शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

'समाजवादी पार्टी गद्दार, पराभवानंतर अखिलेशने एकदाही फोन केला नाही' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 08:08 IST

लोकसभा निवडणुकीत सपाच्या नेत्यांनी बसपा उमेदवारांविरोधात काम केलं. याबाबत अखिलेश यादव यांच्याकडे अनेकदा तक्रारी केल्या. मात्र अखिलेशने या नेत्यांवर कारवाई केली नाही.

लखनऊ - लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने उत्तर प्रदेशातील सपा-बसपा आघाडीचं समीकरण आता बिघडू लागलं आहे. उत्तर प्रदेशच्या राजधानी लखनऊमध्ये रविवारी मायावतींच्या उपस्थितीत बसपा पक्षाची बैठक झाली. या बैठकीत पक्षांतर्गत अनेक फेरबदल करण्यात आले. मायावती यांनी भाऊ आनंद कुमार यांच्याकडे पुन्हा एकदा पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. तर पुतण्या आकाश आनंदला राष्ट्रीय समन्वयक बनवले आहे.

या बैठकीत मायावती यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर जोरदार हल्ला केला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीत मायावती 25 मिनिटे बोलल्या. यात मायावती म्हणाल्या की, समाजवादी पक्षाचे काही जण सांगतात, आमच्यामुळे बसपाने 10 जागा जिंकल्या त्यांनी पहिलं स्वत:कडे बघावं. बसपाने साथ दिली म्हणून समाजवादी पक्षाला 5 जागा तरी जिंकता आल्या. पोटनिवडणुकीत आम्हाला हेच दाखवून द्यायचं आहे की जो विजय झाला तो आमच्या बळावर झाला आहे. ज्याचं श्रेय समाजवादी पक्षाचे लोक घेत आहेत. 

समाजवादी पक्षाच्या लोकांनी गद्दारी केली. अनेक जागांवर बसपाच्या उमेदवारांना हरविण्याचं काम समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी केलं. धार्मिक विभाजनामुळे समाजवादी पार्टी घाबरली होती त्यामुळे निवडणुकीत उघडपणे मुद्दे मांडण्यासाठी ते कमी पडले. माझ्यावर जेवढ्या केसेस आहेत त्या प्रकरणांमध्ये समाजवादी पक्षाच्या नेत्यांचा हात आहे अशी आठवणही मायावती यांनी करुन दिली. 

घराणेशाहीला विरोध करणाऱ्या मायावतींकडून कुटुंबियांना महत्त्वाची पदे

लोकसभा निवडणुकीत सपाच्या नेत्यांनी बसपा उमेदवारांविरोधात काम केलं. याबाबत अखिलेश यादव यांच्याकडे अनेकदा तक्रारी केल्या. मात्र अखिलेशने या नेत्यांवर कारवाई केली नाही. पराभवानंतरही अखिलेश यादवकडून एकदाही संपर्क करण्यात आला नाही. सपाच्या नेत्यांनी कोणकोणत्या ठिकाणी बसपाला मदत केली नाही याची माहिती मला त्यांना द्यायची होती. इतकचं नाही तर एकदा अखिलेशने आपल्याला मॅसेज करत मुस्लीम लोकांना जास्त तिकीट देऊ नका त्याने धार्मिक विभाजन होईल असं सांगितले पण मी त्यांचे म्हणणं ऐकलं नाही असा आरोप मायावती यांच्याकडून करण्यात आला आहे.  

टॅग्स :mayawatiमायावतीAkhilesh Yadavअखिलेश यादव