शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

"हल्ल्यांनंतर हवाई दल मृतांची मोजदाद करत नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 06:32 IST

बालाकोटमधील हवाई हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या संख्येबाबत टिप्पणी करण्यास हवाई दलाचे प्रमुख बी. एस. धनोआ यांनी सोमवारी नकार दिला.

कोइम्बतूर : बालाकोटमधील हवाई हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या संख्येबाबत टिप्पणी करण्यास हवाई दलाचे प्रमुख बी. एस. धनोआ यांनी सोमवारी नकार दिला. अशा हवाई हल्ल्यांमध्ये किती जण मृत्युमुखी पडले, याची मोजदाद भारतीय हवाई दल करीत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. राफेल लढाऊ विमान सप्टेंबरपर्यंत भारताच्या शस्त्र भांडारात दाखल होईल, असेही धनोआ म्हणाले.येथे एका पत्रकार परिषदेत धनोआ म्हणाले की, हल्ल्यामध्ये किती दहशतवादी मरण पावले, याची माहिती सरकार देईल. हवाई दलाचे सैनिक केवळ योग्य ठिकाणी निशाणा लागला आहे की नाही? हेच पाहतात. ते हल्ला केल्यानंतर किती जण मरण पावले, हे पाहात थांबत नाहीत. अशा हल्ल्यांमध्ये ते शक्यही नसते. मृतांच्या संख्येबाबत त्यांनी सांगितले की, आमचे जे लक्ष्य होते, तिथे त्या वेळी किती लोक हजर होते, यावर ही संख्या ठरू शकते.भारतीय हवाई दलाने टाकलेले बॉम्ब हे मूळ लक्ष्यापासून दूर पडले, हे खरे आहे का, असे विचारले असता, धनोआ म्हणाले की, भारतीय हवाई दलाने जर बालाकोटच्या जंगलात भलत्याच ठिकाणी बॉॅॅम्ब टाकले असते, तर पाकिस्तानला त्याचे प्रत्युत्तर देण्याची गरज नव्हती.>दहशतवादी तळावरसुरू होते ३०० फोनबालाकोटमध्ये हल्ल्याच्या दिवशी ३०० फोन सुरू होते, अशी माहिती राष्ट्रीय तंत्रज्ञान संशोधन संस्थेकडे होती. बालाकोटमध्ये हल्ला करायची हवाई दलाला परवानगी मिळाल्यानंतर, या संस्थेने दहशतवादी तळावर तांत्रिकदृष्ट्या नजर ठेवणे सुरू केले होते. त्यात ही माहिती मिळाली होती. याचा अर्थ असाही आहे की, हल्ल्यात किमान ३०० दहशतवाद्यांचा खात्मा झाला.>अभिनंदन पुन्हा लढाऊ विमान उडवतील का?विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे भविष्यात पुन्हा लढाऊ विमाने उडवणार का? या प्रश्नावर बी. एस. धनोआ म्हणाले की, जर ते वैद्यकीयदृष्ट्या सक्षम वा योग्य ठरले, तरच तर ते लढाऊ विमानांचे उड्डाण पुन्हा करतील. हवाई दलामध्ये आम्ही पायलटच्या स्वास्थ्याबाबत कोणतीही तडजोड करत नाही.

टॅग्स :B S Dhanoaबी एस धानोआ