शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

पीपीई किटचे बंधन विमान प्रवाशांना आवडणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 05:09 IST

एअर इंडियाचे माजी संचालक जितेंद्र भार्गव यांचे मत

नवी दिल्ली : कोरोना साथीच्या काळात विमानामध्ये एका रांगेतील तीन आसनांपैकी मधले आसन फिजिकल डिस्टन्सिंग राखण्यासाठी रिकामे ठेवण्याचा प्रस्ताव बहुतांश विमान कंपन्यांना मान्य नाही. ही आसने रिकामी न ठेवण्यासाठी प्रवाशांनी रोगप्रतिबंधक पोशाख (पीपीई) घालावेत असा प्रस्ताव आहे. मात्र हे बंधन प्रवाशांना आवडणार नाही, असे मत एअर इंडियाचे माजी संचालक जितेंद्र भार्गव यांनी व्यक्त केले आहे.

जितेंद्र भार्गव म्हणाले की, विमानात एकाच रांगेत तीन आसनांपैकी मधले आसन रिकामे ठेवायचे नसेल तर प्रवाशांनी पीपीई परिधान करायला हवा असे नागरी हवाई वाहतूक संचालकांनी म्हटले आहे. मात्र अशा पोशाख घालण्यास प्रवासी राजी होतील का याबाबत शंका आहे. त्यामुळे मधल्या आसनाच्या बुकिंगवरून भविष्यात मोठे प्रश्न निर्माण होऊ शकतात व विमान कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसानीला सामोरे जावे लागू शकते.त्यामुळे मधल्या आसनावर बसणाऱ्या प्रवाशाला तिकीट दरात सवलत देऊन त्याला संतुष्ट करण्याचा प्रयत्न विमान कंपन्यांना करावा लागेल, असे बोलले जात आहे.लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातही आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत सेवा सुरू होणार नाही, असे सांगितले जात होते. पण विमान कंपन्यांचा सरकारवर मोठा दबाव आहे. त्यामुळे चौथा टप्पा जाहीर केल्यानंतर चारच दिवसांत देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्यात येईल, अशी घोषणा सरकारला करावी लागली.===' विमानात संसर्ग नाही 'विमानातून प्रवास करताना कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता नाही असा दावा इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनने केला आहे. विमानात सर्व प्रवासी एका दिशेत बसतात. त्यांच्या तोंडावर मास्क असतो. आसनाच्या मागची उंच बाजू ही एखाद्या अवरोधासारखे काम करते. विमानातील एसी यंत्रणेत हवा वरच्या बाजूने येते व ती परत खालून विमानाबाहेर जाते. वातावरणातून दर दोन मिनिटाला हवा घेतली जाते, ती शुद्ध करून मग केबिनमध्ये सोडली जाते. या हवेचे पुर्नअभिसरण करण्यात येत नाही. त्यामुळे विमानात कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यताच नाही असा विमान कंपन्यांचा दावा आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAir Indiaएअर इंडिया