शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

Kerala Flood: हृदयद्रावक! केरळ महापुरात एकाच कुटुंबातील ६ जण गेले वाहून; काही क्षणांत तीन पिढ्यांचा अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 13:24 IST

Kerala Flood: केरळमधील कोट्टायम जिल्ह्यातील कवली गावातील रहिवासी असलेल्या एका संपूर्ण कुटुंबाचा महापूर आणि भूस्खलनात करुण अंत झाला.

कोट्टायम: गेल्या काही दिवसापासून अतिवृष्टीमुळे केरळमधील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. काही ठिकाणी महापूर आला आहे. कोट्टायम आणि इडुक्की जिल्ह्यांच्या डोंगराळ भागात झालेल्या भूस्खलनानंतर अनेक जण बेपत्ता झाली असून, काही जणांचा मृत्यू झाला आहे. पूर परिस्थितीमुळे सखल भागात राहणाऱ्या हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. यातच आता याच कोट्टायम जिल्ह्यातील एका कुटुंबातील सर्व सहा सदस्यांनी आपला जीव गमावला. महापूर आणि भूस्खलनामध्ये या सहा जणांनी आपले प्राण गमावले असून, यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

केरळमधील कोट्टायम जिल्ह्यातील कवली गावातील रहिवासी असलेल्या एका संपूर्ण कुटुंबाचा महापूर आणि भूस्खलनात करुण अंत झाला. सोमवारी सायंकाळी कवली सेंट मेरी चर्चमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बिशप मार जोसेफ कलरंगट्ट यांनी लोकांच्या आणि केरळ मंत्रिमंडळातील मंत्री आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.

हे ठिकाण भूस्खलनामुळे खूप प्रभावित

कुटुंबप्रमुख मार्टिन, त्यांची पत्नी सिनी, त्यांच्या मुली स्नेहा, सोना आणि सँड्रा आणि त्यांची आजी क्लारम्मा त्यांच्या जिल्ह्यात झालेल्या पूर आणि भूस्खलनामध्ये मृत्यू पावल्या. त्यांचे कुटुंब कावली येथील एका चर्चजवळ राहत होते. हे ठिकाण भूस्खलनामुळे खूप प्रभावित झाले असून, कुट्टिकल, कोट्टायममधील ठिकाणांपैकी एक होते. मार्टिन कुटुंबाव्यतिरिक्त, त्यांच्या शेजाऱ्यांची घरेही रहिवाशांसह वाहून गेल्याचे सांगितले जात आहे. भूस्खलनामुळे, शहराचा बराचशा भागाचा संपर्क तुटला आहे.

दरम्यान, केरळमध्ये निसर्गान थैमान घातले आहे. इथे मुसळधार पावसानंतर पुन्हा एकदा भूस्खलनाच्या घटना सुरु झाल्या आहेत. केरळमध्ये शनिवारपासून मुसळधार पावसामुळे आलेल्या पूर आणि भूस्खलनामुळे किमान २४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिस्थितीला सामोरे मदत देऊ केली आहे. दुसरीकडे केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी पावसामुळे राज्यातील बिघडलेली परिस्थिती पाहता तातडीची बैठक बोलावली. लष्कर, नौदल आणि हवाई दलाची मदत घेतली जात आहे. जिल्ह्यांमध्ये मदत शिबिरे सुरू करण्यात आली आहेत. राज्य सरकार सर्व धरणांच्या पाण्याच्या पातळीवर लक्ष ठेवत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.  

टॅग्स :KeralaकेरळKerala Floodsकेरळ पूर