शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

Akhilesh Yadav: "कुठेही दगड ठेवा, बाजूला लाल झेंडा ठेवा अन् मंदिर तयार", अखिलेश यादव यांचे वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 10:45 IST

Akhilesh Yadav : "तेव्हा रात्रीच्या वेळी मूर्ती ठेवण्यात आल्या", बाबरी मशिदीबाबत अखिलेश यांचे मोठे विधान

अयोध्या: समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी हिंदूंच्या श्रद्धेबाबत एक वादग्रस्त विधान केलं आहे. बुधवारी रामनगरी अयोध्येत पत्रकारांनी संवाद साधताना त्यांना वाराणसीच्या ज्ञानवापी सर्वेक्षणावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अखिलेश यादव म्हणाले की, "हिंदू धर्मात कुठेही दगड ठेवा, त्याला लाल रंग लावा आणि एखादा भगवा झेंडा ठेवा. तिथे लगेच मंदिर बांधले जाते," असे वक्तव्य अखिलेश यांनी केले आहे.

बाबरी मशिदीबाबत मोठं वक्तव्यअखिलेश यादव एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी यावेळी हातवाऱ्यांमध्ये बाबरी मशिदीबाबतही मोठं वक्तव्य केलं. ते म्हणाले की, "एक काळ असा होता की, रात्रीच्या वेळी मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या." अखिलेश यादव यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजपने याला समाजवादी पक्षाचे तुष्टीकरणाचे राजकारण म्हटले आहे.

'वाराणसी प्रकरणामागे मोठे षडयंत्र'बुधवारी अयोध्येतील पत्रकार परिषदेत अखिलेश यादव म्हणाले की, "भारतीय जनता पक्ष वाराणसीचा मुद्दा जाणूनबुजून उपस्थित करत आहे. वाराणसीच्या प्रश्नामागे मोठमोठे कारखाने विकले जात आहेत. ज्या वेळी तुम्ही-मी ज्ञानवापी मशिदीवर चर्चा करत होतो, त्याच वेळी भारतीय जनता पक्षाने एक योजना राबवली. आधी त्यांनी वन नेशन वन रेशन योजना राबवली, आता ते वन नेशन वन इंडस्ट्रियालिस्ट ही योजना चालवत आहे."

'उद्योगपतींना मोठ्या वस्तू विकल्या गेल्या'अखिलेश यादव पुढे म्हणाले की, "देशातील उद्योगपतींना मोठ्या गोष्टी विकल्या जात आहेत. कंपन्या विकल्या जात आहेत. एलआयसी विकत आहेत, विमानतळ विक्रीवर काढले आहेत, ट्रेन विक्रीवर काढल्या आहेत. उद्योगपती हवे ते विकत घेतील, इंग्रजांनी ज्या प्रकारे डिवाइड अँड रुल केले, त्याच पद्धतीने भारतीय जनता पक्ष डिवाइड अँड रुल करत आहे. हे तत्व हजारो वर्षे जुने आहे जे एकेकाळी इंग्रजांनी वापरले होते. भारतीय जनता पक्ष त्याच तत्वावर चालत आहे,"अशी टीका अखिलेश यांनी केली.

भाजपकडून टीकास्त्रभाजपचे प्रदेश प्रवक्ते राकेश त्रिपाठी यांनी अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधत म्हटले की, "या विधानावरून त्यांनी निवडणूक निकालातून कोणताही धडा घेतला नसल्याचे दिसते. अखिलेश यांचे हे विधान हिंदूंचा अपमान करणारे आहे. समाजवादी पक्षाने तुष्टीकरणाची उंची गाठली, याच समाजवादी पक्षाने कारसेवकांवर गोळीबार करण्याचे काम केले होते. लाल टोपीवाल्यांची तीच टोळी चालवणारे समाजवादी पक्षाचे लोक हिंदूंना अपमानित करण्याचे काम करत आहेत. अखिलेश यादव यांनी हिंदूंची माफी मागावी लागेल." 

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवAyodhyaअयोध्याbabri masjidबाबरी मस्जिदMosqueमशिदTempleमंदिर