Air India Plane Crash: एअर इंडियाच्याविमानात तांत्रिक बिघाड झाल्याच्या घटना तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील. काल अहमदाबादमध्येविमान कोसळून सूमारे 295 लोकांचा मृत्यू झाला, ते विमानदेखील एअर इंडियाचेच होते. त्यामुळे आता एअर इंडियाच्या विमानांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सोशल मीडियावर अनेकजण एअर इंडिया विमानाबाबत आपापला अनुभव शेअर करत आहेत.
सध्या लिंक्डइनवर राजीव बजाज नावाच्या युजरने केलेल्या एका पोस्टची जोरदार चर्चा होत आहे. या पोस्टमध्ये एअर इंडियाच्या विमान हवेत असताना मोठा बिघाड झाल्याचा दावा केला जातोय. या पोस्टमध्ये म्हटले की, '1 जून 2025 रोजी नवी दिल्लीहून हाँगकाँगला निघालेल्या एअर इंडियाच्या विमान क्रमांक AI 314 ने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत दिसणाऱ्या विमानाच्या दारावर झूम करुन बारकाईने पाहा.'
'विमानाने उड्डाण घेतल्याच्या सुमारे 1 तासानंतर दरवाजा थरथर कापू तर लागलाच, शिवाय आवाजही येऊ लागला. हवेच्या दाबामुळे दरवाजाचा सील आपोआप तुटला. त्यानंतर एअर होस्टेसने कसेबसे दरवाजा हाताने ओढून त्यात कागदी नॅपकिन्स भरले. सुदैवाने विमान हाँगकाँगमध्ये सुरक्षितपणे उतरले. मला कंपनीला बदनाम करायचे नाही, पण आपण प्रत्येकाने सुरक्षेच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला पाहिजे. मला वाटते की, उड्डाणापूर्वी सुरक्षेची योग्य तपासणी घेणे गरजेचे आहे,' अशी पोस्ट राजीव बजाज यांनी शेअर केली. सध्या या पोस्टची जोरदार चर्चा होत आहे.