शहरं
Join us  
Trending Stories
1
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
3
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
4
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
5
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
6
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
7
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
8
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
9
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
10
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
11
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
12
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
13
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
14
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
15
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
16
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
17
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
18
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
19
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
20
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...

“भारत जोडो न्याय यात्रा काँग्रेसची, आम्हाला अपेक्षा आहे की...”; अखिलेश यादव यांची मोठी अट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 10:54 IST

Akhilesh Yadav On Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra: राहुल गांधींची ही यात्रा होत आहे, ही चांगली गोष्ट आहे, असे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.

Akhilesh Yadav On Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra: राहुल गांधी यांच्या १४ जानेवारीपासून सुरू होणार असलेल्या यात्रेचे नाव बदलून ‘भारत जोडो न्याय यात्रा’ असे करण्यात आले आहे. पूर्वी या यात्रेला ‘भारत न्याय यात्रा’ असे नाव देण्यात आले होते. यावरून आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहे. या यात्रेपूर्वीच विरोधकांच्या इंडिया आघाडीत बिघाडी होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी काँग्रेससमोर एक मोठी अट ठेवली आहे. 

मणिपूरमधून भारत जोडो न्याय यात्रा सुरू होणार आहे. तब्बल ६,७०० किमी लांब अशी ही पदयात्रा देशातील १५ राज्यांमधून जाईल. काँग्रेसने सर्व मित्रपक्षांना या यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या यात्रेत उत्तर प्रदेशमधील काँग्रेसचा मित्रपक्ष आणि इंडिया आघाडीमधील सदस्य समाजवादी पार्टी सहभागी होणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. जागावाटपावरून सपा आणि काँग्रेसमध्ये काही कुरबुरी सुरू असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. यासंदर्भात अखिलेश यादव यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. 

...तर खूप भक्कमपणे सगळे लढू शकतील

सध्या तरी ही यात्रा केवळ काँग्रेसची आहे. आम्हाला अपेक्षा आहे की इंडिया आघाडीत जितके विरोधी पक्ष आहेत, जसे की पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार तसेच लालू प्रसाद यादव आणि इतर सगळेच पक्ष जे काँग्रेसशी युती करून भाजपाविरोधात लढणार आहेत, त्यांची अशी इच्छा आहे की, या यात्रेपूर्वी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटप पूर्ण व्हावे. आधी जागावाटप, त्यानंतर यात्रा आणि मग निवडणूक असा क्रम असेल तर खूप भक्कमपणे सगळेचजण लढू शकतील, असे मत अखिलेश यादव यांनी व्यक्त केले. 

दरम्यान, राहुल गांधींची ही यात्रा होत आहे, ही चांगली गोष्ट आहे. परंतु, सगळ्या पक्षांना असे वाटते की या यात्रेआधी जागावाटप झाले पाहिजे. जागावाटप झाले तर यात्रेत अनेक लोक स्वतःहून मदतीसाठी येतील. निवडणूक लढणार आहे, तो प्रत्येक उमेदवार जगबाबदारीने तिथे उभा असेल, यात्रेत सहभागी होईल, असे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.

 

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राAkhilesh Yadavअखिलेश यादव