शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 16:33 IST

Air India : भुजहून मुंबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात २५ प्रवाशांना चढता आले नाही, यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला.

गुजरातच्या भुज विमानतळावर आज प्रवाशांनी एअर इंडियाविरुद्ध जोरदार निदर्शने केली. भुजहून मुंबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात २५ प्रवाशांना चढता आले नाही, यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. आसनांच्या कमतरतेमुळे अनेक प्रवाशांना मुंबईला जाता आले नाही, तर आधीच बुकिंग करूनही सीट न मिळाल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी होती.

'एअर इंडिया'वर गैरव्यवस्थापनाचे गंभीर आरोप

प्रवाशांनी एअर इंडिया एअरलाईनवर 'गैरव्यवस्थापना'चे गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, त्यांनी आगाऊ बुकिंग केले होते, परंतु त्यांना सीट मिळाली नाही, तर त्यांना महत्त्वाच्या कामासाठी मुंबईला जायचे होते. एअरलाईनच्या या नियोजनाअभावी त्यांचा पूर्ण दिवस खराब झाल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

१८० ऐवजी १५५ आसनी विमान

प्रवाशांनी माध्यमांना सांगितले की, जेव्हा त्यांनी एअरलाईन अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, तेव्हा त्यांना सांगण्यात आले की मुंबईला जाणाऱ्या विमानासाठी १८० आसनी विमान येणे अपेक्षित होते, परंतु त्याऐवजी १५५ आसनी विमान आले. कदाचित विमानात बिघाड झाल्यामुळे ऐनवेळी विमान बदलण्याचा निर्णय घेण्यात आला असावा.

प्रवाशांची गैरसोय, महत्त्वाचे कामं रद्द

एअरलाईन अधिकाऱ्यांनी प्रवाशांच्या निवासाची व्यवस्था एका खासगी हॉटेलमध्ये केली आहे. तसेच, प्रवाशांना त्यांची फ्लाइट री-शेड्यूल करण्याचा किंवा तिकिटाचे पैसे परत घेण्याचा (रिफंड) पर्याय दिला आहे. मात्र, फ्लाइटमध्ये चढू न शकल्याने अनेक प्रवाशांची महत्त्वाची मीटिंगची वेळ निघून गेल्याने ते निराश होते, तर काही जण नातेवाईकांच्या कार्यक्रमाला जाऊ न शकल्याने दुःखी होते. एका व्यक्तीला व्यवसायाच्या कामासाठी आज मुंबईला पोहोचणे अत्यंत गरजेचे होते, पण त्याला जाता आले नाही. एअर इंडियाच्या या गलथान कारभाराने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाGujaratगुजरात