शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

अकबरुद्दीन ओवेसी पुन्हा बरळले, 15 मिनिटांच्या 'त्या' वक्तव्याचा पुनरुच्चार करत आव्हान दिले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 15:05 IST

वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा आक्षेपार्ह वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडले आहे.

हैदराबाद - वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा आक्षेपार्ह वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. 'मी केलेले '15 मिनिटांचे'  वक्तव्य अनेकांच्या जिव्हारी लागले होते. ज्याचे घाव अजूनही भरलेले नाहीत. त्यामुळेच या अकबरुद्दीन ओवेसीचा एवढा द्वेश केला जातो,' असे वक्तव्य अकबरुद्दीन ओवेसी यांनी केले आहे. अकबरुद्दीन ओवेसी यांनी 2013 मध्ये '' आम्ही 25 कोटी आहोत आणि तुम्ही हिंदू 100 कोटी आहात. 15 मिनिटांसाठी पोलिसांना हटवा. मग कोणामध्ये किती दम आहे हे दिसेल,'' असे वक्तव केले होते. त्यावेळी या वक्तव्यावरून खूप वाद झाला होता. दरम्यान,   आजारपणातून सावरल्यानंतर ओवेसी यांनी करीमनगर येथे एका सभेला संबोधित केले.यावेळी ओवेसी म्हणाले की, 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघवाले आमच्या केसालाही धक्का लावू शकत नाहीत. हे जग त्याच व्यक्तीला घाबरवते जो घाबरतो. मात्र जग त्या व्यक्तीला घाबरते जो घाबरवणे जाणतो. मी केलेले '15 मिनिटांचे' वक्तव्य अनेकांच्या वर्मी लागले होते. त्याचे भाव अजून भरू शकलेले नाहीत. त्यामुळेच या अकबरुद्दीन ओवेसीचा एवढा द्वेश केला जातो.'' 

'मुसलमानांनी वाघासारखे शूर व्हावे जेणेकरून कुठलाही चायवाला त्यांच्यासमोर उभा राहू शकणार नाही. मॉब लिंचिंग होत आहे असे लोक म्हणताहेत. मात्र मी आपल्या लोकांना सांगू इच्छितो की एवढे त्रस्त होऊ नका. तरुणांना सांगेन की आम्ही येथे जे काही करतो त्याच्या बदल्यात आपल्याला जन्नत किंवा जहन्नूम मिळते. मात्र शहीद जन्नतींच्या जन्नतीमध्ये जातात. त्यामुळे तरुणांनो तुमच्यासमोर कुठलीही घोषणाबाजी झाली तरी तुम्ही केवळ अल्लाचे नाव घ्या,' असे आवाहन ओवेसी यांनी केले.  

टॅग्स :PoliticsराजकारणAll India Majlis-e-Ittehadul Muslimeenआॅल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन