शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

...तर अखिलेश यादव यांनी पाकिस्तानात जाऊन पूजा करावी, भाजपा नेत्याचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 14:52 IST

केंद्र सरकारने देशात राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) अद्ययावत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विरोधक आणखी आक्रमक झाले आहेत.

ठळक मुद्देकेंद्र सरकारने देशात एनपीआर अद्ययावत करण्याचा निर्णय घेतल्यामुळे विरोधक आणखी आक्रमक झाले आहेत. भाजपाचे नेते स्वतंत्र देव सिंह यांनी अखिलेश यादव यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 'अखिलेश यादव यांनी पाकिस्तानात जाऊन पूजा करावी, मग कळेल तिथे काय होतं ते' 

लखनऊ - केंद्र सरकारने देशात राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) अद्ययावत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विरोधक आणखी आक्रमक झाले असून या मुद्द्यावरून समाजवादी पार्टीचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी काही दिवसांपूर्वी भाजपावर निशाणा साधला होता. त्यानंतर आता भाजपाचे नेते स्वतंत्र देव सिंह यांनी अखिलेश यादव यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 

'अखिलेश यादव यांनी पाकिस्तानात जाऊन पूजा करावी, मग कळेल तिथे काय होतं ते' असं म्हणत स्वतंत्र देव सिंह यांनी अखिलेश यांच्यावर निशाणा साधला आहे. 'अखिलेश यादव यांनी पाकिस्तानमध्ये जायला हवं. तिथे एक महिना मंदिरात जाऊन पूजा करायला हवी. तेव्हा त्यांना तिथे नेमकं काय होतं हे समजेल. काय हवंय हे त्यांनाच माहीत नाही' असं स्वतंत्र देव सिंह यांनी गुरुवारी (2 जानेवारी) म्हटलं आहे. 

अखिलेश यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) यांचा अभ्यास करायला हवा असं देखील भाजपा नेत्याने म्हटलं आहे. स्वतंत्र देव सिंह यांनी प्रियंका गांधींवरही आरोप केला आहे.  नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत काँग्रेसच्या प्रियंका गांधी लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) या मुद्द्यांवरून सध्या देशातील राजकीय वातावरण तापले आहे. सीएए आणि एनआरसीच्या विरोधात ठिकठिकाणी विरोधी पक्षांकडून आंदोलने करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपाकडून सीएए आणि एनआरसीच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात येत आहे. 

एनपीआरचा फॉर्म भरणार नाही. आपण भारतीय नागरिक आहोत की नाही, हे भाजपा ठरवू शकत नाही. आम्हाला रोजगार पाहिजे, एनपीआर नको. देशाची अर्थव्यवस्था अतिदक्षता विभागात गेली आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे, असे सांगत अखिलेश यादव यांनी काही दिवसांपूर्वी भाजपावर हल्लाबोल केला होता. याशिवाय, आम्ही एनआरसी आणि एनपीआर फॉर्म भरणार नाही, तर महात्मा गांधींनी आपल्या पहिल्या आंदोलनात कागदपत्रे जाळली होती. आपणही तसेच करायचे, असे आवाहन अखिलेश यांनी पार्टीच्या कार्यकर्त्यांना केले होते. याचबरोबर, भाजपा सरकार जनतेला घाबरत आहे. त्यामुळे भाजपा सत्य काय आहे, ते जनतेपर्यंत पोहचू देत नाही. देशात अन्याय खूप वाढला आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट सुद्धा दिला जात नाही. सीएए आणि एनआरसीच्या विरोधातील आंदोलनादरम्यान अनेक निर्दोष लोकांचा मृत्यू झाला. या मृतांच्या नातेवाईकांना समाजवादी पार्टीकडून मदत करण्यात येईल, असेही अखिलेश यादव यांनी सांगितले होते.  

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवBJPभाजपाPakistanपाकिस्तान