शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

“भारत जोडो न्याय यात्रा काँग्रेसची, आम्हाला अपेक्षा आहे की...”; अखिलेश यादव यांची मोठी अट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 10:54 IST

Akhilesh Yadav On Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra: राहुल गांधींची ही यात्रा होत आहे, ही चांगली गोष्ट आहे, असे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.

Akhilesh Yadav On Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra: राहुल गांधी यांच्या १४ जानेवारीपासून सुरू होणार असलेल्या यात्रेचे नाव बदलून ‘भारत जोडो न्याय यात्रा’ असे करण्यात आले आहे. पूर्वी या यात्रेला ‘भारत न्याय यात्रा’ असे नाव देण्यात आले होते. यावरून आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहे. या यात्रेपूर्वीच विरोधकांच्या इंडिया आघाडीत बिघाडी होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी काँग्रेससमोर एक मोठी अट ठेवली आहे. 

मणिपूरमधून भारत जोडो न्याय यात्रा सुरू होणार आहे. तब्बल ६,७०० किमी लांब अशी ही पदयात्रा देशातील १५ राज्यांमधून जाईल. काँग्रेसने सर्व मित्रपक्षांना या यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या यात्रेत उत्तर प्रदेशमधील काँग्रेसचा मित्रपक्ष आणि इंडिया आघाडीमधील सदस्य समाजवादी पार्टी सहभागी होणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. जागावाटपावरून सपा आणि काँग्रेसमध्ये काही कुरबुरी सुरू असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. यासंदर्भात अखिलेश यादव यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. 

...तर खूप भक्कमपणे सगळे लढू शकतील

सध्या तरी ही यात्रा केवळ काँग्रेसची आहे. आम्हाला अपेक्षा आहे की इंडिया आघाडीत जितके विरोधी पक्ष आहेत, जसे की पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार तसेच लालू प्रसाद यादव आणि इतर सगळेच पक्ष जे काँग्रेसशी युती करून भाजपाविरोधात लढणार आहेत, त्यांची अशी इच्छा आहे की, या यात्रेपूर्वी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटप पूर्ण व्हावे. आधी जागावाटप, त्यानंतर यात्रा आणि मग निवडणूक असा क्रम असेल तर खूप भक्कमपणे सगळेचजण लढू शकतील, असे मत अखिलेश यादव यांनी व्यक्त केले. 

दरम्यान, राहुल गांधींची ही यात्रा होत आहे, ही चांगली गोष्ट आहे. परंतु, सगळ्या पक्षांना असे वाटते की या यात्रेआधी जागावाटप झाले पाहिजे. जागावाटप झाले तर यात्रेत अनेक लोक स्वतःहून मदतीसाठी येतील. निवडणूक लढणार आहे, तो प्रत्येक उमेदवार जगबाबदारीने तिथे उभा असेल, यात्रेत सहभागी होईल, असे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.

 

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राAkhilesh Yadavअखिलेश यादव