शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
4
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
5
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
6
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
7
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
8
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
9
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
10
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...
11
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
12
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
13
"ओए होए छोटा छावा...", विकी कौशल-कतरिना कैफच्या पोस्टवर संतोष जुवेकरची कमेंट
14
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
15
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
16
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
17
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
18
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
19
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
20
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 

विमान तिकिटाची भरपाई मिळणार, कॅन्सलेशन चार्जेसही नाहीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 00:09 IST

प्रवाशांच्या सोयीची बातमी; विमानप्रवासासाठी सरकार आणणार नवी नियमावली, कंपन्यांच्या चुकांमुळे सोसावा लागणारा मोठा भुर्दंड वाचणार

नवी दिल्ली : विमान कंपन्यांच्या चुकीच्या नियोजनामुळे विमान उड्डाणाला खूपच विलंब झाला आणि त्या स्थितीत एखाद्या प्रवाशाने आपले तिकीट रद्द केल्यास त्याला संपूर्ण रक्कम परत करणे यापुढे विमान कंपन्यांवर बंधनकारक असेल. तशी तरतूद करण्याचे केंद्र सरकारने ठरवले आहे. नागरी विमान वाहतूक खात्याने विमान प्रवासासंदर्भात काही नव्या नियमांचा आराखडा तयार केला असून त्यावर सर्व संबंधितांची मते मागवली आहेत. येत्या दोन महिन्यांत नवे नियम लागू करण्यात येतील, असे केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांनी सोमवारी सांगितले.दोन महिन्यांत होऊ शकते अंमलबजावणीजयंत सिन्हा म्हणाले की, या मसुद्याबाबत सर्व संबंधितांचे म्हणणे समजून घेतले जाईल. त्यानंतर आवश्यतेनुसार बदल करून हे नियम लागू केले जातील. साधारणपणे दोन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण करून नवीन नियमावली लागू करण्याचा सरकारचा विचार आहे.असे असतील नवीन नियमविमानाचं तिकीट काढल्यापासून २४ तासांच्या रद्द केल्यास तिकिटाच्या रकमेतून त्यासाठी शुल्क (कॅन्सलेशन चार्ज) कापले जाणार नाही. या काळात प्रवासी तिकिटामध्ये अन्य काही बदल करू इच्छित असेल, तर तोही मोफत करून देणे विमान कंपनीवर बंधनकारक असेल. प्रवास सुरू करायच्या चार दिवस आधी म्हणजे ९६ तास आधी तिकीट रद्द केले तरीही प्रवाशांना भुर्दंड सोसावा लागणार नाही, अशा तरतुदी या आराखड्यात आहेत.कंपन्यांच्या मनमानीला बसेल चापमूळ भाडे (बेसिक फेअर) व इंधनाचा दर (फ्युएल चार्जेस) मिळून जी रक्कम होईल, त्याहून कॅन्सलेशन चार्ज अधिक असू नये, अशीही तरतुद त्यात आहे. एका अर्थी या नियमांमुळे विमान कंपन्यांच्या मनमानीला चाप बसू शकेल. हे नियम लागू झाल्यानंतर विमान कंपनीच्या चुकीमुळे विमानाला विलंब झाल्यास, कंपनीने प्रवाशांना नुकसानभरपाई देणे गरजेचे ठरेल.विमान रखडल्यास प्रवाशांच्या राहायची व्यवस्थाही करावी लागेलविमान उड्डाण दुसऱ्या दिवसापर्यंत सुटले नाही वा रखडले, तर प्रवाशांची हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी विमान कंपन्यांची असेल. त्यासाठी प्रवाशांकडून कोणतीही रक्कम आकारता येणार नाही.कनेक्टिंग फ्लाइट चुकल्यास कंपन्या जबाबदारएखाद्या विमानाच्या विलंबामुळे प्रवाशाचे 'कनेक्टिंग फ्लाइट' चुकले तर कंपनीने प्रवाशांना ठराविक रक्कम देणे बंधनकारक असेल. विमानास खूपच बिवलंब होत असल्याने प्रवाशाने तिकीट रद्द केल्यास तिकिटाची पूर्ण रक्कम कंपनीने प्रवाशास द्यावीच लागेल.दिव्यांगांना नीट बसता यावे यासाठी विमानात उत्तम सोय करावी लागेलदिव्यांग प्रवाशांना विमानात नीट बसता यावे, यासाठी जादा लेग स्पेस (समोर अधिक जागा असलेली आसने) असलेल्या सीट्स उपलब्ध करून देणे ही विमान कंपन्यांची जबाबदारी असून, त्यासाठी त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारे जादा आकारणी करता येणार नाही. तसेच पेपरलेस प्रवासासाठी सर्व प्रवाशांना विशिष्ट क्रमांक (युनिक नंबर) देण्याच्या प्रस्तावाचाही आराखड्यात उल्लेख आहे. 

टॅग्स :airplaneविमानAirportविमानतळ