शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

एअर इंडियाचे खासगीकरण व्हावे: सुरेश प्रभू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 5:56 AM

विमान निर्मिती, दुरुस्ती, देखभालीमध्ये भारत स्वयंपूर्ण बनणार; ‘व्हिजन २०४०’मधून हवाई वाहतूक मंत्र्यांनी दिली ग्वाही

- खलील गिरकरमुंबई : भारताला २०४० पर्यंत हवाई वाहतूक क्षेत्रात विमान निर्मिती ते विमान दुरुस्ती, देखभालीमध्ये स्वयंपूर्ण बनवून जागतिक केंद्र बनवण्याचे उद्दिष्ट व्हिजन २०४०द्वारे जाहीर करण्यात आले आहे. त्यासाठी विमानसेवेच्या संबंधित कररचनेमध्ये बदल करण्यापासून डीजीसीएला स्वायत्तता देण्यापर्यंतच्या अनेक उपायांचा समावेश आहे. ही सर्व उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी हवाई वाहतूक क्षेत्राशी संबंधित सर्वांनी एकत्रित येत काम करण्याची हाक केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली.

भारतातील हवाई वाहतूक क्षेत्रात मोठी वाढ होत असून, एप्रिल ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत गतवर्षीच्या तुलनेत १५ टक्के वाढ झाली आहे. जागतिक पातळीवर ६ टक्के वाढ झाली आहे. भारत सध्या जगात १८७ दशलक्ष प्रवाशांसहित एव्हिएशन क्षेत्रात सातव्या क्रमांकावरील देश आहे. २०२२ पर्यंत हे स्थान तिसऱ्या क्रमांकावर येण्याची शक्यता आहे. हा वेग असाच कायम राहिल्यास २०४० मध्ये भारतातील हवाई प्रवाशांची संख्या ६ पटीने वाढण्याची शक्यता आहे.

भारतातील विविध विमान कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात विमानांची आॅर्डर दिली जात असून सध्या १ हजार विमाने देशात येण्याचे बाकी आहे. सध्याच्या ६२२ विमानांची संख्या २०४० पर्यंत वाढून २३५९ होईल, असा अंदाज आहे.

देशातील कार्यरत विमानतळांची संख्या २०४० पर्यंत दोनशेवर जाईल. देशातील प्रमुख शहरांमध्ये दोन विमानतळे असतील व मुंबई, दिल्लीमध्ये तीन विमानतळे कार्यरत असतील. यासाठी १ लाख ५० हजार एकर जमीन लागणार असून आॅपरेशनल कामासाठी (जमीनीची किंमत वगळून) चाळीस ते ५० लक्ष डॉलर्स निधीची गरज भासेल.

हवाई मालवाहतूकीमध्ये वाढ होईल व २०४० पर्यंत १७ दशलक्ष टन मालवाहतूक केली जाईल. कार्गो वाहतूक प्रक्रिया पूर्णत: पेपरलेस करण्यात येणार असून या प्रक्रियेसाठी केवळ एक ते दोन तास लागतील.

संपूर्ण दक्षिण आशियासाठी भारत हा ट्रान्सशिपमेंट हब बनेल. यासाठी सरकारतर्फे नभ निर्माण फंड उभारण्यात येईल. त्यासाठी सुरुवातीला कॉर्पस फंड म्हणून दोन बिलियन डॉलर्स निधी कमी वर्दळीच्या विमानतळांच्या विकासासाठी देण्यात येईल.एअर इंडियाचे खासगीकरण व्हावे’एव्हिएशन टर्बो फ्युएलला जीएसटीमध्ये सामिल करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवास, पर्यटन व पायाभूत सुविधांमध्ये वाढ होईल असे मत व्हिजनमध्ये नोंदवण्यात आले आहे.च्पांढरा हत्ती बनलेल्या एअर इंडियाचे लवकरात लवकर खासगीकरण होण्याची तीव्र निकड नमूद करण्यात आली आहे. तंत्रज्ञानात मोठी गुंतवणूक करुन विमान दुरुस्ती व देखभाल, निमीर्ती अशा क्षेत्रात भारताने स्वयंपूर्ण होण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.

टॅग्स :Air Indiaएअर इंडिया