शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

PM नरेंद्र मोदींसमोर 'जय जय महाराष्ट्र माझा' गीत गाणारी ही काश्मीरी तरूणी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 12:50 IST

बालपणापासून गाण्याचा छंद लाभलेल्या शमीमाच्या गायनाचा सूर आई आणि शिक्षकांच्या पाठिंब्याने आणखी बहरत गेला.  

नवी दिल्ली - देशाच्या राजधानी दिल्लीत ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवारांनी पंतप्रधानांचं स्वागत केले. मराठी साहित्य संमेलनानिमित्त राजधानीत मराठीचा डंका वाजत आहे. शुक्रवारी सकाळी भव्य ग्रंथदिंडी काढण्यात आली त्यावेळी महाराष्ट्रासह जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेले साहित्यिक आणि रसिक उत्साहाने सहभागी झाले. याच कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर काश्मीरी तरूणीने जय जय महाराष्ट्र माझा हे गीत गायलं. 

कोण आहे काश्मीरी तरूणी?

सरहद संस्थेच्या माध्यमातून दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात काश्मीरच्या बांदिपुरा भागातील तरूणी शमीमा अख्तर हिने जय जय महाराष्ट्र माझा हे गीत गायलं. या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याआधीही या तरूणीने गायलेले लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी हे गाणे चांगलेच चर्चेत आले होते. शमीमा अख्तर पहिल्यांदाच समोर आली आहे असं नाही तर विठ्ठलभक्तीची गाणी, अभंग हेदेखील ती तिच्या सुरेल आवाजात गात असते. 

शमीमा अख्तर ही मूळची काश्मीरची, काश्मीरच्या बांदिपुरा भागात ती लहानाची मोठी झाली. तिचं बालपण हे दहशतीच्या सावटाखालीच गेले. एका दहशतवादी हल्ल्यात तिच्या आईला गोळी लागली. लहान असलेल्या शमीमाला आपल्या आजूबाजूला काय घडतंय याची पुसटची कल्पनाही नव्हती. याच दहशतीत ती लहानाची मोठी झाली. आता हीच शमीमा धर्म, जात, पंत या पलीकडे जात आपल्या आवाजाने शांततेचा आणि एकतेचा संदेश देते. 

शमीमाला घरातूनच संगीताचा वारसा लाभला. तिचे आजोबा प्रसिद्ध कव्वाली गायक होते. त्यामुळे संगीताचे सूर सतत तिच्या कानावर यायचे. आजोबाची कव्वाली ऐकत ती मोठी झाली. बालपणापासून गाण्याचा छंद लाभलेल्या शमीमाच्या गायनाचा सूर आई आणि शिक्षकांच्या पाठिंब्याने आणखी बहरत गेला.   त्यानंतर लखनौ विद्यापीठातून तिने संगीतात पदवीही घेतली. कालांतराने शमीमा पुण्यात आली आणि तिथेच तिने मराठी गाणी आत्मसात करण्यास सुरुवात केली. वारीच्या काळात संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या पुण्यात असताना शमीमानं गायलेली मराठी गाणी कानावर पडली. तिने गायलेली विठ्ठलाची गाणी, अभंग याचे सूर लोकांना आवडले. काश्मीरच्या बांदिपुरा जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावातली ही मुलगी. आई, वडील आणि पाच बहिणी हे तिचं कुटुंब. काश्मीरी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची कवाडे खुली करणारे सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार यांनी तिला पुण्यात आणले. तिच्या मधुर आवाजातून सर्वप्रथम सूर गुंजले ते ‘पसायदाना’चे! आता याच तरूणीने मराठी साहित्य संमेलनात जय जय महाराष्ट्र माझा हे गीत गायले. 

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनNarendra Modiनरेंद्र मोदीSarhadसरहद संस्था