शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

"हल्ल्यांनंतर हवाई दल मृतांची मोजदाद करत नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 06:32 IST

बालाकोटमधील हवाई हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या संख्येबाबत टिप्पणी करण्यास हवाई दलाचे प्रमुख बी. एस. धनोआ यांनी सोमवारी नकार दिला.

कोइम्बतूर : बालाकोटमधील हवाई हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या संख्येबाबत टिप्पणी करण्यास हवाई दलाचे प्रमुख बी. एस. धनोआ यांनी सोमवारी नकार दिला. अशा हवाई हल्ल्यांमध्ये किती जण मृत्युमुखी पडले, याची मोजदाद भारतीय हवाई दल करीत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. राफेल लढाऊ विमान सप्टेंबरपर्यंत भारताच्या शस्त्र भांडारात दाखल होईल, असेही धनोआ म्हणाले.येथे एका पत्रकार परिषदेत धनोआ म्हणाले की, हल्ल्यामध्ये किती दहशतवादी मरण पावले, याची माहिती सरकार देईल. हवाई दलाचे सैनिक केवळ योग्य ठिकाणी निशाणा लागला आहे की नाही? हेच पाहतात. ते हल्ला केल्यानंतर किती जण मरण पावले, हे पाहात थांबत नाहीत. अशा हल्ल्यांमध्ये ते शक्यही नसते. मृतांच्या संख्येबाबत त्यांनी सांगितले की, आमचे जे लक्ष्य होते, तिथे त्या वेळी किती लोक हजर होते, यावर ही संख्या ठरू शकते.भारतीय हवाई दलाने टाकलेले बॉम्ब हे मूळ लक्ष्यापासून दूर पडले, हे खरे आहे का, असे विचारले असता, धनोआ म्हणाले की, भारतीय हवाई दलाने जर बालाकोटच्या जंगलात भलत्याच ठिकाणी बॉॅॅम्ब टाकले असते, तर पाकिस्तानला त्याचे प्रत्युत्तर देण्याची गरज नव्हती.>दहशतवादी तळावरसुरू होते ३०० फोनबालाकोटमध्ये हल्ल्याच्या दिवशी ३०० फोन सुरू होते, अशी माहिती राष्ट्रीय तंत्रज्ञान संशोधन संस्थेकडे होती. बालाकोटमध्ये हल्ला करायची हवाई दलाला परवानगी मिळाल्यानंतर, या संस्थेने दहशतवादी तळावर तांत्रिकदृष्ट्या नजर ठेवणे सुरू केले होते. त्यात ही माहिती मिळाली होती. याचा अर्थ असाही आहे की, हल्ल्यात किमान ३०० दहशतवाद्यांचा खात्मा झाला.>अभिनंदन पुन्हा लढाऊ विमान उडवतील का?विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे भविष्यात पुन्हा लढाऊ विमाने उडवणार का? या प्रश्नावर बी. एस. धनोआ म्हणाले की, जर ते वैद्यकीयदृष्ट्या सक्षम वा योग्य ठरले, तरच तर ते लढाऊ विमानांचे उड्डाण पुन्हा करतील. हवाई दलामध्ये आम्ही पायलटच्या स्वास्थ्याबाबत कोणतीही तडजोड करत नाही.

टॅग्स :B S Dhanoaबी एस धानोआ