शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
4
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
5
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
6
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
7
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
8
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
9
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
10
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
11
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
12
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
13
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
14
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
15
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
16
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
17
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
18
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
19
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
20
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...

विधानसभा असो वा लोकसभा, निवडणूक आयोगच भाजपाला जिंकून देतंय प्रत्येक निवडणूक- अखिलेश यादव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 18:55 IST

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाला पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर पक्षानं अजूनही निवडणूक निकालावर बैठक घेतलेली नाही.

लखनौ-

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाला पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर पक्षानं अजूनही निवडणूक निकालावर बैठक घेतलेली नाही. निवडणूक निकालात आपलाच विजय होईल असा विश्वास अखिलेश यादव यांना होता. तसं ते ठामपणे आपल्या कार्यकर्त्यांनाही सांगत होते. त्यांनीच आता पराभवासाठी निवडणूक आयोगाला जबाबदार धरण्यास सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशातील निवडणूक निकालाला निवडणूक आयोग जबाबदार असल्याचं विधान त्यांनी केलं आहे. त्यांनी यावेळी पहिल्यांदात एका मुलाखतीत आझमगढ आणि रामपूर लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवावरही प्रतिक्रिया दिली. 

अखिलेश यादव यांनी निवडणूक आयोगासोबतच भाजपाला बेईमान ठरवलं आहे. अखिलेश यादव सध्या २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीसाठी तयारी करत आहेत आणि अशात त्यांनी भाजपाच्या विजयामागे कसं सरकारी यंत्रणांचा हात आहे हे कार्यकर्त्यांना पटवून देण्यास सुरुवात केली आहे. पक्षात भाजपाविरोधी वातावरण धगधगतं राहील याची ते काळजी घेत आहेत. विधानसभा निवडणूक असो की लोकसभेची दोन जागांची पोटनिवडणूक समाजवादी पक्षाच्या पराभवाचे कारण निवडणूक आयोग आहे. भाजपच्या बेईमानीमुळे पराभव झाला. आयोगाने प्रामाणिकपणे काम केले असते तर निकाल वेगळे दिसले असते, असा दावा अखिलेश यादव यांनी केला आहे.

संस्थांच्या निष्पक्षपातीपणावर व्यक्त केला संशयसपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी लोकशाही वाचवण्याचं आवाहन करत राज्यातील मागील विधानसभा निवडणूक लढवली होती. "आता देशातील कोणतीही संस्था तटस्थ राहिलेली नाही. सरकारकडून दबाव आणून या संस्थांकडून अपेक्षित काम करून घेतले जाते. निवडणूक आयोगाने निवडणुकीत प्रामाणिकपणे काम केले नाही. मतदार यादीतून मोठ्या प्रमाणात नावे वगळण्यात आली", असा आरोप अखिलेश यादव यांनी केला आहे. रामपूर लोकसभा पोटनिवडणुकीत सपा कार्यकर्त्यांना मतदान करू दिले नाही. आझमगढमध्ये सपा कार्यकर्त्यांविरोधात रेड कार्ड जारी करण्यात आले. निवडणूक आयोग झोपलं होतं का? त्यांनी आमच्या तक्रारींची दखल घेतली नाही, असंही अखिलेश यादव म्हणाले. 

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगBJPभाजपा