शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

अनिवासी लखोबांनो सावधान... 48 तासांच्या आत विवाहनोंदणी आवश्यक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2018 14:18 IST

अनिवासी भारतीयांनी केलेल्या विवाहाची नोंदणी 48 तासांमध्ये व्हायला हवी असे केंद्रीय महिला आणि बालकल्याण विकास मंत्री मेनका गांधी यांनी आदेश दिले आहेत.

नवी दिल्ली- भारतामध्ये अनिवासी भारतीयांनी केलेल्या विवाहाची नोंदणी 48 तासांमध्ये व्हायला हवी असे केंद्रीय महिला आणि बालकल्याण विकास मंत्री मेनका गांधी यांनी आदेश दिले आहेत.

आतापर्यंत अनिवासी भारतीयांच्या विवाहाबाबत असे नियम नाहीत. मात्र विधी आयोगाने या विवाहांची 30 दिवसांमध्ये नोंदणी व्हायला हवी अशी सूचना दिली आहे. त्याचप्रमाणे तीस दिवसांनंतर प्रतीदिन 5 रुपयांचा दंड लागू करण्याचीही सूचना या आयोगाने केली आहे.

मेनका गांधी यांनी काल याबाबत बोलताना सांगितले, सर्व अनिवासी भारतीयांच्या विवाहाची नोंदणी 48 तासांमध्ये व्हायला हवी अन्यथा पासपोर्ट, व्हीसा वगैरे कोणतीच सुविधा त्यांच्यासाठी उपलब्ध होणार नाही. नोंदणी केलेल्या सर्व विवाहांची माहिती केंद्र सरकारच्या डेटाबेसकडे पाठवण्याचे आदेशही रजिस्ट्रारना देण्यात आले आहेत. अनिवासी भारतीयांच्या विवाहासंदर्भात अनेक प्रकरणे समोर येत होती. त्यामुळे महिला बालकल्याणविकास मंत्रालयाने  परराष्ट्र मंत्रालय, गृह मंत्रालय आणि कायदा व न्याय मंत्रालयाच्या समावेशासह एक इंटीग्रेटेड नोडल एजन्सीची स्थापना केली होती. त्या एजन्सीने दिलेल्या सुचनेनुसार हे निर्णय घेण्यात आले आहेत. मंत्रालयासमोर आलेल्या सहा प्रकरणांमध्ये लूक आउट नोटिस बजावण्यात आली तर पाच प्रकरणांमध्ये पासपोर्ट अवैध ठरवण्याचा निर्णय घेतला गेला असे गांधी यांनी याबाबत बोलताना सांगितले. अनिवासी भारतीयांतर्फे मुलींची फसवणूक, त्रास अशा, मुलींना सोडून परत परदेशात कायमचे जाणे अशी अनेक प्रकरणे सतत मंत्रालयासमोर येत असतात. त्यामुळेच असे पाऊल उचलण्यात आले असावे.

टॅग्स :marriageलग्न