शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
5
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
6
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
7
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
8
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
9
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
10
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
11
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
12
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
13
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
14
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
15
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
16
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
17
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
18
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
19
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
20
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप

"भाजपाने देणगीच्या लालसेपोटी कोट्यवधी देशवासियांचा जीव धोक्यात टाकला"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2024 12:54 PM

Akhilesh Yadav And Corona Vaccine : समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे. देणगीच्या लालसेपोटी भाजपाने कोट्यवधी देशवासियांचे जीव धोक्यात टाकला असं म्हणत हल्लाबोल केला आहे. 

कोविशील्ड लसीच्या गंभीर दुष्परिणामांबाबत कंपनीने ब्रिटीश न्यायालयात कबुली दिल्यानंतर, एस्ट्रेजेनका ही लस बाजारातून मागे घेतली आहे. याच दरम्यान आता समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे. देणगीच्या लालसेपोटी भाजपाने कोट्यवधी देशवासियांचे जीव धोक्यात टाकला असं म्हणत हल्लाबोल केला आहे. 

अखिलेश यादव यांनी कोरोना लसीवर भाजपाला घेरलं आहे आणि म्हणाले की, "कोरोना लस बनवणारी कंपनी अतिरिक्त पुरवठ्याच्या बहाण्याने आपली जीवघेणी लस बाजारातून परत घेत आहे. संतप्त जनता भाजपा सरकारला विचारत आहे की, ज्यांच्या शरीरात ही धोकादायक लस पोहोचली आहे ती आता त्यांच्याकडून कशी परत घेणार?"

"कोटय़वधी रुपयांच्या देणगीच्या लालसेपोटी भाजपाने कोट्यवधी जीव धोक्यात घातले आहेत. आपल्याच देशवासियांचा जीव धोक्यात घालून भाजपा ‘जनद्रोही’ पक्ष बनला आहे." कोरोना लसीबाबत भाजपा सरकारवर निशाणा साधण्याची एकही संधी अखिलेश यादव सोडत नाहीत. प्रत्येक सभेत सपा भाजपकडून कोरोनाच्या इंजेक्शनचा बदला घेण्याचा घोषणा देत आहे.

कोविशील्ड लस बनवणाऱ्या कंपनीने अलीकडेच ब्रिटीश न्यायालयात कबूल केलं होतं की, या लसीमुळे टीटीएस थ्रोम्बोसिस थ्रोम्बोसायटोपेनिया सिंड्रोमचे दुर्मिळ दुष्परिणाम होऊ शकतात. यामुळे त्या व्यक्तीला रक्त गोठण्याची समस्या निर्माण होते आणि हृदयविकाराचा झटका-ब्रेन स्ट्रोक सारख्या घटना घडू शकतात. या लसीवर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर मंगळवारी कंपनीने जगभरातील बाजारातून ही लस परत घेत असल्याचे जाहीर केले.  

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवCorona vaccineकोरोनाची लस