शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

Kerala Flood: हृदयद्रावक! केरळ महापुरात एकाच कुटुंबातील ६ जण गेले वाहून; काही क्षणांत तीन पिढ्यांचा अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 13:24 IST

Kerala Flood: केरळमधील कोट्टायम जिल्ह्यातील कवली गावातील रहिवासी असलेल्या एका संपूर्ण कुटुंबाचा महापूर आणि भूस्खलनात करुण अंत झाला.

कोट्टायम: गेल्या काही दिवसापासून अतिवृष्टीमुळे केरळमधील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. काही ठिकाणी महापूर आला आहे. कोट्टायम आणि इडुक्की जिल्ह्यांच्या डोंगराळ भागात झालेल्या भूस्खलनानंतर अनेक जण बेपत्ता झाली असून, काही जणांचा मृत्यू झाला आहे. पूर परिस्थितीमुळे सखल भागात राहणाऱ्या हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. यातच आता याच कोट्टायम जिल्ह्यातील एका कुटुंबातील सर्व सहा सदस्यांनी आपला जीव गमावला. महापूर आणि भूस्खलनामध्ये या सहा जणांनी आपले प्राण गमावले असून, यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

केरळमधील कोट्टायम जिल्ह्यातील कवली गावातील रहिवासी असलेल्या एका संपूर्ण कुटुंबाचा महापूर आणि भूस्खलनात करुण अंत झाला. सोमवारी सायंकाळी कवली सेंट मेरी चर्चमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बिशप मार जोसेफ कलरंगट्ट यांनी लोकांच्या आणि केरळ मंत्रिमंडळातील मंत्री आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.

हे ठिकाण भूस्खलनामुळे खूप प्रभावित

कुटुंबप्रमुख मार्टिन, त्यांची पत्नी सिनी, त्यांच्या मुली स्नेहा, सोना आणि सँड्रा आणि त्यांची आजी क्लारम्मा त्यांच्या जिल्ह्यात झालेल्या पूर आणि भूस्खलनामध्ये मृत्यू पावल्या. त्यांचे कुटुंब कावली येथील एका चर्चजवळ राहत होते. हे ठिकाण भूस्खलनामुळे खूप प्रभावित झाले असून, कुट्टिकल, कोट्टायममधील ठिकाणांपैकी एक होते. मार्टिन कुटुंबाव्यतिरिक्त, त्यांच्या शेजाऱ्यांची घरेही रहिवाशांसह वाहून गेल्याचे सांगितले जात आहे. भूस्खलनामुळे, शहराचा बराचशा भागाचा संपर्क तुटला आहे.

दरम्यान, केरळमध्ये निसर्गान थैमान घातले आहे. इथे मुसळधार पावसानंतर पुन्हा एकदा भूस्खलनाच्या घटना सुरु झाल्या आहेत. केरळमध्ये शनिवारपासून मुसळधार पावसामुळे आलेल्या पूर आणि भूस्खलनामुळे किमान २४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिस्थितीला सामोरे मदत देऊ केली आहे. दुसरीकडे केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी पावसामुळे राज्यातील बिघडलेली परिस्थिती पाहता तातडीची बैठक बोलावली. लष्कर, नौदल आणि हवाई दलाची मदत घेतली जात आहे. जिल्ह्यांमध्ये मदत शिबिरे सुरू करण्यात आली आहेत. राज्य सरकार सर्व धरणांच्या पाण्याच्या पातळीवर लक्ष ठेवत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.  

टॅग्स :KeralaकेरळKerala Floodsकेरळ पूर