शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

एअर स्ट्राईकमध्ये 80 टक्के लक्ष्यभेद यशस्वी, हवाई दलाने दिला केंद्राला अहवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 15:45 IST

दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करणाऱ्या एअर स्ट्राईकचा 12 पानी अहवाल भारतीय हवाई दलाने बुधवारी केंद्र सरकारला सुपूर्द केला. 

नवी दिल्ली - पुलवामा हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानच्या बालकोट भागात एअर स्ट्राईक केला. पाकिस्तानची सीमापार करत हवाई दलाच्या विमानांनी बालकोट येथील दहशतवाद्यांना लक्ष्य केले. या हल्ल्यात अनेक दहशतवादी मारले गेले. दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करणाऱ्या भारतीय हवाई दलाने 12 पानांचा अहवाल बुधवारी केंद्र सरकारला सुपूर्द केला. 

पाकिस्तानच्या हद्दीत घुसून भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकचे संपूर्ण देशातील नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले. आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताने दाखवलेल्या या धाडसाचे कौतुक केले गेले. या हल्ल्याचे फोटोसह अनेक दस्तावेज पुरावे म्हणून हवाई दलाने केंद्र सरकारला दिले आहेत. 

सुत्रांच्या माहितीनुसार 12 पानांच्या या अहवालात हवाई दलाने बालकोटच्या ज्या दहशतवादी तळांना टार्गेट केले गेले त्या भागाचे फोटो जोडलेले आहेत. बालकोट परिसरातील दहशतवाद्यांचे अड्डे उधवस्त करण्यात हवाई दलाला यश आले. जवळपास 80 टक्के लक्ष्यभेद यशस्वी ठरल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. ज्या ठिकणांवर बॉम्बहल्ला करण्यात आला, तिथे असणाऱ्या इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे हवाई दलाने सांगितले. या हल्ल्यासाठी वापरण्यात आलेल्या मिसाईल्सने अचूक निशाना साधत लक्ष्यभेद केले आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून देशात हवाई दलाच्या एअर स्ट्राईकवर संशय निर्माण करण्याचे राजकारण केले जात आहे. या हल्ल्यात नेमके किती दहशतवादी मारले गेले याची आकडेवारी सांगण्यात यावी अशी मागणीही काँग्रेसने केली तर पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याने भारतातील काही जणांच्या पोटात दुखतंय असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना लगावला होता.  

भारतीय हवाई दलाने केंद्र सरकारला दिलेला एअर स्ट्राईकबाबतचा अहवाल गोपनीय ठेवणार की सार्वजनिक केला जावा यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी निर्णय घेतील.  

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकairforceहवाईदलNarendra Modiनरेंद्र मोदीPakistanपाकिस्तानpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाAbhinandan Varthamanअभिनंदन वर्धमान