शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

विधानसभा असो वा लोकसभा, निवडणूक आयोगच भाजपाला जिंकून देतंय प्रत्येक निवडणूक- अखिलेश यादव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 18:55 IST

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाला पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर पक्षानं अजूनही निवडणूक निकालावर बैठक घेतलेली नाही.

लखनौ-

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाला पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर पक्षानं अजूनही निवडणूक निकालावर बैठक घेतलेली नाही. निवडणूक निकालात आपलाच विजय होईल असा विश्वास अखिलेश यादव यांना होता. तसं ते ठामपणे आपल्या कार्यकर्त्यांनाही सांगत होते. त्यांनीच आता पराभवासाठी निवडणूक आयोगाला जबाबदार धरण्यास सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशातील निवडणूक निकालाला निवडणूक आयोग जबाबदार असल्याचं विधान त्यांनी केलं आहे. त्यांनी यावेळी पहिल्यांदात एका मुलाखतीत आझमगढ आणि रामपूर लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवावरही प्रतिक्रिया दिली. 

अखिलेश यादव यांनी निवडणूक आयोगासोबतच भाजपाला बेईमान ठरवलं आहे. अखिलेश यादव सध्या २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीसाठी तयारी करत आहेत आणि अशात त्यांनी भाजपाच्या विजयामागे कसं सरकारी यंत्रणांचा हात आहे हे कार्यकर्त्यांना पटवून देण्यास सुरुवात केली आहे. पक्षात भाजपाविरोधी वातावरण धगधगतं राहील याची ते काळजी घेत आहेत. विधानसभा निवडणूक असो की लोकसभेची दोन जागांची पोटनिवडणूक समाजवादी पक्षाच्या पराभवाचे कारण निवडणूक आयोग आहे. भाजपच्या बेईमानीमुळे पराभव झाला. आयोगाने प्रामाणिकपणे काम केले असते तर निकाल वेगळे दिसले असते, असा दावा अखिलेश यादव यांनी केला आहे.

संस्थांच्या निष्पक्षपातीपणावर व्यक्त केला संशयसपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी लोकशाही वाचवण्याचं आवाहन करत राज्यातील मागील विधानसभा निवडणूक लढवली होती. "आता देशातील कोणतीही संस्था तटस्थ राहिलेली नाही. सरकारकडून दबाव आणून या संस्थांकडून अपेक्षित काम करून घेतले जाते. निवडणूक आयोगाने निवडणुकीत प्रामाणिकपणे काम केले नाही. मतदार यादीतून मोठ्या प्रमाणात नावे वगळण्यात आली", असा आरोप अखिलेश यादव यांनी केला आहे. रामपूर लोकसभा पोटनिवडणुकीत सपा कार्यकर्त्यांना मतदान करू दिले नाही. आझमगढमध्ये सपा कार्यकर्त्यांविरोधात रेड कार्ड जारी करण्यात आले. निवडणूक आयोग झोपलं होतं का? त्यांनी आमच्या तक्रारींची दखल घेतली नाही, असंही अखिलेश यादव म्हणाले. 

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगBJPभाजपा