शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

विशेष राज्याचा दर्जा वाचवण्यासाठी काश्मीरमध्ये सर्वपक्षीय एकजूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2019 21:48 IST

नँशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला ओमर अब्दुल्ला, पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या महेबुबा मुफ्ती यांच्यासह शाह फैसल आणि सज्जाद लोन उपस्थित होते.

श्रीनगर - काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली सुरक्षा दलांची तैनाती आणि दिल्लीत सुरू असलेल्या हालचालींमुळे काश्मीरबाबत  मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आज राज्याचा विशेष दर्जा वाचवण्यासाठी काश्मीरमध्ये सर्वपक्षीय एकजूट दिसून आली. काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती बिघडेल, असे पाऊल भारत आणि पाकिस्तानने उचलू नये, असे आवाहन फारुख अब्दुल्ला यांनी या बैठकीनंतर केले.

नँशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला ओमर अब्दुल्ला, पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या महेबुबा मुफ्ती यांच्यासह शाह फैसल आणि सज्जाद लोन उपस्थित होते. या बैठकीनंतर फारुख अब्दुल्ला म्हणाले की,"काश्मीरमध्ये यापूर्वी असे कधीच घडलेले नाही. काश्मीरसाठी हा सर्वात वाईट काळ आहे. यापूर्वी अमरनाथ यात्रा कधीच थांबवली गेली नाही.  काश्मीर खोऱ्यात तणाव वाढेल, असे कुठलेही पाऊल भारत आणि पाकिस्तानने उचलू नये, असे आवाहन मी करू इच्छितो."

"काश्मीरला मिळालेला विशेष राज्याचा दर्जा वाचवण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलो आहोत. जम्मू काश्मीरमध्ये यापूर्वी कधीही एवढ्या प्रमाणात सुरक्षा दलांची तैनाती झालेली नाही.  खोऱ्यातील नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत. या नागरिकांना मी एवढंच सांगू इच्छितो की धीर धरा, खोऱ्यातील शांततेचा भंग होईल, असे कुठलेही पाऊल उचलू नका", असेही ओमर अब्दुल्ला यांनी सांगितले.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर