शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

एअर स्ट्राईकमध्ये 80 टक्के लक्ष्यभेद यशस्वी, हवाई दलाने दिला केंद्राला अहवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 15:45 IST

दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करणाऱ्या एअर स्ट्राईकचा 12 पानी अहवाल भारतीय हवाई दलाने बुधवारी केंद्र सरकारला सुपूर्द केला. 

नवी दिल्ली - पुलवामा हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानच्या बालकोट भागात एअर स्ट्राईक केला. पाकिस्तानची सीमापार करत हवाई दलाच्या विमानांनी बालकोट येथील दहशतवाद्यांना लक्ष्य केले. या हल्ल्यात अनेक दहशतवादी मारले गेले. दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करणाऱ्या भारतीय हवाई दलाने 12 पानांचा अहवाल बुधवारी केंद्र सरकारला सुपूर्द केला. 

पाकिस्तानच्या हद्दीत घुसून भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकचे संपूर्ण देशातील नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले. आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताने दाखवलेल्या या धाडसाचे कौतुक केले गेले. या हल्ल्याचे फोटोसह अनेक दस्तावेज पुरावे म्हणून हवाई दलाने केंद्र सरकारला दिले आहेत. 

सुत्रांच्या माहितीनुसार 12 पानांच्या या अहवालात हवाई दलाने बालकोटच्या ज्या दहशतवादी तळांना टार्गेट केले गेले त्या भागाचे फोटो जोडलेले आहेत. बालकोट परिसरातील दहशतवाद्यांचे अड्डे उधवस्त करण्यात हवाई दलाला यश आले. जवळपास 80 टक्के लक्ष्यभेद यशस्वी ठरल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. ज्या ठिकणांवर बॉम्बहल्ला करण्यात आला, तिथे असणाऱ्या इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे हवाई दलाने सांगितले. या हल्ल्यासाठी वापरण्यात आलेल्या मिसाईल्सने अचूक निशाना साधत लक्ष्यभेद केले आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून देशात हवाई दलाच्या एअर स्ट्राईकवर संशय निर्माण करण्याचे राजकारण केले जात आहे. या हल्ल्यात नेमके किती दहशतवादी मारले गेले याची आकडेवारी सांगण्यात यावी अशी मागणीही काँग्रेसने केली तर पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याने भारतातील काही जणांच्या पोटात दुखतंय असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना लगावला होता.  

भारतीय हवाई दलाने केंद्र सरकारला दिलेला एअर स्ट्राईकबाबतचा अहवाल गोपनीय ठेवणार की सार्वजनिक केला जावा यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी निर्णय घेतील.  

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकairforceहवाईदलNarendra Modiनरेंद्र मोदीPakistanपाकिस्तानpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाAbhinandan Varthamanअभिनंदन वर्धमान