शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
2
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
3
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
4
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
5
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
6
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
7
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
8
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
9
दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
10
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
11
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
12
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   
13
IND vs AUS : प्रितीच्या मोहऱ्यांची टीम इंडियाकडून हवा! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेत कुटल्या ४१३ धावा
14
“मोदींची सत्ता उलथवून टाकण्यासाठी राहुल गांधींसोबत एकत्र यायला अडचण नाही”: प्रकाश आंबेडकर
15
नोकरीच्या संधी कमी होणार? देशातील उत्पादन वाढ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर; 'या' कारणांचा थेट फटका
16
1 लाख 34 हजार रुपयांचा iphone 17 Pro Max बनवण्यासाठी किती खर्च येतो? आकडे ऐकून चक्रावून जाल...
17
दसरा मेळाव्यासाठी ६३ कोटींचा खर्च, शेतकऱ्यांना द्या; भाजपच्या मागणीवर ठाकरे म्हणाले, "उद्या बिल पाठवतो"
18
Dussehra 2025: दसऱ्याच्या मुहूर्तावर ११ लवंगांचा 'हा' विधी, दहन करेल तुमच्या आर्थिक अडचणी!
19
दिवाळीनंतर लगेच निवडणुकीचा धुराळा! राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर
20
“शिशुपालाप्रमाणे RSSची शंभरी भरली, मनुस्मृती, बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा”: सपकाळ

अखिलेश यांच्या जागी नवा चेहरा?

By admin | Updated: September 15, 2016 03:46 IST

उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षात सरकार आणि संघटनात्मक पातळीवर रस्सीखेच पाहायला मिळत आहे. पक्षप्रमुख मुलायमसिंह यादव आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव

मीना कमल , लखनौ उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षात सरकार आणि संघटनात्मक पातळीवर रस्सीखेच पाहायला मिळत आहे. पक्षप्रमुख मुलायमसिंह यादव आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यातील संघर्ष विधानसभा भंग करण्याच्या निर्णयापर्यंतही जाऊ शकतो, अशी परिस्थिती आहे. राज्यातील राजकारण हे अखिलेश सरकारच्या सत्तापालटाकडे पाऊल टाकताना दिसत आहे. पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव हे मुख्यमंत्री पदावरून अखिलेश यांना हटवून त्यांच्या जागी नवा चेहरा देऊ शकतात, तर विधानसभा निवडणुकीपर्यंत मुख्यमंत्रिपदाची खुर्ची कायम ठेवण्यासाठी अखिलेश यादव विधानसभा भंग करण्याच्या विचारात आहेत. राज्यात सपाच्या अंतर्गत राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवून त्यांच्या जागी शिवपाल यादव यांची नियुक्ती झाल्यानंतर, अखिलेश यादव यांनी काही तासांतच शिवपाल यांची सिंचन, पूर नियंत्रण, सहकार आदी खाती काढून घेतली. हे प्रकरण मुलायमसिंह यांनी गांभीर्याने घेतल्याचे सांगितले जात आहे. अखिलेश यांच्याकडून पक्षाला हे आव्हान मानले जात आहे. या पूर्वी आमदार मुख्तार अन्सारी यांच्या पक्षाच्या विलयाच्या वेळीही अखिलेश यादव यांनी बंडखोर वृत्ती दाखविली होती आणिसंघटनेला कमी लेखले होते. त्यानंतर मुलायमसिंह यांच्या निर्देशानंतर विलयाचा हा निर्णय मागे घ्यावा लागला होता. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या अलीकडच्या काही निर्णयामुळे मुलायमसिंह यादव यांना यात बंडखोरी दिसू लागली आहे. संपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, सरकार आणि संघटना या संघर्षात मुलायमसिंह यादव अखिलेश यांना मुख्यमंत्री पदावरून हटवू शकतात. हा संघर्ष असाच सुरू राहिला तर नव्या प्रदेशाध्यक्षाच्या रूपात शिवपाल सिंह सपाच्या आमदारांची बैठक बोलावून नव्या नेत्याच्या निवडीचा प्रस्ताव आणू शकतात. असे सांगितले जाते की, मुलायमसिंह यादव यांनी आपल्या या डावपेचाचा एक भाग म्हणून शिवपाल यादव यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. विधायक दलाची बैठक बोलाविण्याचा अधिकार आता मुलायमसिंह यादव आणि शिवपालसिंह यादव यांच्याकडे आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा संघर्ष थांबला नाही, तर अखिलेश विधानसभा भंग करण्याची शिफारस करू शकतात. ..........कुटुंबाचा नव्हे, सरकारचा वादहा सरकारचा वाद आहे, कुटुंबाचा नव्हे. तर घराबाहेरील लोक पक्षात हस्तक्षेप करु लागले तर पक्ष कसा चालेल. कुटुंबात सर्व जण नेताजींचा (मुलायम सिंह) शब्द पाळतात. मी सुद्धा ऐकतो. अर्थात काही निर्णय मी घेतले. पण, त्यांचाही शब्द पाळला. ---------केवळ तुमचे (मुलायमसिंह) ऐकलेय, म्हणून मला खलनायक म्हणून पाहिले जात आहेत, अशी तक्रार शिवपाल यादव यांनी दिल्लीत मुलायमसिंग यादव यांच्या भेटीदरम्यान केल्याचे कळते. मात्र, पक्षात आणि कुटुंबात सर्वकाही आलबेल आहे. कोणतेही मतभेद नाहीत, अशी प्रतिक्रिया त्यांनी बैठकीनंतर दिली.