शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Kerala Flood: हृदयद्रावक! केरळ महापुरात एकाच कुटुंबातील ६ जण गेले वाहून; काही क्षणांत तीन पिढ्यांचा अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 13:24 IST

Kerala Flood: केरळमधील कोट्टायम जिल्ह्यातील कवली गावातील रहिवासी असलेल्या एका संपूर्ण कुटुंबाचा महापूर आणि भूस्खलनात करुण अंत झाला.

कोट्टायम: गेल्या काही दिवसापासून अतिवृष्टीमुळे केरळमधील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. काही ठिकाणी महापूर आला आहे. कोट्टायम आणि इडुक्की जिल्ह्यांच्या डोंगराळ भागात झालेल्या भूस्खलनानंतर अनेक जण बेपत्ता झाली असून, काही जणांचा मृत्यू झाला आहे. पूर परिस्थितीमुळे सखल भागात राहणाऱ्या हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. यातच आता याच कोट्टायम जिल्ह्यातील एका कुटुंबातील सर्व सहा सदस्यांनी आपला जीव गमावला. महापूर आणि भूस्खलनामध्ये या सहा जणांनी आपले प्राण गमावले असून, यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

केरळमधील कोट्टायम जिल्ह्यातील कवली गावातील रहिवासी असलेल्या एका संपूर्ण कुटुंबाचा महापूर आणि भूस्खलनात करुण अंत झाला. सोमवारी सायंकाळी कवली सेंट मेरी चर्चमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बिशप मार जोसेफ कलरंगट्ट यांनी लोकांच्या आणि केरळ मंत्रिमंडळातील मंत्री आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.

हे ठिकाण भूस्खलनामुळे खूप प्रभावित

कुटुंबप्रमुख मार्टिन, त्यांची पत्नी सिनी, त्यांच्या मुली स्नेहा, सोना आणि सँड्रा आणि त्यांची आजी क्लारम्मा त्यांच्या जिल्ह्यात झालेल्या पूर आणि भूस्खलनामध्ये मृत्यू पावल्या. त्यांचे कुटुंब कावली येथील एका चर्चजवळ राहत होते. हे ठिकाण भूस्खलनामुळे खूप प्रभावित झाले असून, कुट्टिकल, कोट्टायममधील ठिकाणांपैकी एक होते. मार्टिन कुटुंबाव्यतिरिक्त, त्यांच्या शेजाऱ्यांची घरेही रहिवाशांसह वाहून गेल्याचे सांगितले जात आहे. भूस्खलनामुळे, शहराचा बराचशा भागाचा संपर्क तुटला आहे.

दरम्यान, केरळमध्ये निसर्गान थैमान घातले आहे. इथे मुसळधार पावसानंतर पुन्हा एकदा भूस्खलनाच्या घटना सुरु झाल्या आहेत. केरळमध्ये शनिवारपासून मुसळधार पावसामुळे आलेल्या पूर आणि भूस्खलनामुळे किमान २४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिस्थितीला सामोरे मदत देऊ केली आहे. दुसरीकडे केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी पावसामुळे राज्यातील बिघडलेली परिस्थिती पाहता तातडीची बैठक बोलावली. लष्कर, नौदल आणि हवाई दलाची मदत घेतली जात आहे. जिल्ह्यांमध्ये मदत शिबिरे सुरू करण्यात आली आहेत. राज्य सरकार सर्व धरणांच्या पाण्याच्या पातळीवर लक्ष ठेवत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.  

टॅग्स :KeralaकेरळKerala Floodsकेरळ पूर