शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

Kerala Flood: हृदयद्रावक! केरळ महापुरात एकाच कुटुंबातील ६ जण गेले वाहून; काही क्षणांत तीन पिढ्यांचा अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 13:24 IST

Kerala Flood: केरळमधील कोट्टायम जिल्ह्यातील कवली गावातील रहिवासी असलेल्या एका संपूर्ण कुटुंबाचा महापूर आणि भूस्खलनात करुण अंत झाला.

कोट्टायम: गेल्या काही दिवसापासून अतिवृष्टीमुळे केरळमधील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. काही ठिकाणी महापूर आला आहे. कोट्टायम आणि इडुक्की जिल्ह्यांच्या डोंगराळ भागात झालेल्या भूस्खलनानंतर अनेक जण बेपत्ता झाली असून, काही जणांचा मृत्यू झाला आहे. पूर परिस्थितीमुळे सखल भागात राहणाऱ्या हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. यातच आता याच कोट्टायम जिल्ह्यातील एका कुटुंबातील सर्व सहा सदस्यांनी आपला जीव गमावला. महापूर आणि भूस्खलनामध्ये या सहा जणांनी आपले प्राण गमावले असून, यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

केरळमधील कोट्टायम जिल्ह्यातील कवली गावातील रहिवासी असलेल्या एका संपूर्ण कुटुंबाचा महापूर आणि भूस्खलनात करुण अंत झाला. सोमवारी सायंकाळी कवली सेंट मेरी चर्चमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बिशप मार जोसेफ कलरंगट्ट यांनी लोकांच्या आणि केरळ मंत्रिमंडळातील मंत्री आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.

हे ठिकाण भूस्खलनामुळे खूप प्रभावित

कुटुंबप्रमुख मार्टिन, त्यांची पत्नी सिनी, त्यांच्या मुली स्नेहा, सोना आणि सँड्रा आणि त्यांची आजी क्लारम्मा त्यांच्या जिल्ह्यात झालेल्या पूर आणि भूस्खलनामध्ये मृत्यू पावल्या. त्यांचे कुटुंब कावली येथील एका चर्चजवळ राहत होते. हे ठिकाण भूस्खलनामुळे खूप प्रभावित झाले असून, कुट्टिकल, कोट्टायममधील ठिकाणांपैकी एक होते. मार्टिन कुटुंबाव्यतिरिक्त, त्यांच्या शेजाऱ्यांची घरेही रहिवाशांसह वाहून गेल्याचे सांगितले जात आहे. भूस्खलनामुळे, शहराचा बराचशा भागाचा संपर्क तुटला आहे.

दरम्यान, केरळमध्ये निसर्गान थैमान घातले आहे. इथे मुसळधार पावसानंतर पुन्हा एकदा भूस्खलनाच्या घटना सुरु झाल्या आहेत. केरळमध्ये शनिवारपासून मुसळधार पावसामुळे आलेल्या पूर आणि भूस्खलनामुळे किमान २४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिस्थितीला सामोरे मदत देऊ केली आहे. दुसरीकडे केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी पावसामुळे राज्यातील बिघडलेली परिस्थिती पाहता तातडीची बैठक बोलावली. लष्कर, नौदल आणि हवाई दलाची मदत घेतली जात आहे. जिल्ह्यांमध्ये मदत शिबिरे सुरू करण्यात आली आहेत. राज्य सरकार सर्व धरणांच्या पाण्याच्या पातळीवर लक्ष ठेवत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.  

टॅग्स :KeralaकेरळKerala Floodsकेरळ पूर