शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

वायुप्रदूषणाने मुंबईत १०,५०० अकाली मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2018 06:40 IST

वाहने व इमारत बांधकाम, यामुळे ‘पीएम २.५’ धूलिकण हवेत पसरून २०१६ मध्ये बृहन्मुंबईत १०,५०० नागरिकांचे अकाली मृत्यू झाले, असा निष्कर्ष ‘सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट’ने केलेल्या ताज्या अभ्यासातून काढण्यात आला आहे.

नवी दिल्ली: वाहने व इमारत बांधकाम, यामुळे ‘पीएम २.५’ धूलिकण हवेत पसरून २०१६ मध्ये बृहन्मुंबईत १०,५०० नागरिकांचे अकाली मृत्यू झाले, असा निष्कर्ष ‘सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट’ने केलेल्या ताज्या अभ्यासातून काढण्यात आला आहे.या अभ्यास पाहणीनुसार, अहवाल वर्षांत ‘पीएम २.५’ कणांमुळे भारतातील सर्वाधिक १४,८०० मृत्यू राजधानी दिल्लीमध्ये झाले. मृत्यूच्या प्रमाणात त्या खालोखाल मुंबई, कोलकाता (७,३०० ) व चेन्नई (४,८००) या महानगरांचा क्रमांक लागतो. सेंटरच्या संचालिक अनुमिता रॉय-चौधरी यांनी सांगितले की, अशा प्रकारे वायुप्रदूषणाने जगातील सर्वच महानगरांमध्ये कमी-अधिक प्रमाणात अकाली मृत्यू होत असतात, पण आशिया खंडातील महानगरांमध्ये त्यांचे प्रमाणजास्त आढळते. त्यामुळे चीन, भारत, पाकिस्तान व बांगलादेश या आशियाई देशांमधील महानगरे निवडून विशेष अभ्यास केला गेला. या चार देशांच्या विचार केला, तर चीनमधील बीजिंग (१८,२००) व शांघाय (१७,६००) यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर दिल्ली अशी क्रमवारी लागते. हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी कठोर आणि निरंतर उपाय योजणे, प्रदूषणाची वेळच्या वेळी मोजणी करून, तत्काळ पावले उचलणे आणि किमान प्रदूषणाची कडक उद्दिष्टे ठरवून त्यांचे पालन करणे याखेरीज पर्याय नाही, असे रॉय-चौधरी म्हणाल्या.चीनमधील शहरांमध्ये हवेचा दर्जा खूप खराब असला तरी तेथील सरकार त्यास आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करताना दिसते. त्या मानाने भारतासह इतर देशांत ढिलाई दिसते, असे त्या म्हणाल्या.>श्वसन आणि फुप्फुसांचे आजारमानवी व्यवहार आणि वारा-वादळासारख्या नैसर्गिक घटनांनी हवेमध्ये धूलिकण नेहमीच मिसळतात व पसरतात. यापैकी२.५ मिमीहून कमी आकाराचे धूलिकण आरोग्यास अधिक घातक ठरतात. माणसाच्या नाकात असलेल्या केसांमुळे श्वास घेताना हवेतील असे धूलिकणांना अटकाव होतो, पण २.५ मिमीहून लहान कण श्वसनाद्वारे सहजपणे शरीरात जातात. कालांतराने श्वासनलिका, फुप्फुसे यांवर अशा कणांचे आवरण तयार होऊन त्यांचे कार्य मंदावते. यातून पुढे श्वसनसंस्थेच्या व हृदयाच्या आजारांखेरीज प्रसंगी कर्करोगही होऊन अकाली मृत्यू ओढावतो.

टॅग्स :pollutionप्रदूषण