शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

उत्तम पंतप्रधान होण्यासाठी राहुल गांधींकडे सर्व गुण, थरूर यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 05:53 IST

उत्तम पंतप्रधान होण्यासाठी आवश्यक असलेले सर्व गुण काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ काँग्रेस नेते व खासदार शशी थरूर यांनी रविवारी केले.

नवी दिल्ली : उत्तम पंतप्रधान होण्यासाठी आवश्यक असलेले सर्व गुण काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ काँग्रेस नेते व खासदार शशी थरूर यांनी रविवारी केले. मात्र, पंतप्रधानपदाच्या उमेदवाराचा निर्णय सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर काँग्रेस आणि मित्रपक्ष सामूहिकपणे करतील, यावर त्यांनी भर दिला.‘पीटीआय’ वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. ते म्हणाले की, अनेक वेळा चर्चा व संवाद केल्यानंतर मला राहुल गांधी अगदी जवळून जे जाणवले त्यावरून व्यक्तिश: मला असे वाटते की, देशाचा एक उत्तम पंतप्रधान होण्यासाठी लागणारे सर्व गुण त्यांच्याकडे आहेत. समावेशी नेतृत्व, मतभेदांच्या पलीकडे जाऊन माणसे जोडण्याची मानसिकता, समाजातील दुर्बल घटकांविषयी कणव, देशाच्या बहुढंगी स्वरूपाशी असलेली बांधिलकी, विनम्रता, कमालीची जागरूकता आणि या सर्वांच्या जोडीला असलेला खास करिश्मा या राहुलजींच्या गुणांचा थरूर यांनी खासकरून उल्लेख केला. शिवाय काँग्रेसेतर नेत्यांनी केलेली ताजी वक्तव्ये पाहता राहुल गांधी हे त्या पदासाठी योग्य असल्याची वाढती खात्री इतर पक्षांना वाटत असल्याचे दिसते. तीन हिंदीभाषी राज्यांच्या विधानसभा काँग्रेसने जिंकल्याने विरोधकांच्या महाआघाडीचे गणित बदलेल का, असे विचारता थरूर म्हणाले की, याविषयी लगेच काही सांगता येणार नाही; पण ताजे निकाल हे काँग्रेससाठी शुभसंकेत आहेत, हे नक्की. भाजपाच्या भूलथापांना आम्ही आता विटलो आहोत. काँग्रेसलाही साथ देण्याची आमची तयारी आहे, असे संकेत मतदारांनी दिले आहेत.आघाडीच्या केंद्रस्थानी काँग्रेसचथरूर म्हणाले की, संपूर्ण देशव्यापी असा जनाधार असलेला काँग्रेस हा एकमेव पर्यायी पक्ष आहे, ही गोष्ट विधानसभा निवडणुकांवरून स्पष्ट झाली. त्यामुळे विरोधी पक्षांची देशपातळीवर आघाडी तयार करायची झाल्यास काँग्रेसच त्याच्या केंद्रस्थानी असेल, हे साहजिक आहे.राहुल गांधी हे आमचे नेते आहेत. त्यामुळे काँग्रेसला बहुमत मिळाले, तर ते पंतप्रधान होतील, हे उघड आहे. मात्र, काँग्रेसला आघाडीचे सरकार स्थापन करावे लागले, तर आघाडीतील इतर पक्षांच्या सहमतीनेच पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरविला जाईल.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी