शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
5
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
6
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
7
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
8
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
9
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
10
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
11
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
12
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
13
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
14
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
15
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
17
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
18
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
19
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
20
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

Akhilesh Yadav: "कुठेही दगड ठेवा, बाजूला लाल झेंडा ठेवा अन् मंदिर तयार", अखिलेश यादव यांचे वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 10:45 IST

Akhilesh Yadav : "तेव्हा रात्रीच्या वेळी मूर्ती ठेवण्यात आल्या", बाबरी मशिदीबाबत अखिलेश यांचे मोठे विधान

अयोध्या: समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी हिंदूंच्या श्रद्धेबाबत एक वादग्रस्त विधान केलं आहे. बुधवारी रामनगरी अयोध्येत पत्रकारांनी संवाद साधताना त्यांना वाराणसीच्या ज्ञानवापी सर्वेक्षणावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अखिलेश यादव म्हणाले की, "हिंदू धर्मात कुठेही दगड ठेवा, त्याला लाल रंग लावा आणि एखादा भगवा झेंडा ठेवा. तिथे लगेच मंदिर बांधले जाते," असे वक्तव्य अखिलेश यांनी केले आहे.

बाबरी मशिदीबाबत मोठं वक्तव्यअखिलेश यादव एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी यावेळी हातवाऱ्यांमध्ये बाबरी मशिदीबाबतही मोठं वक्तव्य केलं. ते म्हणाले की, "एक काळ असा होता की, रात्रीच्या वेळी मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या." अखिलेश यादव यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजपने याला समाजवादी पक्षाचे तुष्टीकरणाचे राजकारण म्हटले आहे.

'वाराणसी प्रकरणामागे मोठे षडयंत्र'बुधवारी अयोध्येतील पत्रकार परिषदेत अखिलेश यादव म्हणाले की, "भारतीय जनता पक्ष वाराणसीचा मुद्दा जाणूनबुजून उपस्थित करत आहे. वाराणसीच्या प्रश्नामागे मोठमोठे कारखाने विकले जात आहेत. ज्या वेळी तुम्ही-मी ज्ञानवापी मशिदीवर चर्चा करत होतो, त्याच वेळी भारतीय जनता पक्षाने एक योजना राबवली. आधी त्यांनी वन नेशन वन रेशन योजना राबवली, आता ते वन नेशन वन इंडस्ट्रियालिस्ट ही योजना चालवत आहे."

'उद्योगपतींना मोठ्या वस्तू विकल्या गेल्या'अखिलेश यादव पुढे म्हणाले की, "देशातील उद्योगपतींना मोठ्या गोष्टी विकल्या जात आहेत. कंपन्या विकल्या जात आहेत. एलआयसी विकत आहेत, विमानतळ विक्रीवर काढले आहेत, ट्रेन विक्रीवर काढल्या आहेत. उद्योगपती हवे ते विकत घेतील, इंग्रजांनी ज्या प्रकारे डिवाइड अँड रुल केले, त्याच पद्धतीने भारतीय जनता पक्ष डिवाइड अँड रुल करत आहे. हे तत्व हजारो वर्षे जुने आहे जे एकेकाळी इंग्रजांनी वापरले होते. भारतीय जनता पक्ष त्याच तत्वावर चालत आहे,"अशी टीका अखिलेश यांनी केली.

भाजपकडून टीकास्त्रभाजपचे प्रदेश प्रवक्ते राकेश त्रिपाठी यांनी अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधत म्हटले की, "या विधानावरून त्यांनी निवडणूक निकालातून कोणताही धडा घेतला नसल्याचे दिसते. अखिलेश यांचे हे विधान हिंदूंचा अपमान करणारे आहे. समाजवादी पक्षाने तुष्टीकरणाची उंची गाठली, याच समाजवादी पक्षाने कारसेवकांवर गोळीबार करण्याचे काम केले होते. लाल टोपीवाल्यांची तीच टोळी चालवणारे समाजवादी पक्षाचे लोक हिंदूंना अपमानित करण्याचे काम करत आहेत. अखिलेश यादव यांनी हिंदूंची माफी मागावी लागेल." 

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवAyodhyaअयोध्याbabri masjidबाबरी मस्जिदMosqueमशिदTempleमंदिर