शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

एअरसेलच्या 5000 कर्मचाऱ्यांना निरोपाचा नारळ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2018 12:38 IST

आघाडीच्या कंपन्यांमधील स्पर्धा तीव्र झाल्यामुळे बाजारावर मोठा आर्थिक ताण निर्माण झाला आहे.

नवी दिल्ली: भारतातील सर्वात लहान आकाराची टेलिकॉम कंपनी म्हणून ओळखली जाणाऱ्या एअरसेलला घरघर लागली आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीकडून लवकरच 5000 कर्मचाऱ्यांची कपात केली जाण्याची शक्यता आहे. कठीण परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार राहा, असे सांगत कंपनीने कर्मचाऱ्यांना या सगळ्याची आधीच कल्पना दिली आहे. गेल्या काही काळापासून टेलिकॉम क्षेत्रात निर्माण झालेल्या तीव्र स्पर्धेमुळे एअरसेलवर ही वेळ ओढावल्याचे बोलले जाते.याविषयी बोलताना एअरसेलचे सीईओ कैझाद हिरजी यांनी सांगितले की, आमच्याकडे बऱ्याच काळापासून निधीची चणचण आहे. त्यामुळे कंपनीचे व्यवहार चालवण्यासाठी आम्ही दैनंदिन व्यवसायातून मिळणाऱ्या उत्त्पन्नावरच अवलंबून आहोत. गेल्या काही काळापासून या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमधील स्पर्धा तीव्र झाल्यामुळे बाजारावर मोठा आर्थिक ताण निर्माण झाला आहे. आम्हालाही त्याचा मोठा फटका बसला आहे. आगामी काळात ही परिस्थिती आणखी बिघडू शकते. या पार्श्वभूमीवर कंपनीच्या संचालक मंडळातही मोठे बदल झाले आहेत. या नव्या संचालकांकडून कंपनीला वाचवण्यासाठी नवी धोरणे निश्चित केली जाण्याची शक्यता आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, एअरसेलने काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे दिवाळखोरीचा अर्ज दाखल केला होता. तेव्हापासून एअरसेल इतिहासजमा होणार असल्याची चर्चा सुरू आहे. आर्थिक चणचणीमुळेच आमचे नेटवर्क आणि प्रणाली कालबाह्य ठरू लागल्याचेही कैझाद हिरजी यांनी सांगितले. रिलायन्स जिओने बाजारपेठेत प्रवेश करण्यापूर्वी जुलै 2016 या तिमाहीत एअरसेलचा चालू नफा 120 कोटी इतका होता. जुलै 2017 च्या तिमाहीपर्यंत तो 5 कोटींपर्यंत खाली घसरला. त्यानंतरच्या तिमाहीत तर कंपनीला 120 कोटींचा तोटा झाला. या आर्थिक चणचणीमुळे एअरसेलकडून अनेक देणी थकली आहेत. त्यामुळे टॉवर्स व्हेंडर्सनी एअरसेलच्या अनेक सेंटर्सना सेवा पुरवणे बंद केले आहे. याशिवाय, एअरसेलने घेतलेले कर्ज बुडीत खात्यांमध्ये जमा झाल्यामुळे अनेक बँकांकडून कंपनीची खाती गोठवण्यात आली आहेत. या कर्जांचे हप्ते पुन्हा बांधून द्यायलाही बँकानी नकार दिला आहे. परिणामी सध्याच्या घडीला एअरसेलच्या डोक्यावर 15,500 कोटीच्या कर्जाचा डोंगर आहे. त्यामुळेच कंपनीकडून ही कर्मचारी कपात होणार आहे.

टॅग्स :Mobileमोबाइल