शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत निवडणुकीआधी तीन महिलांसोबत केलं लग्न, निकालात दोन पत्नी निवडूनही आल्या!; नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 17:39 IST

मध्य प्रदेशचे पंचायत निवडणुकीचे निकाल लक्षवेधी राहिलेले आहेत. यात अलीराजपूर येथील निकालाचीही जोरदार चर्चा होत आहे. कारणही तसंच आहे.

अलीराजपूर-

मध्य प्रदेशचे पंचायत निवडणुकीचे निकाल लक्षवेधी राहिलेले आहेत. यात अलीराजपूर येथील निकालाचीही जोरदार चर्चा होत आहे. कारणही तसंच आहे. एका व्यक्तीनं पंचायत निवडणूक मतदानाआधी एकाच मंडपात तीन महिलांसोबत विवाह केला. निकालानंतर त्यातील दोन पत्नी निवडून देखील आल्या आहेत. 

अलीराजपूरपासून जवळपास १४ किमी दूर असलेल्या नानपूर गावात राहणाऱ्या समरथ सिंह मोर्याची ही आश्चर्यकारक कहाणी आहे. याच वर्षी ३० एप्रिलला सार्वजनिक कार्यक्रमात त्यानं सकरी (२५), मेला (२८) आणि नानी बाई (३०) यांच्याशी एकाच मंडपात विवाह केला. पंचायत निवडणुकीची घोषणा झाली त्यावेळी तीनपैकी दोन पत्नी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या आणि दोन्ही पत्नी विजयी झाल्या आहेत. 

विजयानंतर समरथ सिंह यांनी आपल्या दोन्ही पत्नींसोबत गावात घरोघरी जाऊन मतदारांचे आभार देखील व्यक्त केले. तसंच ज्येष्ठांचे आशिवार्द देखील घेतले. समरथ मोर्या नानपुरचे सरपंच आहेत. त्यांचं कुटुंब जनतेच्या सुख-दु:खात नेहमी सोबत राहिल असं आश्वासन त्यांनी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर समरथ यांना पाठिंबा मिळाला. यावेळी पंचायत निवडणुकीत जागा महिला उमेदवारासाठी रिझर्व्ह झाल्यानंतर त्यांनी सकरी बाई म्हणजेच आपल्या पत्नीला सरपंच पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उभं केलं. तर दुसरी पत्नी मेला बाई हिला वॉर्ड क्रमांक-१४ मधून पंचायत सदस्य पदासाठी उभं केलं. 

"मी २००२-०३ सालापासून राजकारणात आहे. २०१० मध्ये मी सरपंच झालो आणि त्यानंतर उपसरपंच देखील झालो. २०१५ साली पुन्हा सरपंच बनलो. आता २०२२ मध्ये माझ्या दोन पत्नी निवडणूक जिंकल्या आहेत. तिसरी पत्नी शिक्षण विभागात चतुर्थ श्रेणी कर्मचारी असल्यामुळे ती निवडणुकीला उभी राहू शकली नाही", असं समरथ सिंह यांनी सांगितलं. 

एकाचवेळी तीन लग्न कशी केली?एकाच वेळी तीन महिलांशी लग्न करण्यामागे देखील एक खास कारण आहे. आदिवासी भिलाला समुदायात लिव्ह-इनमध्ये राहणं आणि संतती प्राप्तीची सूट आहे. जोवर विधीवत लग्न लावलं जात नाही तोवर लग्न झालं असं मानलं जात नाही. तोवर सामाजिक कार्यक्रमांमध्ये उपस्थिती लावण्यासाठी परवानगी देखील दिली जात नाही. त्यामुळेच सहा मुलं असतानाही समरथ मोर्या यांनी तीन लिव्ह-इन प्रेयसींसोबत लग्न केलं होतं. 

आता तुम्ही म्हणाल की अशा पद्धतीनं लग्न करणं भारतीय कायद्यात बसतं का? तर भारतीय संविधानाच्या अनुच्छेद-३४२ अनुसार आदिवासी रिती-रिवाज आणि विशिष्ट सामाजिक परंपरांच्या संरक्षण दिलं जातं. त्यामुळे या अनुच्छेदानुसार समरथ याचं एकाचवेळी तीन जणींसोबत लग्न अवैध मानलं जात नाही. 

 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेश