेडची कमतरता आणि आवश्यक औषधींचा आभाव, यांमुळे गेल्या काही दिवसांत अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. हे लक्षात घेत अलाहाबाद उच्च न्यायालयाने बुधवारी राज्यातील योगी सरकारला जबरदस्त फटकारले. राज्यातील स्थिती नियंत्रणा बाहेर गेल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. डॉक्टर्सची कमतरता आहे. ऑक्सिजन नाही, एल-1, एल-2 हॉस्पिटल नाहीत. कागदांवर सर्वकाही छान आहे. मात्र, प्रत्यक्षात सुविधांचा आभाव आहे. हे कुणापासूनही लपून नाही.

कोरोनाशी संबंधित प्रकरणांवर सुनावणी करताना जस्टिस सिद्धार्थ वर्मा पुढे म्हणाले, आम्ही आपल्याला (योगी सरकारला) हात जोडून, आपल्या विवेकाचा वापर करण्याची विनंती करतो. न्याधिशांनी म्हटले आहे, की राज्यातील स्थिती नियंत्रणात नसेल, तर दोन आठवड्यांचा लॉकडाउन लावण्यात उशीर करू नका. याआधीही न्यायालयाने राज्य सरकारला लॉकडाउन लावण्याचा सल्ला दिला होता.

CoronaVirus: भाजप तयार करतेय जम्बो आयसोलेशन सेंटर, मिळणार मोफत उपचार; दाखवलं जाणार रामायण अन् बरंच काही

135 शिक्षकांच्या मृत्यूला जबाबदार कोण ? -कोरोनाच्या बिकट परिस्थितीत उत्तर प्रदेशमध्ये पंचायत निवडणुका घेण्यात आल्या. यामध्ये ड्युटीवर असणाऱ्या 135 शिक्षकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली. यावरून उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला फटकारत, या शिक्षकांच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे? निवडणूक घेताना कोरोना नियमांचे पालन का केले नाही? निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई का केली जाऊ नये? अशा प्रश्नांची तोफ डागली आहे. या निवडणुकीत हजारो शिक्षक, शिक्षक मित्र आणि अनुदेशकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. 

जनतेच्या आरोग्याच्या अडचणी सोडवणे सरकारचे काम आहे. ते केले नाही, तर पुढील पिढी माफ करणार नाही. कोरोना संसर्ग काही प्रमाणात कमी झाल्यावर सरकार निवडणूक कामांमध्ये व्यस्त झाले. तेव्हाच उपाययोजना वाढवणे गरजेचे होते, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने योगी सरकारची कानउघडणी केली आहे.

CoronaVirus : आता 'या' राज्यात कोरोना रुग्णांना मोफत मिळणार रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन, सरकारचा मोठा निर्णय

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHigh Courtउच्च न्यायालयyogi adityanathयोगी आदित्यनाथCourtन्यायालय