शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
6
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
7
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
8
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
9
हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शकाचं निधन; ४२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
12
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
13
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
14
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
15
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
16
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
17
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
19
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
20
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा असो वा लोकसभा, निवडणूक आयोगच भाजपाला जिंकून देतंय प्रत्येक निवडणूक- अखिलेश यादव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 18:55 IST

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाला पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर पक्षानं अजूनही निवडणूक निकालावर बैठक घेतलेली नाही.

लखनौ-

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाला पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर पक्षानं अजूनही निवडणूक निकालावर बैठक घेतलेली नाही. निवडणूक निकालात आपलाच विजय होईल असा विश्वास अखिलेश यादव यांना होता. तसं ते ठामपणे आपल्या कार्यकर्त्यांनाही सांगत होते. त्यांनीच आता पराभवासाठी निवडणूक आयोगाला जबाबदार धरण्यास सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशातील निवडणूक निकालाला निवडणूक आयोग जबाबदार असल्याचं विधान त्यांनी केलं आहे. त्यांनी यावेळी पहिल्यांदात एका मुलाखतीत आझमगढ आणि रामपूर लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवावरही प्रतिक्रिया दिली. 

अखिलेश यादव यांनी निवडणूक आयोगासोबतच भाजपाला बेईमान ठरवलं आहे. अखिलेश यादव सध्या २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीसाठी तयारी करत आहेत आणि अशात त्यांनी भाजपाच्या विजयामागे कसं सरकारी यंत्रणांचा हात आहे हे कार्यकर्त्यांना पटवून देण्यास सुरुवात केली आहे. पक्षात भाजपाविरोधी वातावरण धगधगतं राहील याची ते काळजी घेत आहेत. विधानसभा निवडणूक असो की लोकसभेची दोन जागांची पोटनिवडणूक समाजवादी पक्षाच्या पराभवाचे कारण निवडणूक आयोग आहे. भाजपच्या बेईमानीमुळे पराभव झाला. आयोगाने प्रामाणिकपणे काम केले असते तर निकाल वेगळे दिसले असते, असा दावा अखिलेश यादव यांनी केला आहे.

संस्थांच्या निष्पक्षपातीपणावर व्यक्त केला संशयसपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी लोकशाही वाचवण्याचं आवाहन करत राज्यातील मागील विधानसभा निवडणूक लढवली होती. "आता देशातील कोणतीही संस्था तटस्थ राहिलेली नाही. सरकारकडून दबाव आणून या संस्थांकडून अपेक्षित काम करून घेतले जाते. निवडणूक आयोगाने निवडणुकीत प्रामाणिकपणे काम केले नाही. मतदार यादीतून मोठ्या प्रमाणात नावे वगळण्यात आली", असा आरोप अखिलेश यादव यांनी केला आहे. रामपूर लोकसभा पोटनिवडणुकीत सपा कार्यकर्त्यांना मतदान करू दिले नाही. आझमगढमध्ये सपा कार्यकर्त्यांविरोधात रेड कार्ड जारी करण्यात आले. निवडणूक आयोग झोपलं होतं का? त्यांनी आमच्या तक्रारींची दखल घेतली नाही, असंही अखिलेश यादव म्हणाले. 

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगBJPभाजपा