शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

रामाचे काम सर्वांनी मिळून करायचे आहे- सरसंघचालक मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 04:27 IST

रामाचे काम करायचे आहे आणि सर्वांना मिळूनच करायचे आहे.

उदयपूर : रामाचे काम करायचे आहे आणि सर्वांना मिळूनच करायचे आहे. कारण सर्वांमध्ये राम आहे. सर्व जण आत्माराम आहेत. रामाचे काम होईलच, अशा सूचक शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अयोध्येतील राम मंदिराविषयी वक्तव्य केले. त्यांचे हे वक्तव्य म्हणजे सरकार स्थापन होण्याआधी दिलेली ‘जय श्रीराम’ची घोषणा असल्याचे मानले जाते.प्रताप गौरव केंद्र येथे ९ मंदिरांच्या भक्तिधाम लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. याच कार्यक्रमात संत मोरारी बापू म्हणाले की, रामाचे नाव घेऊन खूप झाले. आता रामाची सेवा करायची आहे. राम या देशाची संस्कृती आहे. रामाचे काम म्हणजे राष्ट्राचे काम आहे. लोकांनी रामाचे नाव घ्यावे आणि रामाचे काम करण्याचा संकल्पसुद्धा करावा. लोकसभा निवडणुकांमधील भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर भागवत यांच्या उपस्थितीत पहिला धार्मिक कार्यक्रम झाला. मोरारी बापू यांच्या सूचक वक्तव्यानंतर भागवत म्हणाले की, पूजा झाली आहे. आता सेवा शिल्लक आहे. जोशपूर्ण असे एक काम झाले. आता खरे काम सुरू होईल.सरसंघचालक म्हणाले की, लोक जागरूक, शांततापूर्ण, कृतिशील आणि कणखर असतील तर देशाचे भवितव्य उज्ज्वल राहते, असे इतिहासाने आपल्याला सांगितले आहे. आता आपण सर्वांनी जागरूक राहिले पाहिजे. रामाचे काम करायचे आहे. आपले काम आपण स्वत: केले तर योग्य असते. मात्र दुसऱ्याला ते सोपविले, तर देखरेख करावी लागते. हे काम म्हणजे कोणत्या पक्षाचे धोरण असू शकत नाही. ज्या गोष्टीची आपण दीर्घकाळ प्रतीक्षा करत आहोत, त्यासाठी आपण काम केले पाहिजे. आपले उद्दिष्ट गाठण्यासाठी काम करणाºया संस्थेच्या भलेपणासाठी आपण काम करण्याची गरज आहे.न्यायालयात विषय प्रलंबितराम मंदिराचे बांधकाम हे भाजपचे दीर्घकालीन आश्वासन राहिले आहे. पक्षाच्या २०१४ व २०१९ च्या जाहीरनाम्यातही त्याचा उल्लेख आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील ‘एनडीए’ सरकारने कोर्टाच्या निर्णयानुसार हा विषय हाताळण्याचे ठरविले आहे. सुप्रीम कोर्टात हा विषय प्रलंबित आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवत