शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अखिलेश यांना फटकारे!

By admin | Updated: October 25, 2016 05:09 IST

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे त्यांचे वडील मुलायमसिंग आणि काका शिवपाल यादव यांच्याशी पूर्णपणे संबंध बिघडले असून, त्यांच्यातील संघर्षामुळे राज्यात राष्ट्रपती

- मीना कमल, लखनौ

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे त्यांचे वडील मुलायमसिंग आणि काका शिवपाल यादव यांच्याशी पूर्णपणे संबंध बिघडले असून, त्यांच्यातील संघर्षामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास कोणाला आश्चर्य वाटणार नाही. समाजवादी पक्षाच्या बैठकीत मुलायमसिंग यांनी सोमवारी अखिलेश यांच्यावर तोफा डागल्या आणि ते बोलत असताना अखिलेश यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. या प्रकारातून मुलगा व वडिल यांचे संबंध बिघडल्याचे स्पष्ट झाले असले तरी मुलायमसिंग यांनी अद्याप तरी त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला सांगितलेले नाही.या संघर्षानंतर पंतप्रधान कार्यालयाच्या सूचनेनुसार राज्यपाल राम नाईक यांनी आपला प्राथमिक अहवाल केंद्राला पाठवला आहे. समाजवादी पक्षातील संघर्षामुळे आतापर्यंत तरी घटनात्मक पेच निर्माण झालेला नसला तरी ज्या पद्धतीने लखनौच्या रस्त्यावर अखिलेश आणि शिवपाल यादव यांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झाली आणि बैठकीत शिवपाल यांनी मुख्यमंत्र्यांवर ज्या प्रकारे हल्ला चढवला, ते पाहता राज्यात कदाचित लवकरच घटनात्मक पेच निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. घडणाऱ्या घटनांबाबत राज्यपाल सध्या नियमितपणे कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेत आहेत.मुलायमसिंग यांनी सांगितल्यास आपण राजीनामा द्यायला तयार आहोत, असे सांगितले असले तरी ज्या पद्धतीने ते शिवपालसमर्थकांना हाकलत चालले आहेत, ते पाहता ते आपले वडिल व काका यांच्याशी कोणताही समझोता करायला तयार नाहीत, असे सांगण्यात येत. अखिलेश हे वेगळा पक्ष काढायला निघाले होते, असा थेट आरोप शिवपाल यांनी त्यांच्यासमोर बैठकीत केला. तुम्ही जन्मलात, तेव्हापासून मी पक्षाचे काम करीत आहे, असे सांगून, मला राजकारण शिकवू नका, असेच शिवपाल यांनी बैठकीत सुनावले. बैठकीनंतर लगेचच त्यांनी अखिलेशसमर्थक पदाधिकाऱ्यांना संघटनेतून हाकलले. त्यामुळे अखिलेश यांना एकटे पाडण्याचा प्रयत्न शिवपाल सरळसरळ करीत असून, त्यांना मुलायमसिंग यांचा पूर्ण पाठिंबा आहे, हेच स्पष्ट होते.त्या बैठकीत मुलायमसिंग यांनीही अखिलेश यांचे थेट कानच उपटले. ज्या शिवपाल आणि अमरसिंग यांच्यावर तुम्ही टीका करीत आहात, त्यांनीच पक्ष वाढवला आहे आणि ते असल्यामुळेच ती तुरुंगात जाण्यापासून वाचलो, असे त्यांनी बोलून दाखवले. त्यांच्या भाषणाच्या वेळी अखिलेशसमर्थकांनी घोषणाबाजी सुरू करताच, अशा मंडळींना पक्षाबाहेर काढले जाईल, असे सांगत, त्यांनी समर्थकांनाच नव्हे, तर अखिलेश यांनाही आजही पक्षात मी सांगेन, तसेच घडेल, असे ऐकवले. आजही तरुणवर्ग माझ्याबरोबर आहे, असे अखिलेश यांना सांगून तुम्ही सर्वेसर्वा नाही आहात, असे स्पष्ट केले. अखिलेश यादव अखेर वठणीवर वडील आणि काका यांनी फटकारल्यानंतर अखिलेश हडबडून गेले आहेत. रात्री उशीरा ते काका शिवपाल यादव यांच्याकडे गेले आणि त्यांच्यासह एका कारने नेताजी मुलायमसिंह यांना भेटण्यास गेले.या बैठकीत दोघांनी अखिलेश यांना ‘नीट वागा’ असा इशारेवजा सल्ला दिला. तसेच ३ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या अखिलेश यांच्या यात्रेविषयी अनेक सूचना केल्या. हे सारे पाहता अखिलेश वठणीवर आल्याचे तसेच बंडखोरीच्या भूमिकेतून बाहेर पडल्याचे सांगण्यात आले.भाजपाला हवी राष्ट्रपती राजवटराष्ट्रपती राजवटीमध्ये जर उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका झाल्या तर आपल्याला त्याचा लाभ होईल असे सध्या भाजपला वाटते आहे. राष्ट्रपती राजवटीत सरकारी यंत्रणेचा कल समाजवादी पक्षाकडे असणार नाही.मुलायमसिंह यांनी अखिलेशना मुख्यमंत्रीपदावरून दूर केल्यास, ते विधानसभा बरखास्त करण्याचे पाऊल उचलू शकतील. तसे झाल्यास ते पदावर राहू शकतील. मुलायमसिंह वा अखिलेशकडून राजकीय संकटासंदर्भात राज्यपालांना पत्र पाठविले गेले तर चेंडू सरळच राज्यपालांकडे जाईल व राष्ट्रपती राजवट लावणे सोपे होईल. अखिलेशना दूर करून दुसऱ्या कोणाला मुख्यमंत्रीपदाची शपथ द्यावी, असे पत्र मुलायमसिंह यांनी पाठविल्यास आणि अखिलेशनी स्वत: राजीनामा न दिल्यास राज्यपाल अखिलेशंना बहुमत सिद्ध करण्याची संधी देऊ शकतील. पण अखिलेशनी विधानसभा बरखास्तीची करण्याची शिफारस केली आणि सरकार अल्पमतात आले आहे अशी राज्यपालांना खात्री झाल्यास राष्ट्रपती राजवटीचा मार्ग मोकळा होईल.शह-काटशहचे राजकारण रंगलेएवढे झाल्यावर अखिलेश गप्प बसतील, यावर कोणाचाही विश्वास नाही. दुसरीकडे त्यांनी मुलायमसिंग वा शिवपाल यांना शह देण्याचा प्रयत्न केल्यास, तितक्यास जोरकसपणे त्यांना काटशह दिला जाईल, हे उघड आहे. अशा शह-काटशहाच्या राजकारणातच राज्यात घटनात्मक पेचप्रसंग निर्माण होईल आणि त्यामुळे विधानसभा निवडणुकांच्या आधीच राष्ट्रपती राजवट लागू होईल, अशी अटकळ आहे.