शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

एअर स्ट्राईकमध्ये 80 टक्के लक्ष्यभेद यशस्वी, हवाई दलाने दिला केंद्राला अहवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 15:45 IST

दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करणाऱ्या एअर स्ट्राईकचा 12 पानी अहवाल भारतीय हवाई दलाने बुधवारी केंद्र सरकारला सुपूर्द केला. 

नवी दिल्ली - पुलवामा हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानच्या बालकोट भागात एअर स्ट्राईक केला. पाकिस्तानची सीमापार करत हवाई दलाच्या विमानांनी बालकोट येथील दहशतवाद्यांना लक्ष्य केले. या हल्ल्यात अनेक दहशतवादी मारले गेले. दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करणाऱ्या भारतीय हवाई दलाने 12 पानांचा अहवाल बुधवारी केंद्र सरकारला सुपूर्द केला. 

पाकिस्तानच्या हद्दीत घुसून भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकचे संपूर्ण देशातील नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले. आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताने दाखवलेल्या या धाडसाचे कौतुक केले गेले. या हल्ल्याचे फोटोसह अनेक दस्तावेज पुरावे म्हणून हवाई दलाने केंद्र सरकारला दिले आहेत. 

सुत्रांच्या माहितीनुसार 12 पानांच्या या अहवालात हवाई दलाने बालकोटच्या ज्या दहशतवादी तळांना टार्गेट केले गेले त्या भागाचे फोटो जोडलेले आहेत. बालकोट परिसरातील दहशतवाद्यांचे अड्डे उधवस्त करण्यात हवाई दलाला यश आले. जवळपास 80 टक्के लक्ष्यभेद यशस्वी ठरल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. ज्या ठिकणांवर बॉम्बहल्ला करण्यात आला, तिथे असणाऱ्या इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे हवाई दलाने सांगितले. या हल्ल्यासाठी वापरण्यात आलेल्या मिसाईल्सने अचूक निशाना साधत लक्ष्यभेद केले आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून देशात हवाई दलाच्या एअर स्ट्राईकवर संशय निर्माण करण्याचे राजकारण केले जात आहे. या हल्ल्यात नेमके किती दहशतवादी मारले गेले याची आकडेवारी सांगण्यात यावी अशी मागणीही काँग्रेसने केली तर पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याने भारतातील काही जणांच्या पोटात दुखतंय असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना लगावला होता.  

भारतीय हवाई दलाने केंद्र सरकारला दिलेला एअर स्ट्राईकबाबतचा अहवाल गोपनीय ठेवणार की सार्वजनिक केला जावा यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी निर्णय घेतील.  

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकairforceहवाईदलNarendra Modiनरेंद्र मोदीPakistanपाकिस्तानpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाAbhinandan Varthamanअभिनंदन वर्धमान