शहरं
Join us  
Trending Stories
1
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
2
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
3
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
4
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
5
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
6
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
7
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
8
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
9
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
10
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
11
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
12
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
13
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
14
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
15
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
16
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
17
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
18
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
19
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
20
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
Daily Top 2Weekly Top 5

१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 16:33 IST

Air India : भुजहून मुंबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात २५ प्रवाशांना चढता आले नाही, यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला.

गुजरातच्या भुज विमानतळावर आज प्रवाशांनी एअर इंडियाविरुद्ध जोरदार निदर्शने केली. भुजहून मुंबईला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात २५ प्रवाशांना चढता आले नाही, यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. आसनांच्या कमतरतेमुळे अनेक प्रवाशांना मुंबईला जाता आले नाही, तर आधीच बुकिंग करूनही सीट न मिळाल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी होती.

'एअर इंडिया'वर गैरव्यवस्थापनाचे गंभीर आरोप

प्रवाशांनी एअर इंडिया एअरलाईनवर 'गैरव्यवस्थापना'चे गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, त्यांनी आगाऊ बुकिंग केले होते, परंतु त्यांना सीट मिळाली नाही, तर त्यांना महत्त्वाच्या कामासाठी मुंबईला जायचे होते. एअरलाईनच्या या नियोजनाअभावी त्यांचा पूर्ण दिवस खराब झाल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

१८० ऐवजी १५५ आसनी विमान

प्रवाशांनी माध्यमांना सांगितले की, जेव्हा त्यांनी एअरलाईन अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, तेव्हा त्यांना सांगण्यात आले की मुंबईला जाणाऱ्या विमानासाठी १८० आसनी विमान येणे अपेक्षित होते, परंतु त्याऐवजी १५५ आसनी विमान आले. कदाचित विमानात बिघाड झाल्यामुळे ऐनवेळी विमान बदलण्याचा निर्णय घेण्यात आला असावा.

प्रवाशांची गैरसोय, महत्त्वाचे कामं रद्द

एअरलाईन अधिकाऱ्यांनी प्रवाशांच्या निवासाची व्यवस्था एका खासगी हॉटेलमध्ये केली आहे. तसेच, प्रवाशांना त्यांची फ्लाइट री-शेड्यूल करण्याचा किंवा तिकिटाचे पैसे परत घेण्याचा (रिफंड) पर्याय दिला आहे. मात्र, फ्लाइटमध्ये चढू न शकल्याने अनेक प्रवाशांची महत्त्वाची मीटिंगची वेळ निघून गेल्याने ते निराश होते, तर काही जण नातेवाईकांच्या कार्यक्रमाला जाऊ न शकल्याने दुःखी होते. एका व्यक्तीला व्यवसायाच्या कामासाठी आज मुंबईला पोहोचणे अत्यंत गरजेचे होते, पण त्याला जाता आले नाही. एअर इंडियाच्या या गलथान कारभाराने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाGujaratगुजरात