शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
2
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
3
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
4
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
5
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
6
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
7
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
8
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
9
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
12
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
13
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
14
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
15
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
16
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
17
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
18
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
19
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
20
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!

सर्व सैन्य लावले तरी दहशतवाद पुरून उरेल - फारुख अब्दुल्ला

By admin | Updated: November 29, 2015 03:33 IST

पाकिस्तानने बळकावलेले काश्मीर परत मिळविण्यासाठी आडवर काहीही केले गेले नसले तरी काश्मीरचा प्रश्न सोडविण्यासाठी पाकिस्तानशी चर्चा करणे हाच एकमेव मार्ग आहे, असे आग्रही

जम्मू: पाकिस्तानने बळकावलेले काश्मीर परत मिळविण्यासाठी आडवर काहीही केले गेले नसले तरी काश्मीरचा प्रश्न सोडविण्यासाठी पाकिस्तानशी चर्चा करणे हाच एकमेव मार्ग आहे, असे आग्रही प्रतिपादन जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री व नॅशनल कॉन्फरन्सचे ज्येष्ठ नेते डॉ. फारुख अब्दुल्ला यांनी शनिवारी येथे केले.पाकिस्तानने व्यापलेले काश्मीर त्यांच्याकडेच राहणार आहे व भारताकडील काश्मीर आपल्याकडे राहणार आहे, या डॉ. अब्दुल्ला यांच्या विधानाने शुक्रवारी वादंग माजले होते. तेच सूत्र पकडून शनिवारी येथे एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले: पाकव्याप्त काश्मीर आणि जम्मू-काश्मीर कधीच एक होऊ शकणार नाहीत, हे मी राजकारणात आल्यापासून सांगत आलो आहे. पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर परत मिळविण्याची ताकद आपल्यात नाही व आपले काश्मीर घेण्याचे बळ पाकिस्तानात नाही. आपल्याप्रमाणे तोही (पाकिस्तान) एक अण्वस्त्रधारी देश आहे.लष्कर तरी आपले किती संरक्षण करू शकेल. सर्व सैन्य जरी मदतीला आले तर ते दहशतवादी आणि बंडखोरांपासून आपला बचाव करू शकणार नाहीत. त्यामुळे (पाकिस्तानशी) चर्चा करून मार्ग काढणे हाच एकमेव पर्याय शिल्लक राहतो, यावर त्यांनी भर दिला.अटल बिहारी बाजपेयी पंतप्रधान असताना काश्मीर समस्या सुटू शकेल, याविषयी मला आशा होती. पण तसे झाले नाही, असेही डॉ. अब्दुल्ला म्हणाले. पाकिस्तान व भारताने आपापल्या ताब्यातील काश्मीरचे भाग कायमसाठी स्वत:कडे ठेवणे हा अंतिम तोडगा आहे, असे मी कधीच म्हटलेले नाही. बहुसंख्य भारतीयांना, पाकिस्तानींना व जम्मूृकाश्मीरवासियांना मान्य होईल असा याहूनही चांगला तोडगा असेल तर तोही आम्हाला मान्य होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.पाकव्याप्त काश्मीर हा पाकिस्तानचा भाग असल्याचे म्हटल्याबद्दल डॉ. अब्दुल्ला यांनी माफी मागावी,अशी मागणी भाजपाने केली असून राजकारणात टिकून राहण्यासाठी ते मुद्दाम असे विषय उकरून काढत असल्याचा आरोप केला आहे.(वृत्तसंस्था)