शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
2
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
3
आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
4
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
5
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
6
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
7
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
8
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
9
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
10
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
11
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
12
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
13
३१४ लेखी तक्रारी, १२७ ई-मेल, ४१ जनहित याचिका; १३ वर्षांच्या उदासीनतेने ४७ अपघातांत ६८ बळी
14
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
15
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
16
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
17
IPL 2026 Player Trade Updates : टीम इंडियाच्या 'लाला'सोबत खेळताना दिसणार सचिन तेंडुलकरचा 'लाल'
18
उत्पत्ती एकादशी २०२५: नशिबात जे नाही तेही मिळवायचे असेल तर काय करावे? प्रेमानंद महाराजांनी दिले उत्तर
19
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
20
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
Daily Top 2Weekly Top 5

एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 16:42 IST

एअर इंडियाच्या या निर्णयामुळे आधीच या मार्गाची तिकिटे काढणाऱ्या प्रवाशांच्या अडचणी वाढणार आहेत. एअर इंडियाने यासाठी ऑपरेशनल घटकांचा हवाला दिला आहे.

गेल्या काही वर्षांपासून या ना त्या कारणाने चर्चेत असलेल्या एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला आहे. एअर इंडियाच्या विमान अपघाताला दोन महिने होत नाही तोच कंपनीने दिल्लीहून वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली आहेत. १ सप्टेंबरपासून जवळपास २०२६ पर्यंत एअर इंडियाचे एकही विमान वॉशिंग्टन डीसीसाठी जाणार नाही. 

एअर इंडियाच्या या निर्णयामुळे आधीच या मार्गाची तिकिटे काढणाऱ्या प्रवाशांच्या अडचणी वाढणार आहेत. एअर इंडियाने यासाठी ऑपरेशनल घटकांचा हवाला दिला आहे. संपूर्ण मार्ग नेटवर्कची विश्वासार्हता आणि अखंडता सुनिश्चित करण्यासाठी त्यांच्या सेवा बंद करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. 

गेल्या महिन्यात एअर इंडियाने त्यांच्या २६ बोईंग ७८७-८ विमानांचे रेट्रोफिटिंग सुरू केले आहे. ग्राहकांच्या सेवेत सुधारणा करण्यासाठी विमाने रेट्रोफिटिंग केली जाणार आहेत. यामुळे ही विमाने लांबच्या उड्डाणासाठी उपलब्ध असणार नाहीत. ही समस्या २०२६ च्या अखेरपर्यंत सुरु असणार आहे. यामुळे एअर इंडियाच्या ताफ्यात बोईंगची विमाने नसणार आहेत. विमाने नसल्याने एअर इंडियाने वॉशिंग्टन डीसीची विमानसेवा बंद केली आहे. यानंतर आणखी काही ठिकाणांच्या विमानफेऱ्यांवरही याचा परिणाम दिसणार आहे. 

ज्या प्रवाशांनी १ सप्टेंनंतरची तिकीटे बुक केली आहे, त्याच्याशी एअर इंडिया संपर्क साधणार आहे. त्यांना पर्यायी प्रवास उपलब्ध करून दिला जाणार आहे. यामध्ये दुसऱ्या कंपन्यांच्या फ्लाईटमध्ये बुकिंग आणि फुल रिफंड असणार आहे. हे प्रवासी न्यूयॉर्क (जेएफके), नेवार्क (ईडब्ल्यूआर), शिकागो आणि सॅन फ्रान्सिस्कोचा पर्याय निवडू शकणार आहेत. अलास्का, युनायटेड  किंवा डेल्टा एअरलाईनचा पर्याय यासाठी दिला जाण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया